शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

..आणि नारायण सुर्वेंचा जाहीरनामा प्रेक्षकांसमोर उलगडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 18:46 IST

कामगार, कष्टकरी तसेच शोषित वर्गाचे वास्तव चित्रण करणा:या पद्मश्री नारायण सुव्रे यांच्या कवितेचा प्रवास कवींनी प्रेक्षकांसमोर उलगडला. निमित्त होते ते सार्वजनिक वाचनालय आणि कोलाजतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘जाहीरनामा सुव्र्याचा रिवाईंड: प्रवास कवितेचा’ या कार्यक्रमाचे.

 कल्याण - कामगार, कष्टकरी तसेच शोषित वर्गाचे वास्तव चित्रण करणा-या पद्मश्री नारायण सुव्रे यांच्या कवितेचा प्रवास कवींनी प्रेक्षकांसमोर उलगडला. निमित्त होते ते सार्वजनिक वाचनालय आणि कोलाजतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘जाहीरनामा सुव्र्याचा रिवाईंड, प्रवास कवितेचा’ या कार्यक्रमाचे.    सार्वजनिक वाचनालय, कल्याण आणि कोलाज यांच्यातर्फे  कामगार दिनाच्या पूर्व संध्येला सार्वजनिक वाचलनालयाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कवी गीतेश शिंदे, उमेश जाधव, आदित्य दवणो, वृषाली विनायक यांनी कविवर्य सुव्रे यांच्या कविता आणि कामगार चळवळीतील गीते सादर केली. त्याच बरोबर मार्क्‍सवादी विचारांची जोड असणा-या कविता ही सादर केल्या. रिवाईंड : प्रवास कवितेचा या कार्यक्रमातून एका ज्येष्ठ कवींचा साहित्यीक प्रवास उलगडण्यात येतो. यापूर्वी दिवंगत कवी निरंजन उजगरे यांनी अनुवादित केलेल्या कवितांवर प्रयोग सादर करण्यात आला होता. त्यांच्या पुढील टप्प्यात काल सोमवारी कवि नारायण सुर्वे यांचा कवितेचा प्रवास सादर करण्यात येत आहे. यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी, मिलींद कुलकर्णी, भिकू बारस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.         आदित्य दवणो यांनी ‘माङो विद्यापीठ’ही कविता सादर केली. ही कविता फार मोठी असल्याने त्यातील निवडक भाग सादर करण्यात आला. उमेश जाधव यांनी ‘तर समज’ ही कविता सादर केली. त्याला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. गीतेष शिंदे यांनी ‘विझता विझता स्वत:ला सावरलेच नाही’ ही कविता सादर केली. आदित्य यांनी ‘सत्य’ या शीर्षकातील ‘तुङो गरम ओठ ओठावर टेकल्यास तेव्हा’ आणि व्हिजीट ही कविता सादर करून प्रेक्षकांना जिंकून घेतले. मुंबईसह महाराष्ट्र संयुक्त झाला तेव्हा जन्मला आलेले गीत सादर करण्यात आले. हे गीत शाहीर अमरशेख यांचे असल्याचे गीतप्रेमींना वाटत होते. पण तसे नव्हते. या गीतांने सुव्रे प्रसिध्दीच्या झोतात आले. ‘डोंगरी शेत गं बाई मी बेनू किती’ हे गीत उमेश जाधव यांनी सादर करून प्रेक्षकांची टाळ्य़ाच्या कडकडाटात दाद मिळविली. गीतेष आणि वृषाली यांनी ‘मार्क्‍स मला भेटला’ ही कविता सादर केली. आदित्य यांनी ‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुखात गेले’ ही कविता सादर करून प्रेक्षकांची वाहवाह ची दाद मिळविली. उमेश यांनी ‘काय ते पत्रत लिवा’, प्रौढ स्त्रीचे दुख मांडणारी ‘तिने खरकटी काढली’आणि गिरणीची लावणी ही चळवळतील गीतं सादर करून उपस्थितांना ठेका धरायला लावला. वृषाली यांनी निवेदनांसोबतच मनीऑर्डर मधील व्यक्तीचित्रण आणि मर्ढेकरांशी बातचीत या कविता सादर केल्या. गीतेशने लाईनमनच्या आयुष्यावरील कबुत:या , विश्वास ठेव या कविता सादर केल्या.  कार्यक्रमांचे प्रास्तविक राजीव जोशी यांनी केले. भिकू बारस्कर यांनी वाचनलयाची भूमिका मांडत आभारप्रदर्शन केले. सर्व कलाकरांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, रोप देऊन सत्कार करण्यात आला. कोलाजतर्फे लवकरच आणखी एका ज्येष्ठ कवींचा साहित्यीक प्रवास उलगडण्यात येणार आहे, अशी माहिती गीतेश शिंदे यांनी दिली.

टॅग्स :kalyanकल्याणMaharashtraमहाराष्ट्र