शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

मनोज जरांगे पाटील यांच्या आगमनाने मीरा-भाईंदरमधील मराठा समाजाचा वाढला उत्साह

By धीरज परब | Updated: November 22, 2023 13:08 IST

मराठा समाजात जरांगे पाटील येणार म्हणून मोठी उत्सुकता होती व त्यांचे स्वागत सुद्धा मोठ्या उत्साहात केले गेले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड -मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मीरारोड मधील आगमन व जाहीर सभेमुळे मीरा भाईंदर मधील मराठा समाजात उत्साह वाढून आरक्षणासाठीच्या लढ्याला बळ मिळाले आहे . मराठा समाजात जरांगे पाटील येणार म्हणून मोठी उत्सुकता होती व त्यांचे स्वागत सुद्धा मोठ्या उत्साहात केले गेले. 

काशीमीरा येथील अखंड हरिनाम सप्ताहचा मंगळवारी बीड च्या श्री क्षेत्र नारायण गड संस्थानचे मठाधिपती महंत शिवाजी महाराज यांच्या कीर्तनाने समारोप झाला . महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आणि मीरा भाईंदर मधील मराठा समाज बांधवाना भेटण्यासाठी जरांगे पाटील दुपारी तिच्या सुमारास आले . काशीमीरा नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले . मराठा समाजाने त्यांचे उत्साहात स्वागत केले . त्यांच्या आगमना वेळी दुचाकी रॅली काढण्यात आली . सुमारे ५०० किलो फुलं त्यांच्या स्वागतासाठी आणली होती . काशीमीरा , जरीमरी तलाव येथील हरिनाम सप्ताह व्यासपीठावर मराठा समाजाच्या वतीने अरुण कदम , सुरेश दळवी , रमेश मोरे , जयराम मेसे , मनोज राणे , सचिन पोपळे, सुभाष काशीद, प्रकाश नागणे  आदींनी जरांगे पाटील यांचे स्वागत केले . यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता . 

आपल्याला दुसऱ्याचे नको आहे  तर आमच्या हक्काचे आहे ते हवे . आरक्षण दिल्या शिवाय सरकारला सुट्टी नाही .  आता पर्यंत मराठा समाजाच्या ३२ लाख नोंदी सापडल्या असून पावणे दोन कोटी लोकांच्या घरात आरक्षणाची भाकरी मिळणार आहे . मराठा आरक्षण ७० वर्षात मिळत नव्हते ते आता निर्णय प्रक्रियेत आले आहे . ८५ टक्के लढाई जिंकलेली आहे व १५ टक्के फक्त बाकी आहे ती सुद्धा लवकरच जिंकू. 

काही जणांनी जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो आपण होऊ द्यायचा नाही. विजयाचा क्षण जवळ आला आहे . पण सावध रहा आणि एकजूट रहा . आपली एकजूट तुटू देऊ नका असे आवाहन त्यांनी केले .  मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला तो वाजलाच म्हणून समजा असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला .  हे व्यासपीठ हिंदु धर्माचे , वारकरी सांप्रदायाचे असल्याने हे ते व्यासपीठ नाही. अन्यथा बऱ्याच जणांना सोडले नसते असा टोला त्यांनी  विरोधकांना लगावला .  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण