शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

धान्यवाटपात मनमानी : शिधावाटप दुकानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 01:36 IST

तीन दुकानांच्या मालकांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये फौजदारी गुन्हे दाखल करुन त्यांचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले आहे

ठाणे : शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य पुरवठा करण्यात मनमानी करणाऱ्या ठाणे येथील दोन व वाशी येथील एक अशा तीन दुकानांच्या मालकांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये फौजदारी गुन्हे दाखल करुन त्यांचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे येथील शिधावाटप ‘फ’ परिमंडळाचे उपनियंत्रक नरेश वंजारी यांनी दिली.शिधावाटप ‘फ’ परिमंडळाच्या नियंत्रणाखाली १३ दक्षता पथके कार्यरत आहेत. त्यांनी शिधावाटप दुकानांच्या विरोधातील तक्रारीनुसार केलेल्या तपासणीत शिधावाटप दुकान क्रमांक ४१-फ-२८७ (वाशी) या दुकानाचे मालक शाम बाजीराव जाधव, यांनी शिधापत्रिकाधारकांना शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणानुसार जिन्नस दिलेले नाहीत. त्यामुळे या दुकानाचे प्राधिकारपत्र २ जुलैपासून रद्द केले आहे. दुकान क्रमांक ३६-फ-१८१ (ठाणे) या दुकानाचे मालक चेतन कल्याणजी सावला, हे निश्चित वेळेत दुकान उघडे ठेवत नसल्यामुळे व मोफत तांदळाचा साठा उपलब्ध नाही, अशी चुकीची माहिती देऊन शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित ठेवत असल्याचे निदर्शनास आल्याने या दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबित केले आहे. ३६-फ-२१२या दुकानाचे मालक डायबेन अंबाजी पटेल, यांनी शिधापत्रिकाधारकांना शासनाने निश्चित केलेल्या प्रमाणात जिन्नस वितरीत केले नसल्याचे आढळून आल्याने दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात आले.लॉकडाऊनमध्ये कठोर कारवाई : २४ मार्चपासून आजपर्यंत तीन दुकानांच्या मालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करुन दुकानांचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले. १३ दुकानांचे प्राधिकारपत्र निलंबित तर ७ दुकानांचे रद्द करण्यात आलेले आहेत.१० जुलैपर्यंत मोफत तांदूळसध्या जुलै महिन्याचे अन्नधान्य वितरित करण्यात येत आहे. जूनमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभापासून वंचित लाभार्थ्यांना १० जुलैपर्यंत मोफत तांदूळ घेता येईल. आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत ५२ हजार ७४० व्यक्तींना आतापर्यंत चार हजार ९९९ क्विंटल मोफत तांदळाचे वितरण करण्यात आले आहे.या योजनेंतर्गत शिल्लक राहिलेल्या लाभार्थ्यांनादेखील मे व जूनच्या अन्नधान्याचा लाभ १० जुलैपर्यंत घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अन्नधान्यापासून एकही पात्र शिधापत्रिकाधारक वंचित राहणार नाही. तरीदेखील कोणत्याही अडचणी असल्यास ०२२-२५३३२६५७ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :foodअन्नthaneठाणे