शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भाजपाचा शिवसेनेला आणखी एक धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 01:55 IST

मीरा भार्इंदरमध्ये बहुमताच्या जोरावर भाजपाकडून शिवसेनेला टार्गेट करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भूमिपूजन केलेले शहरातील पहिलेच नाट्यगृह बांधण्याचे रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेत

मीरा रोड : मीरा भार्इंदरमध्ये बहुमताच्या जोरावर भाजपाकडून शिवसेनेला टार्गेट करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भूमिपूजन केलेले शहरातील पहिलेच नाट्यगृह बांधण्याचे रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेत आणल्याने वादंग निर्माण झाला आहे. त्यातच भाजपाने त्याच महासभेत नवघर गावामागे दफनभूमीसाठी जागा देण्याचा प्रस्ताव आणला आहे. यावरुन स्थानिक चारही शिवसेना नगरसेवकांसह रहिवाशांनी भाजपाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.८ डिसेंबरच्या महासभेत महापौर डिम्पल मेहता यांनी नवघर गावामागील आरक्षण क्र. १२२ मधील क व ड ची जागा ही दफनभूमीसाठी बोहरा समाजास देण्याचा प्रस्ताव आणला आहे. शिवसेनेसह स्थानिक ग्रामस्थ व रहिवाशांचा सुरवातीपासूनच यास विरोध आहे. आधीच या ठिकाणची स्मशानभुमीची जागा अपुरी पडत आहे. भार्इंदर पूर्व भागात नवघर, गोडदेव आदी परिसरात त्या समाजाची नाममात्र वस्ती असताना त्या समाजाला दफनभूमीची आवश्यकता का, असा प्रश्न रहिवाशांसह शिवसेनेकडून आधीपासूनच केला जात होता. जेथे निकड आहे त्या भार्इंदर पश्चिम किंवा मीरा रोड भागात दफनभूमी विकसित करावी, असा सूर त्यांनी लावला होता. त्यामुळे या आधी देखील दोन वेळा प्रयत्न करण्यात आला, पण विरोधामुळे हा मुद्दा बारगळला होता.पालिका निवडणुकीत ६१ जागा भाजपाने जिंकल्या असल्या, तरी नवघर परिसरात शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले आहेत. स्पष्ट बहुमत मिळाल्याने पालिकेत भाजपा नेतृत्वाने शिवसेनेला व पर्यायाने आमदार प्रताप सरनाईक यांना टार्गेट केले आहे. शिवसेना नगरसेवकांच्या कुटुंबियांशी संबंधित बांधकाम नोटीस न देताच जमीनदोस्त केल्यानंतर महासभेत सरनाईक यांच्या अनेक वर्षांपासूनच्या पाठपुराव्याने काशिमीरा येथे आकार घेत असलेले शहरातील पहिल्या नाट्यगृहाचे काम रद्द करण्याचा प्रस्ताव भाजपाने आणला आहे. उध्दव ठाकरे यांनी त्याचे भूमिपूजन केले होते. सेनेला नाट्यगृहावरुन डिवचणाºया भाजपाच्या स्थानिक नेतृत्त्वाने त्याच महासभेत शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या नवघर गावामागे दफनभूमी विकसित करण्यासाठी ती जागा बोहरा समाजाला देण्याचा प्रस्ताव आणला.प्रभागातील शिवसेनेचे प्रवीण पाटील, संध्या पाटील, वंदना पाटील व अनंत शिर्के या चारही नगरसेवकांनी पत्रक काढून भाजपाचा निषेध केला आहे. भाजपाच्या या तेढ निर्माण करणाºया कुटील डावाविरुध्द आंदोलनासाठी ग्रामस्थ व रहिवाशांनी तयार रहावे, असे आवाहनही केले आहे. भार्इंदर पूर्व परिसरात बोहरा समाजाची लोकवस्ती नसताना भाजपाने राजकीय फायद्यासाठी तसेच नागरिकांनी सेनेला मतदान केल्याने त्याचा राग काढण्यासाठी हा बनाव केल्याचा आरोप केला आहे.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना