शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी इमारत दुर्घटनेत आणखी १५ मृतदेह सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 06:22 IST

मृतांचा आकडा ४१ वर; बचाव पथकांसमोर अडचणींचा डोंगर

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरातील जिलानी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ४१ जणांचा बळी गेला असून २५ जण जखमी झाले आहेत. या घटनेच्या पहिल्या दिवशी १४, दुसऱ्या दिवशी १२ तर तिसºया दिवशी बुधवारी सर्वाधिक १५ मृतदेह हाती लागले आहेत. ६० तास उलटूनही इमारतीचा ढिगारा बाजूला करून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम बचाव पथकाकडून सुरूच आहे. त्यातच बुधवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने बचाव पथकासमोर अडचणी निर्माण झाल्या; मात्र भरपावसात जवानांचे मदतकार्य सुरूच होते.कामगारनगरी म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहराची लोकसंख्या वाढली. वाढत्या लोकसंख्येसोबतच निवाºयाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे धनिकांनी बांधकाम व्यवसायाकडे मोर्चा वळविला आणि शहरात इमारती उभ्या करण्याची स्पर्धाच लागली. मात्र इमारत बांधकामासाठीच्या नियम व अटींकडे बांधकाम व्यावसायिकांनी दुर्लक्ष केल्याने अनधिकृत बांधकामे जोमाने वाढली. मागील सात वर्षांमध्ये शहरात तब्बल ५०० हून अधिक अनधिकृत इमारती उभ्या राहिल्याचा अंदाज आहे. नियम व अटींकडे दुर्लक्ष केल्याने या इमारती किती मजबूत असतील अथवा या इमारतींचे आयुष्य किती, यावर निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. अशा अनधिकृत इमारतींमुळे घडणाºया दुर्घटनांना नेमके जबाबदार कोण? याचा शोध घेणेदेखील गरजेचे आहे. भिवंडी मनपाच्या अखत्यारीत पाच प्रभाग समित्या असून, या पाचही समित्यांमध्ये आजही अनधिकृत बांधकामे राजरोसपणे सुरू आहेत. याकडे भिवंडी मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.भिवंडी पालिकेचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी अनधिकृत बांधकाम करणाºया एका व्यावसायिकाकडून तब्बल १५० रुपये प्रति चौरस फुटाप्रमाणे लाच घेत असल्याचा आरोप एका बांधकाम व्यावसायिकाने नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे. पालिकेचे अधिकारी या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी आपले हात धुऊन घेत आहेत. यातूनच भिवंडीत अनधिकृत बांधकाम फोफावल्याचा आरोप या व्यावसायिकाने केला आहे.

७८२ इमारती धोकादायकशहरात ७८२ धोकादायक इमारती असून, त्यापैकी २१० इमारती अतिधोकादायक असल्याचे मनपा प्रशासनाने जाहीर केले आहे. मनपा प्रशासनाने या इमारतींना केवळ नोटीस बजावल्या आहेत. या धोकादायक इमारतींवर कारवाई केलीच, तर स्थानिक नगरसेवकांचा दबाव येत असतो. त्यामुळे धोकादायक इमारतींवर कारवाई होताना दिसत नाही. जिलानी इमारत कोसळल्यानंतर मनपा प्रशासनाने कामतघर परिसरातील अतिधोकादायक मालमत्ता क्रमांक ६१, ६२ आणि ६३ या इमारतींचा विद्युत पुरवठा खंडित करून या तीन इमारती निर्मनुष्य केल्या आहेत. केवळ दिखावा म्हणून मनपा प्रशासनाने ही कारवाई केल्याचे दिसते. त्यामुळे भविष्यात जिलानी इमारतीप्रमाणे इतर दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाbhiwandiभिवंडी