शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

केडीएमसीकडून अभय योजना लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 03:05 IST

मालमत्ता कराची वसुली कमी होत असल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेने अभय योजना लागू केली आहे.

कल्याण : मालमत्ता कराची वसुली कमी होत असल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेने अभय योजना लागू केली आहे. सगळ्यांनी त्याचा लाभ घेतल्यास महापालिकेच्या तिजोरीत एक हजार कोटी रुपये जमा होतील. तर, महापालिकेस १२० कोटी रुपयांचे व्याज मिळू शकते, असा दावा महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी केला आहे.पहिल्या सहा महिन्यांसाठी मालमत्ता कराचे बिल दिल्यापासून ९० दिवसांत भरावयाचे असते. तर, दुसऱ्या सहामाहीत मालमत्ता कराची रक्कम ३१ डिसेंबरच्या आत भरणे आवश्यक असते. बिल भरण्यास विलंब करणाºया मालमत्ताधारकांकडून महापालिका व्याज आकारते. जानेवारी ते मार्चमध्ये कराची वसुली होते. उर्वरित नऊ महिने वसुलीचे काम थंडावते. त्यामुळे वसुली वाढविण्यासाठी महापालिकेने अभय योजना जाहीर केली आहे. त्यास सोमवारी महासभेने मान्यता दिली.अभय योजनेचा कालावधी १८ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०१८ दरम्यानचा आहे. १८ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर दरम्यान मूळ रक्कम व व्याजाची ५० टक्के रक्कम भरल्यास ५० टक्के व्याजाची रक्कम माफ होणार आहे. या कालावधीत काही नागरिकांनी योजनाचा लाभ न घेतल्यास त्यांना दुसरी संधी मिळणार आहे. १ ते १५ नोव्हेंबर दरम्यान या कालावधीत मूळ रक्कम व व्याजाची ६० टक्के रक्कम भरल्यास त्यांना व्याजाची ४० टक्के रक्कम माफ होणार आहे. दुसरी संधी जे चुकवतील, त्यांना तिसरी संधी मिळणार आहे. १६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मूळ रक्कम व व्याजाची ७५ टक्के रक्कम भरल्यास उर्वरित २५ टक्के रक्कम माफ होणार आहे. नागरिकांना या योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.जमिनीवरील कराची मूळ रक्कम ३२१ कोटी तर, त्यावरील व्याजाची रक्कम १५५ कोटी आहे. इमारतीच्या कराची मूळ रक्कम ३६१ कोटी तर, व्याजाची रक्कम १७९ कोटी रुपये आहे. जमीन व इमारतीवरील मूळ रक्कम व व्याजाची रक्कम मिळून एकूण १,०१८ कोटी थकीत आहेत.जमीन, इमारतीच्या मालमत्ता कराची मूळ रक्कम व व्याज माफ करण्याचा प्रस्ताव नगरसेवकांनी तत्कालीन आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे मांडला होता. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने अभय योजना लागू केल्यास कराची वसुलीच होणार नाही. त्यामुळे महापालिकेचा पाय आणखी खोलात जाईल. त्यामुळे वेलरासू यांनी ही योजना लागू केली नाही.>बिल्डरांना होणार फायदा : बिल्डरानांही अभय योजना हवी होती. बिल्डरांकडून ‘ओपन लॅण्ड टॅक्स’पोटी ४१९ कोटी रुपये येणे बाकी आहे. त्यापैकी ५० टक्के वसुली झाल्यास त्यांच्या अभय योजनेचा विचार करता येईल, असे तत्कालीन आयुक्तांनी म्हटले होते. मात्र विद्यमान आयुक्तांनी सरसकट सगळ्यांना अभय योजना जाहीर केल्याने त्याचा फायदा आता बिल्डरांना मिळणार आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका