शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

२०१९ च्या काँग्रेसच्या दिग्विजयाची सुरुवात पालघरच्या पोटनिवडणुकीतून होणार- अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 20:34 IST

जनता भाजप, शिवसेना या सत्ताधा-यांच्या विरोधात त्यांना धडा शिकवण्यासाठी निवडणुकीची संधी शोधते आहे.

पालघर: २०१९ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित असून पालघरची जनता या पोटनिवडणुकीत त्यावर शिक्कामोर्तब करेल, असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची नियोजनबध्द व्यूहरचना तयार करण्याकरिता चव्हाण स्वतः पालघरमध्ये दाखल झाले. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पालघरच्या वाघोटे गावात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना खा. चव्हाण म्हणाले की, देशपातळीवर भाजप आणि मोदींविरोधात जनतेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणत असंतोष आहे. जनता भाजप, शिवसेना या सत्ताधा-यांच्या विरोधात त्यांना धडा शिकवण्यासाठी निवडणुकीची संधी शोधते आहे. पालघरमध्ये आदिवासींवर होणारे अत्याचार, बळजबरीने त्यांच्या जमिनी बळकावणे, कुषोषणाचे बळी, प्रचंड प्रमाणात सुरु असेलला भ्रष्टाचार, समृध्दी महामार्गासाठी बळजबरीने सुरु असलेले भूसंपादन यामुळे जनतेमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. त्यातच भाजप आणि शिवसेनेमध्ये चाललेली उमेदवारांची पळवापळवी यातून या पक्षांना कोणतीही नैतिकता राहिली नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे पालघरवासीय या मस्तवाल झालेल्या सत्ताधा-यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते निकराने आणि त्वेषाने ही लढाई लढतील, असा निर्धार काँग्रेस चव्हाणांनी व्यक्त केला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधीत करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आनंद ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून एकदिलाने राष्ट्रवादी काँग्रेस या लढाईत सहभागी होईल असा निर्वाळा दिला. दोन्ही पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांनी विजयाचा निर्धार केला.

यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. शरद रणपिसे, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, माजी खासदार दामू शिंगडा, आ. भाई जगताप, पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केदार काळे, वसई शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉमिणीक डिमेलो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, अनुसुचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे, रमाकांत म्हात्रे, सचिव मनिष गणोरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निलमताई राऊत, दोन्ही पक्षांचे तालुकाध्यक्ष,  प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.   

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018congressकाँग्रेस