शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

२०१९ च्या काँग्रेसच्या दिग्विजयाची सुरुवात पालघरच्या पोटनिवडणुकीतून होणार- अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 20:34 IST

जनता भाजप, शिवसेना या सत्ताधा-यांच्या विरोधात त्यांना धडा शिकवण्यासाठी निवडणुकीची संधी शोधते आहे.

पालघर: २०१९ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित असून पालघरची जनता या पोटनिवडणुकीत त्यावर शिक्कामोर्तब करेल, असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची नियोजनबध्द व्यूहरचना तयार करण्याकरिता चव्हाण स्वतः पालघरमध्ये दाखल झाले. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पालघरच्या वाघोटे गावात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना खा. चव्हाण म्हणाले की, देशपातळीवर भाजप आणि मोदींविरोधात जनतेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणत असंतोष आहे. जनता भाजप, शिवसेना या सत्ताधा-यांच्या विरोधात त्यांना धडा शिकवण्यासाठी निवडणुकीची संधी शोधते आहे. पालघरमध्ये आदिवासींवर होणारे अत्याचार, बळजबरीने त्यांच्या जमिनी बळकावणे, कुषोषणाचे बळी, प्रचंड प्रमाणात सुरु असेलला भ्रष्टाचार, समृध्दी महामार्गासाठी बळजबरीने सुरु असलेले भूसंपादन यामुळे जनतेमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. त्यातच भाजप आणि शिवसेनेमध्ये चाललेली उमेदवारांची पळवापळवी यातून या पक्षांना कोणतीही नैतिकता राहिली नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे पालघरवासीय या मस्तवाल झालेल्या सत्ताधा-यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते निकराने आणि त्वेषाने ही लढाई लढतील, असा निर्धार काँग्रेस चव्हाणांनी व्यक्त केला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधीत करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आनंद ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून एकदिलाने राष्ट्रवादी काँग्रेस या लढाईत सहभागी होईल असा निर्वाळा दिला. दोन्ही पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांनी विजयाचा निर्धार केला.

यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. शरद रणपिसे, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, माजी खासदार दामू शिंगडा, आ. भाई जगताप, पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केदार काळे, वसई शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉमिणीक डिमेलो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, अनुसुचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे, रमाकांत म्हात्रे, सचिव मनिष गणोरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निलमताई राऊत, दोन्ही पक्षांचे तालुकाध्यक्ष,  प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.   

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018congressकाँग्रेस