शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

२०१९ च्या काँग्रेसच्या दिग्विजयाची सुरुवात पालघरच्या पोटनिवडणुकीतून होणार- अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 20:34 IST

जनता भाजप, शिवसेना या सत्ताधा-यांच्या विरोधात त्यांना धडा शिकवण्यासाठी निवडणुकीची संधी शोधते आहे.

पालघर: २०१९ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित असून पालघरची जनता या पोटनिवडणुकीत त्यावर शिक्कामोर्तब करेल, असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची नियोजनबध्द व्यूहरचना तयार करण्याकरिता चव्हाण स्वतः पालघरमध्ये दाखल झाले. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पालघरच्या वाघोटे गावात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना खा. चव्हाण म्हणाले की, देशपातळीवर भाजप आणि मोदींविरोधात जनतेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणत असंतोष आहे. जनता भाजप, शिवसेना या सत्ताधा-यांच्या विरोधात त्यांना धडा शिकवण्यासाठी निवडणुकीची संधी शोधते आहे. पालघरमध्ये आदिवासींवर होणारे अत्याचार, बळजबरीने त्यांच्या जमिनी बळकावणे, कुषोषणाचे बळी, प्रचंड प्रमाणात सुरु असेलला भ्रष्टाचार, समृध्दी महामार्गासाठी बळजबरीने सुरु असलेले भूसंपादन यामुळे जनतेमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. त्यातच भाजप आणि शिवसेनेमध्ये चाललेली उमेदवारांची पळवापळवी यातून या पक्षांना कोणतीही नैतिकता राहिली नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे पालघरवासीय या मस्तवाल झालेल्या सत्ताधा-यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते निकराने आणि त्वेषाने ही लढाई लढतील, असा निर्धार काँग्रेस चव्हाणांनी व्यक्त केला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधीत करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आनंद ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून एकदिलाने राष्ट्रवादी काँग्रेस या लढाईत सहभागी होईल असा निर्वाळा दिला. दोन्ही पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांनी विजयाचा निर्धार केला.

यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. शरद रणपिसे, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, माजी खासदार दामू शिंगडा, आ. भाई जगताप, पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केदार काळे, वसई शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉमिणीक डिमेलो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, अनुसुचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे, रमाकांत म्हात्रे, सचिव मनिष गणोरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निलमताई राऊत, दोन्ही पक्षांचे तालुकाध्यक्ष,  प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.   

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018congressकाँग्रेस