शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

अंबरनाथ कल्याण ग्रामीण जोड रस्त्यावरील डांबर गेले वाहून

By पंकज पाटील | Updated: September 27, 2023 18:47 IST

टँकर आणि रेडिमिक्स काँक्रीटच्या गाड्यांमुळे रस्ता झालाय अपघातग्रस्त.

पंकज पाटील, अंबरनाथ: अंबरनाथ तालुक्याला कल्याण ग्रामीण भागाशी जोडणारा नालंबी रोड सध्या वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. हा रस्ता डोंगरावरून जात असल्यामुळे तो रस्ता सुस्थितीत ठेवणे गरजेचे होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याची योग्य दुरुस्ती न झाल्यामुळे या रस्त्यावरील सर्व डांबर वाहून गेले आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनांना अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अंबरनाथ शहराला कल्याण ग्रामीण भागाशी जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणून नालंबी रोड ओळखला जातो. या ग्रामीण भागात असलेल्या नालंबी भिसोळ आणि आपटी ही सर्व गावे अंबरनाथ शहराशी जोडली गेली आहेत.

दैनंदिन व्यवहारासाठी ग्रामस्थ देखील अंबरनाथ शहरात येत असतात. पूर्वीपासून हा रस्ता नेहमीच सुस्थितीत राहिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला हा रस्ता गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नेहमीच धोकादायक अवस्थेत राहिला आहे. 2021 मध्ये या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र दुरुस्ती केल्यानंतर वर्षभर देखील हा रस्ता टिकला नाही पहिल्याच पावसात हा रस्ता अनेक ठिकाणी खचला होता. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असल्याने त्या ठेकेदाराने पावसाळा झाल्यानंतर या ठिकाणी पॅचवर्क करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. मात्र ते काम देखील निकृष्ट झाल्यामुळे अवघ्या पाच ते सहा महिन्यातच अनेक ठिकाणी खड्डे पडले.

या रस्त्याची अवस्था बिकट असतानाच यंदाच्या पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे खचला आहे. अंबरनाथच्या कोहजगाव पासून नालंबीकडे जाणाऱ्या या डोंगराळ रस्त्यावर अनेक ठिकाणी अवघड वळणे असल्यामुळे त्या ठिकाणी योग्य डांबरीकरण करणे गरजेचे होते. मात्र ते डांबरीकरण न केल्याने अवघड वळणावर मोठी वाहने उलटण्याचा धोका निर्माण झाला. अंबरनाथहुन टिटवाळाकडे जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण आहे. या सोबतच हा रस्ता मुरबाडमार्गे नगरकडे जात असल्यामुळे अनेक वाहने या मार्गावरून जात असतात. उल्हास नदीमधून अनेक टँकर माफिया पाणी चोरून याच रस्त्यावरून अंबरनाथ शहरातील पुरवठा करीत आहेत त्यामुळे बेकायदेशीरपणे चालणाऱ्या टँकरमुळे हा रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. कल्याण ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी रेडिमिक्सचे प्लांट उभारण्यात आल्याने त्या प्लांट मधून अंबरनाथकडे मोठ्या प्रमाणात रेडिमिक्सच्या गाड्यांचा ताफा जात असल्याने हा रस्ता खचण्याचे प्रमाण वाढले.

टॅग्स :ambernathअंबरनाथPotholeखड्डे