शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
3
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
4
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
5
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
6
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
7
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
8
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
9
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
10
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
11
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
12
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
14
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
15
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
16
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
17
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
18
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
19
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
20
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक

मुंबईप्रमाणेच येथेही बेशिस्त पार्किंगला चाप लावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:08 AM

पादचाऱ्यांनी केली मागणी : वाहनतळांअभावी वाहने उभी करायची कुठे?, वाहनचालकांना पडला प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : मुंबई महापालिकेने रविवारपासून बेकायदा वाहन पार्किंग करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला असताना कल्याण-डोंबिवलीतही वाहनचालकांच्या बेशिस्तीला चाप लावण्याची मागणी पादचाºयांकडून होत आहे. मात्र, वाहनतळाअभावी वाहने उभी करायची कुठे? असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. तर, दुसरीकडे पार्किंग धोरणही केडीएमसीने बासनात गुंडाळल्याने वाहतूक व्यवस्थेचा आणि पार्किंगचा खेळखंडोबा कायम राहण्याची शक्यता आहे.बेशिस्त चालकांना वठणीवर आणण्यासाठी मुंबई महापालिकेने सार्वजनिक वाहनतळांच्या ५०० मीटर परिसरात बेकायदा पार्किंग करणाºया वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वाहनांची वाढती संख्या, कुठेही उभी केली जाणारी वाहने आणि त्यामुळे वाहतूक व पादचाºयांना होणार अडथळा लक्षात घेता मुंबई महापालिकेने, अशा वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईत एक ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे. मुंबईच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवलीतही अशी कारवाई व्हावी, अशी मागणी पादचारी करीत आहेत.वाहनांच्या संख्येत पडणारी भर पाहता कल्याण-डोंबिवलीतील वाहनतळे अपुरी पडू लागली आहेत. त्यात डोंबिवली पूर्वेतील चिमणी गल्लीतील वाहनतळाचा एक मजला रिक्षांना आंदण देण्याचा प्रस्ताव नुकताच केडीएमसीच्या महासभेत मंजूर करण्यात आला आहे. एकीकडे नागरिकांना वाहने पुरेशा वाहनतळाअभावी रस्त्यावरच उभी करावी लागत असताना लोकप्रतिनिधींचे धोरणच एकप्रकारे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडण्याला कारणीभूत ठरत आहे.वाहतूककोंडी आणि पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला असताना ‘बेशिस्ती’ला चाप लावणारे पार्किंग धोरण माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या कार्यकाळात मंजूर झाले आहे. रस्त्यांवरील पार्किंगसाठी शुल्क आकारणे, कोंडी होणाºया रस्त्यांवर नो पार्किंग, गॅरेज व वाहन खरेदी-विक्री करणाºयांकडून पार्किंग शुल्क आकारणे, कंपन्यांच्या बसना सकाळ व सायंकाळी शहरात प्रवेशबंदी, त्यांचे पिकअप आणि ड्रॉप पॉइंट वर्दळीच्या ठिकाणापासून दूर ठवणे तसेच रस्त्यावर अनेक दिवस उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई आणि रिक्षा स्टॅण्डची फेरआखणी ही पार्किंग धोरणाची प्रमुख वैशिष्ट्य होती. मात्र, जुन्या रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या इमारतींना पार्किंग शुल्कात सवलत देणे तर सम-विषम तारखेनुसार ठराविक रस्त्यांच्या बाजूला वाहने उभी करताना अर्ध्या तासापर्यंत कोणतेही शुल्क न घेणे या मुद्यांचाही अंतर्भाव होता. या धोरणाला महासभेची मान्यताही घेण्यात आली. परंतु, हे धोरण कागदावरच राहिले आहे. महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर याची अंमलबजावणी करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने ठोस कृती झालेली नाही, असे कारण प्रशासनाकडून दिले जात आहे. त्यामुळे सद्यस्थितीत तरी बेशिस्तीला चाप लागणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे.अनेक वाहनचालक चुकीच्या पद्धतीने वाहने उभी करतात तसेच नो पार्किंगच्या ठिकाणीही बिनधास्तपणे गाड्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याचा फटका कामावर जाणाºया चाकरमान्यांसह शालेय विद्यार्थ्यांनाही बसतो. त्यामुळे दिवसागणिक वाढत असलेल्या वाहनचालकांच्या बेशिस्तीला चाप लागलाच पाहिजे. मुंबईच्या धर्तीवर कल्याण डोंबिवलीतही कारवाई व्हावी- कांचन क्षीरसागर, पादचारीवाहनचालकांकडून बेकायदा पार्किंग केले जाते, ही वस्तुस्थिती आहे, पण पार्किंगसाठी पुरेशी वाहनतळ नसल्याने वाहने नाइलाजास्तव रस्त्यावरच जागा मिळेल तिथे उभी करावी लागतच आहेत. वाहनतळे बांधणे गरजेचे आहे. अन्यथा वाहने कुठे उभी करायची, याचे स्पष्टीकरण कारवाई करणाºयांनी द्यावे.- स्वप्निल सावंत, दुचाकीचालक