शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कृत्रिम तलावात २११२७ श्री मूर्तींसह १३६९ गौरींचे विसर्जन

By admin | Updated: September 23, 2015 04:06 IST

पावसाच्या जोरदार हजेरी लावल्यानंतरही ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण केलेल्या कृत्रीम तलावांमध्ये यावर्षी शहरातील पाच दिवसांच्या तब्बल २१ हजार १२७ गणेश मूर्तींसह १ हजार ३६९ गौरीचे विसर्जन झाले.

ठाणे : पावसाच्या जोरदार हजेरी लावल्यानंतरही ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण केलेल्या कृत्रीम तलावांमध्ये यावर्षी शहरातील पाच दिवसांच्या तब्बल २१ हजार १२७ गणेश मूर्तींसह १ हजार ३६९ गौरीचे विसर्जन झाले. तर महापालिकेच्या गणेशमूर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण ४०३ गणेश मूर्तींचे व २ गौरीचे महापालिकेच्यावतीने विधीवत विसर्जन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ठाणे महानगरपालिकेने शहरात दीड दिवस, पाच दिवस आणि १० व्या दिवशी सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेतंर्गत रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन नीळकंठ ग्रीन (टिकुजिनी वाडी) येथे कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. तर पारिसक रेती बंदर आणि कोलशेत बंदर येथे विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था केली आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावरही गणेश मूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे.पाचव्या दिवशी मासुंदा तलावामध्ये २ हजार ५३० श्री गणेशमूर्ती व ७२ गौरींचे विसर्जन करण्यात आले. तर रायलादेवी येथील दोन कृत्रीम तलावामध्ये ३ हजार ७८१ गणेश मूर्ती व ९३ गौरीचे, उपवन आणि नाळकंठ ग्रीन येथील दोन कृत्रीम तलावामध्ये ३ हजार १४५ मूर्तींचे व २११ गौरी, आंबेघोसाळे येथील कृत्रीम तलावात ७०८ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तसेच पारिसक येथे बांधलेल्या विसर्जन महाघाटावर १ हजार ५०८ गणेश मूर्ती व ९० गौरीचे, तर कोलशेत घाटासह इतर सात विसर्जन घाटांवर एकूण ३६४० गणेश मूर्तींसह ४७४ गौरीचे विसर्जन करण्यात आले. कळवा प्रभाग समितीअंतर्गत विविध विसर्जन घाटावर १ हजार ९८७ गणेश मूर्तींचे व १३४ गौरीचे विसर्जन केले.दरम्यान महापालिकेने निर्माण केलेल्या पर्यायी विसर्जन प्रक्रि येला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज होती. यामध्ये अनिरु ध्द अकॅडमी आॅफ डिझास्टर मॅनेजमेंटचे जवळपास ५०० स्वयंसेवक, १५० महापालिकेचे सुरक्षारक्षक, जीवरक्षक आणि अग्निशमन दलाचे जवान तैनात केले होते. (प्रतिनिधी)