शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मनोज जरांगे पाटील यांच्या आगमनाने मीरा-भाईंदरमधील मराठा समाजाचा वाढला उत्साह

By धीरज परब | Updated: November 22, 2023 13:08 IST

मराठा समाजात जरांगे पाटील येणार म्हणून मोठी उत्सुकता होती व त्यांचे स्वागत सुद्धा मोठ्या उत्साहात केले गेले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड -मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मीरारोड मधील आगमन व जाहीर सभेमुळे मीरा भाईंदर मधील मराठा समाजात उत्साह वाढून आरक्षणासाठीच्या लढ्याला बळ मिळाले आहे . मराठा समाजात जरांगे पाटील येणार म्हणून मोठी उत्सुकता होती व त्यांचे स्वागत सुद्धा मोठ्या उत्साहात केले गेले. 

काशीमीरा येथील अखंड हरिनाम सप्ताहचा मंगळवारी बीड च्या श्री क्षेत्र नारायण गड संस्थानचे मठाधिपती महंत शिवाजी महाराज यांच्या कीर्तनाने समारोप झाला . महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आणि मीरा भाईंदर मधील मराठा समाज बांधवाना भेटण्यासाठी जरांगे पाटील दुपारी तिच्या सुमारास आले . काशीमीरा नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले . मराठा समाजाने त्यांचे उत्साहात स्वागत केले . त्यांच्या आगमना वेळी दुचाकी रॅली काढण्यात आली . सुमारे ५०० किलो फुलं त्यांच्या स्वागतासाठी आणली होती . काशीमीरा , जरीमरी तलाव येथील हरिनाम सप्ताह व्यासपीठावर मराठा समाजाच्या वतीने अरुण कदम , सुरेश दळवी , रमेश मोरे , जयराम मेसे , मनोज राणे , सचिन पोपळे, सुभाष काशीद, प्रकाश नागणे  आदींनी जरांगे पाटील यांचे स्वागत केले . यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता . 

आपल्याला दुसऱ्याचे नको आहे  तर आमच्या हक्काचे आहे ते हवे . आरक्षण दिल्या शिवाय सरकारला सुट्टी नाही .  आता पर्यंत मराठा समाजाच्या ३२ लाख नोंदी सापडल्या असून पावणे दोन कोटी लोकांच्या घरात आरक्षणाची भाकरी मिळणार आहे . मराठा आरक्षण ७० वर्षात मिळत नव्हते ते आता निर्णय प्रक्रियेत आले आहे . ८५ टक्के लढाई जिंकलेली आहे व १५ टक्के फक्त बाकी आहे ती सुद्धा लवकरच जिंकू. 

काही जणांनी जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो आपण होऊ द्यायचा नाही. विजयाचा क्षण जवळ आला आहे . पण सावध रहा आणि एकजूट रहा . आपली एकजूट तुटू देऊ नका असे आवाहन त्यांनी केले .  मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला तो वाजलाच म्हणून समजा असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला .  हे व्यासपीठ हिंदु धर्माचे , वारकरी सांप्रदायाचे असल्याने हे ते व्यासपीठ नाही. अन्यथा बऱ्याच जणांना सोडले नसते असा टोला त्यांनी  विरोधकांना लगावला .  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण