शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पालिकेच्या वैद्यकीय विभागात सुसूत्रता आणण्यासाठी दोन प्रभारींची नियुक्ती करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 19:37 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील व्याप्तीचा फायदा गैरमार्गाने घेतला जात असल्याचा प्रकार अलिकडेच प्रभारी मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांच्या लाचखोरीमुळे उघडकीस आला आहे

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील व्याप्तीचा फायदा गैरमार्गाने घेतला जात असल्याचा प्रकार अलिकडेच प्रभारी मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांच्या लाचखोरीमुळे उघडकीस आला आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागातील कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी प्रशासनाने दोन प्रभारी मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्याकडे केली आहे. 

शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असुन नागरीकांच्या रुग्णसेवेवर ताण पडू लागला आहे. परंतु, हि रुग्णसेवा असमाधानकारक ठरु लागल्याने ती व्हेंटिलेटरवर येऊ लागली आहे. पालिकेकडुन सध्या १० प्राथमिक आरोग्य केंद्रांसह मीरारोड येथील भारतरत्न स्व. इंदिरा गांधी व भार्इंदर येथील भारतरत्न स्व. पंडीत भीमसेन जोशी रुग्णालय चालविले जात आहे. यातील जोशी रुग्णालय राज्य सरकारकडे हस्तांतरीत होण्याच्या मार्गावर असले तरी त्यातील रुग्णसेवा सध्या पालिकेकडुन पुरविली जात आहे. परंतु, या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णसेवा वाऱ्यावर आहे. याखेरीज रुग्णालयात अद्यावत साहित्य असतानाही रुग्णांना वैद्यकीय तपासण्या खाजगी प्रयोगशाळेत करुन घ्याव्या लागतात. हा कारभार वैद्यकीय विभागाकडुन चालविला जात असल्याने रुग्णसेवेसह डास निमुर्लन, लिंक वर्कर, बहुद्देशीय कर्मचारी, औषध व वैद्यकीय साहित्य पुरवठा, रुग्णालयातील नियुक्तया आदी वैद्यकीयसेवेशी निगडीत कामांचा व्याप सतत वाढू लागला आहे. त्याचा भार एकाच व्यक्तीकडे देण्यात येत असल्याने त्यात अनागोंदीचा शिरकाव होऊ लागला आहे.