शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

संतप्त प्रवासी उद्या करणार मूक निषेध!

By admin | Updated: February 2, 2016 01:57 IST

धनश्री गोडवे या तरुणीचा सोमवारी लोकलमधून गर्दीमुळे पडून मृत्यू झाला. यापूर्वी भावेश नकाते या तरुणाने प्राण गमावले. वरचेवर घडणाऱ्या या अपघाती मृत्यूमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट

अनिकेत घमंडी,  डोंबिवलीधनश्री गोडवे या तरुणीचा सोमवारी लोकलमधून गर्दीमुळे पडून मृत्यू झाला. यापूर्वी भावेश नकाते या तरुणाने प्राण गमावले. वरचेवर घडणाऱ्या या अपघाती मृत्यूमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या निषेधाचे ‘ऊठ डोंबिवलीकर’ असे शीर्षक असलेले व्हॉट्सअ‍ॅप संदेश फिरू लागले आहेत. बुधवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी डोंबिवलीकर प्रवासी व संघटनांच्या वतीने रामनगर तिकीट खिडकीजवळ मूक निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.रेल्वेमंत्री प्रभू यांचे छायाचित्र असलेला ‘मुर्दाड रेल मिनिस्ट्री’ आणि सफेद कपडे पांघरून ठेवलेला ‘सामान्य रेल्वे प्रवासी’ असा संदेश धनश्रीच्या फोटोसह दिवसभर हजारो डोंबिवलीकरांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत होता. त्यासोबत, ऊठ डोंबिवलीकर आता तरी जागा हो... अजून किती तरुणांचे बळी घेणार ही रेल्वे? असा सवाल करणारे मेसेजही लोकांमध्ये चर्चेत होते. त्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीमधील काही प्रतिष्ठित नागरिक, प्रवासी संघटना यांनी बुधवारच्या मूक आंदोलनाची घोषणा केली. नकाते यांच्या मृत्यूनंतरही डोंबिवलीकर आक्रमक झाले व त्यांनी आंदोलन केले होते. मात्र, डोंबिवलीकरांचा रेल्वे प्रशासनाविरुद्धचा आक्रोश प्रभू यांच्या कानांवर जात नसल्याने या वेळी मूळ निदर्शनांचा पर्याय स्वीकारल्याचे प्रवासी संघटनांनी सांगितले.महिलांकरिता अतिरिक्त महिला स्पेशल लोकल दिल्या जात नाहीत. बाहेरगावांहून येणाऱ्या गाड्यांतून प्रवास करण्याची मुभा महिला प्रवाशांना देताना या गाड्यांची वेळ ही भल्या पहाटे आहे, हे लक्षात घेतले जात नाही. या साऱ्यातून महिला प्रवाशांच्या समस्यांबाबत रेल्वे प्रशासन उदासीन असल्याचेच लक्षण आहे. धनश्रीचा मृत्यू त्याच मुर्दाड मानसिकतेमधून झाल्याचे महिला प्रवाशांना वाटते.मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण आणि नगरसेवक पदाधिकारी आदींनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. दररोज होणारे अपघात व तरुण-तरुणींसह अनेकांचे होणारे मृत्यू रेल्वेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभाराचे बळी आहेत, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. डोंबिवलीकरांच्या यातना- भावना दिल्लीदरबारी पोहोचवण्याचा हा प्रयत्न असेल. - मनोहर शेलार, अध्यक्ष प्रवासी संघटनामहिला प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल सातत्याने रेल्वे प्रशासनाच्या कानीकपाळी ओरडून काहीही फरक पडत नाही. महिला विशेष लोकल द्या, या मागणीला केराची टोपली दाखवली जाते, हे योग्य नाही. अजून किती बळी घेतले जाणार आहेत. यापुढे असे मृत्यू खपवून घेतले जाणार नाहीत. - लता अरगडे, डोंबिवलीजेवढ्या गाड्या वाढवल्या आहेत, त्यामध्ये मुख्य मार्गावर गाड्या नाहीत, हे योग्य नाही. रेल्वेमंत्र्यांसह पालकमंत्र्यांना अपघातांचे गांभीर्य नाही. ते स्वत: वातानुकूलित दालनात बसतात. त्यांना प्रवाशांच्या व्यथा काय समजणार.- जितेंद्र विशे, डोंबिवलीकेवळ डोंबिवलीच नाहीतर बदलापूर, अंबरनाथ आणि आता आसनगाव येथील प्रवाशांचेही प्रचंड हाल होत आहेत. प्रवाशांच्या भावनांशी कोणी खेळू नये. त्यांचा अंत बघू नये. जोपर्यंत तो शांत आहे, तोपर्यंत ठीक आहे. अन्यथा, दिवा येथे झाला तसा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. - संजय मेस्त्री