शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

"आपले सरकार येताच कोरोना गेला पळून"; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 06:52 IST

दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे करण्यात आले होते.

ठाणे : आपले सरकार आले आणि कोरोनाच पळून गेला, मी बैठक घेतलीच नाही, मी फक्त माहिती घेत होतो. मी बैठका घेत बसलो असतो तर कोरोनाचा बाऊ वाढला असता. काही लोकांना तो हवा होता, तर काही लोकांना तो नको होता. हवा असलेल्यांसाठी मी बैठकच घेतली नाही. त्यावरदेखील टीका झाली. बैठक न घेता जे काही करायचे ते मी केले आणि शेवटी कोरोनाला जावेच लागले, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले. 

विराट सामाजिक, सांस्कृतिक मंच आणि रंगाई आयोजित ‘रंगात रंगली दिवाळी’ या खास दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून ठाणेकर रसिकांशी संवाद साधला. गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी अतिशय आनंदाने ठाणेकर सण, उत्सव साजरे करीत आहेत. ही आपली संस्कृती आहे, ती जपलीच पाहिजे, असेही ते म्हणाले.

राज्य कारभार करताना कोण काय बोलेल, कधी काय होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही नेहमी गॅसवर असतो, असे सांगून शिंदे म्हणाले की, कोरोना काळात अनेकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याकाळी ज्यांनी ज्यांनी काम केले, त्यांचे अभिनंदन केले.  या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मधील लोकप्रिय अभिनेते समीर चौगुले आणि ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घरोघरी पोहोचलेल्या अभिनेत्री मधुराणी गोखले यांचेदेखील कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी निवेदिका वीणा गवाणकर, ठाणेकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाण्यातील  रसिकांचे कौतुक

ठाणेकर हा जसा रसिक आहे, तसा तो संवेदनशीलदेखील आहे. जेव्हा काही प्रसंग येतो, तेव्हा तो सर्वप्रथम खंबीरपणे उभा राहतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गडकरी रंगायतन कसे उभे राहिले याची आठवण त्यांनी सांगितली. तसेच  बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. जे काही करेन, ते जनतेच्या हिताचेच करेन, असा विश्वास देत त्यांनी सर्वांसाठी सर्वसमावेशक काम करण्याची इच्छा असून, तुमचे बळ माझ्यासोबत असावे, अशी इच्छा व्यक्त केली. तुम्ही पुढील १० वर्षे मुख्यमंत्री राहाल आणि दिवाळी पहाटला याल, अशी अपेक्षा कलाकरांनी व्यक्त केली. त्यावर मी किती काही ठरविले तरी ते जनतेच्या हातात आहे, असे शिंदे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे