शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

भिवंडी इमारत दुर्घटनेत आणखी १५ मृतदेह सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 06:22 IST

मृतांचा आकडा ४१ वर; बचाव पथकांसमोर अडचणींचा डोंगर

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरातील जिलानी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ४१ जणांचा बळी गेला असून २५ जण जखमी झाले आहेत. या घटनेच्या पहिल्या दिवशी १४, दुसऱ्या दिवशी १२ तर तिसºया दिवशी बुधवारी सर्वाधिक १५ मृतदेह हाती लागले आहेत. ६० तास उलटूनही इमारतीचा ढिगारा बाजूला करून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम बचाव पथकाकडून सुरूच आहे. त्यातच बुधवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने बचाव पथकासमोर अडचणी निर्माण झाल्या; मात्र भरपावसात जवानांचे मदतकार्य सुरूच होते.कामगारनगरी म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहराची लोकसंख्या वाढली. वाढत्या लोकसंख्येसोबतच निवाºयाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे धनिकांनी बांधकाम व्यवसायाकडे मोर्चा वळविला आणि शहरात इमारती उभ्या करण्याची स्पर्धाच लागली. मात्र इमारत बांधकामासाठीच्या नियम व अटींकडे बांधकाम व्यावसायिकांनी दुर्लक्ष केल्याने अनधिकृत बांधकामे जोमाने वाढली. मागील सात वर्षांमध्ये शहरात तब्बल ५०० हून अधिक अनधिकृत इमारती उभ्या राहिल्याचा अंदाज आहे. नियम व अटींकडे दुर्लक्ष केल्याने या इमारती किती मजबूत असतील अथवा या इमारतींचे आयुष्य किती, यावर निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. अशा अनधिकृत इमारतींमुळे घडणाºया दुर्घटनांना नेमके जबाबदार कोण? याचा शोध घेणेदेखील गरजेचे आहे. भिवंडी मनपाच्या अखत्यारीत पाच प्रभाग समित्या असून, या पाचही समित्यांमध्ये आजही अनधिकृत बांधकामे राजरोसपणे सुरू आहेत. याकडे भिवंडी मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.भिवंडी पालिकेचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी अनधिकृत बांधकाम करणाºया एका व्यावसायिकाकडून तब्बल १५० रुपये प्रति चौरस फुटाप्रमाणे लाच घेत असल्याचा आरोप एका बांधकाम व्यावसायिकाने नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे. पालिकेचे अधिकारी या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी आपले हात धुऊन घेत आहेत. यातूनच भिवंडीत अनधिकृत बांधकाम फोफावल्याचा आरोप या व्यावसायिकाने केला आहे.

७८२ इमारती धोकादायकशहरात ७८२ धोकादायक इमारती असून, त्यापैकी २१० इमारती अतिधोकादायक असल्याचे मनपा प्रशासनाने जाहीर केले आहे. मनपा प्रशासनाने या इमारतींना केवळ नोटीस बजावल्या आहेत. या धोकादायक इमारतींवर कारवाई केलीच, तर स्थानिक नगरसेवकांचा दबाव येत असतो. त्यामुळे धोकादायक इमारतींवर कारवाई होताना दिसत नाही. जिलानी इमारत कोसळल्यानंतर मनपा प्रशासनाने कामतघर परिसरातील अतिधोकादायक मालमत्ता क्रमांक ६१, ६२ आणि ६३ या इमारतींचा विद्युत पुरवठा खंडित करून या तीन इमारती निर्मनुष्य केल्या आहेत. केवळ दिखावा म्हणून मनपा प्रशासनाने ही कारवाई केल्याचे दिसते. त्यामुळे भविष्यात जिलानी इमारतीप्रमाणे इतर दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाbhiwandiभिवंडी