शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
4
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
5
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
6
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
7
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
8
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
9
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
10
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
11
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
12
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
13
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
14
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
15
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
16
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
17
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
18
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
19
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
20
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय

पुलाच्या आराखड्याला दोन दिवसांत मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 23:22 IST

रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा दावा : कोपरसह विविध पुलांबाबत आमदारांनी घेतली भेट

कल्याण : डोंबिवलीतील कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचा आराखडा केडीएमसीने मध्य रेल्वेकडे सादर केला आहे. या आराखड्याला दोन दिवसांत मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने बुधवारी दिले. कोपर रेल्वे उड्डाणपूल, लोकग्रामचा पादचारी पूल, पत्रीपूल आणि डोंबिवली स्थानकातील पादचारी पूल यासंदर्भात कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी बुधवारी मध्य रेल्वेचे एडीएमआर एस.आर. कक्कड यांची भेट घेतली. याप्रसंगी मनसे रेल्वे कामगारसेनेचे जितेंद्र पाटील, केडीएमसीतील मनसेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, गटनेते मंदार हळबे, पदाधिकारी हर्षद पाटील, मनोज घरत उपस्थित होते.

कोपर रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने रेल्वेच्या आदेशानुसार महापालिकेने बंद केला. त्याच्या दुरुस्तीचा आराखडा १७ आॅक्टोबरला महापालिकेने रेल्वेकडे पाठविला. मात्र, रेल्वेकडून त्याची मंजुरी देण्यात दिरंगाई होत असल्याने पाटील यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी रेल्वे अधिकाºयांनी कोपर पुलाच्या दुरुस्तीचा आराखडा दोन दिवसांत मंजूर केला जाईल, असे आश्वासन दिले. कल्याण रेल्वेस्थानक ते लोकग्रामला जोडणारा पादचारी पूलही सध्या बंद करण्यात आला आहे. हा पूल महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नव्याने उभारला जाणार आहे. या पुलासंदर्भात महापालिका, स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि रेल्वे प्रशासन यांची पाटील यांच्या उपस्थितीत लवकरच संयुक्त बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले.त्याचबरोबर कल्याण-शीळ रस्त्यावरील कल्याणच्या पत्रीपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. या पुलाचे काम फेब्रुवारी २०२० मध्ये पूर्ण केले जाईल, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, सध्याची कामाची गती पाहता कामाची डेडलाइन पाळली जाणार का, असा सवाल पाटील यांनी केला. त्यावर यासंदर्भात एमएसआरडीसी, रेल्वे, महापालिका यांच्यासोबत आमदारांचा संयुक्त पाहणी दौरा करून कामाची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.आराखडा मंजूर करण्याची राज्यमंत्र्यांची मागणीडोंबिवली : कोपर उड्डाणपुलासंदर्भात केडीएमसीने सादर केलेला आराखडा तातडीने मंजूर करावा, अशी मागणी करणारे पत्र राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस.के. जैन यांना दिले. महापालिकेने २० दिवसांपूर्वी मध्य रेल्वेला या पुलाच्या कामासंदर्भात सुधारित आराखडा पाठवला होता. परंतु, रेल्वेकडून सकारात्मक उत्तर आलेले नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे रेल्वेने सहकार्य करावे. हा पूल बंद असल्याने पूर्व-पश्चिमेतील वाहतूक ठाकुर्लीच्या अरुंद पुलावरून सुरू आहे. त्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. पुलाच्या कामासाठी आणखी काही महिने लागणार आहेत. रेल्वेने तातडीने आराखड्याला मंजुरी दिल्यास निधीची तरतूद व अन्य प्रक्रिया पार पाडता येईल. त्यामुळे रेल्वेने तांत्रिक बाबींची पूर्तता करावी, असे पत्रात म्हटल्याचे चव्हाण म्हणाले. यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तेथे आणखी एका नव्या पुलाचाही आराखडा मंजूर करावा, असेही आदेशित केल्याचे पत्राद्वारे स्मरण करून दिले आहे.

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण