शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

..आणि नारायण सुर्वेंचा जाहीरनामा प्रेक्षकांसमोर उलगडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 18:46 IST

कामगार, कष्टकरी तसेच शोषित वर्गाचे वास्तव चित्रण करणा:या पद्मश्री नारायण सुव्रे यांच्या कवितेचा प्रवास कवींनी प्रेक्षकांसमोर उलगडला. निमित्त होते ते सार्वजनिक वाचनालय आणि कोलाजतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘जाहीरनामा सुव्र्याचा रिवाईंड: प्रवास कवितेचा’ या कार्यक्रमाचे.

 कल्याण - कामगार, कष्टकरी तसेच शोषित वर्गाचे वास्तव चित्रण करणा-या पद्मश्री नारायण सुव्रे यांच्या कवितेचा प्रवास कवींनी प्रेक्षकांसमोर उलगडला. निमित्त होते ते सार्वजनिक वाचनालय आणि कोलाजतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘जाहीरनामा सुव्र्याचा रिवाईंड, प्रवास कवितेचा’ या कार्यक्रमाचे.    सार्वजनिक वाचनालय, कल्याण आणि कोलाज यांच्यातर्फे  कामगार दिनाच्या पूर्व संध्येला सार्वजनिक वाचलनालयाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कवी गीतेश शिंदे, उमेश जाधव, आदित्य दवणो, वृषाली विनायक यांनी कविवर्य सुव्रे यांच्या कविता आणि कामगार चळवळीतील गीते सादर केली. त्याच बरोबर मार्क्‍सवादी विचारांची जोड असणा-या कविता ही सादर केल्या. रिवाईंड : प्रवास कवितेचा या कार्यक्रमातून एका ज्येष्ठ कवींचा साहित्यीक प्रवास उलगडण्यात येतो. यापूर्वी दिवंगत कवी निरंजन उजगरे यांनी अनुवादित केलेल्या कवितांवर प्रयोग सादर करण्यात आला होता. त्यांच्या पुढील टप्प्यात काल सोमवारी कवि नारायण सुर्वे यांचा कवितेचा प्रवास सादर करण्यात येत आहे. यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी, मिलींद कुलकर्णी, भिकू बारस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.         आदित्य दवणो यांनी ‘माङो विद्यापीठ’ही कविता सादर केली. ही कविता फार मोठी असल्याने त्यातील निवडक भाग सादर करण्यात आला. उमेश जाधव यांनी ‘तर समज’ ही कविता सादर केली. त्याला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. गीतेष शिंदे यांनी ‘विझता विझता स्वत:ला सावरलेच नाही’ ही कविता सादर केली. आदित्य यांनी ‘सत्य’ या शीर्षकातील ‘तुङो गरम ओठ ओठावर टेकल्यास तेव्हा’ आणि व्हिजीट ही कविता सादर करून प्रेक्षकांना जिंकून घेतले. मुंबईसह महाराष्ट्र संयुक्त झाला तेव्हा जन्मला आलेले गीत सादर करण्यात आले. हे गीत शाहीर अमरशेख यांचे असल्याचे गीतप्रेमींना वाटत होते. पण तसे नव्हते. या गीतांने सुव्रे प्रसिध्दीच्या झोतात आले. ‘डोंगरी शेत गं बाई मी बेनू किती’ हे गीत उमेश जाधव यांनी सादर करून प्रेक्षकांची टाळ्य़ाच्या कडकडाटात दाद मिळविली. गीतेष आणि वृषाली यांनी ‘मार्क्‍स मला भेटला’ ही कविता सादर केली. आदित्य यांनी ‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुखात गेले’ ही कविता सादर करून प्रेक्षकांची वाहवाह ची दाद मिळविली. उमेश यांनी ‘काय ते पत्रत लिवा’, प्रौढ स्त्रीचे दुख मांडणारी ‘तिने खरकटी काढली’आणि गिरणीची लावणी ही चळवळतील गीतं सादर करून उपस्थितांना ठेका धरायला लावला. वृषाली यांनी निवेदनांसोबतच मनीऑर्डर मधील व्यक्तीचित्रण आणि मर्ढेकरांशी बातचीत या कविता सादर केल्या. गीतेशने लाईनमनच्या आयुष्यावरील कबुत:या , विश्वास ठेव या कविता सादर केल्या.  कार्यक्रमांचे प्रास्तविक राजीव जोशी यांनी केले. भिकू बारस्कर यांनी वाचनलयाची भूमिका मांडत आभारप्रदर्शन केले. सर्व कलाकरांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, रोप देऊन सत्कार करण्यात आला. कोलाजतर्फे लवकरच आणखी एका ज्येष्ठ कवींचा साहित्यीक प्रवास उलगडण्यात येणार आहे, अशी माहिती गीतेश शिंदे यांनी दिली.

टॅग्स :kalyanकल्याणMaharashtraमहाराष्ट्र