शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

..आणि नारायण सुर्वेंचा जाहीरनामा प्रेक्षकांसमोर उलगडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 18:46 IST

कामगार, कष्टकरी तसेच शोषित वर्गाचे वास्तव चित्रण करणा:या पद्मश्री नारायण सुव्रे यांच्या कवितेचा प्रवास कवींनी प्रेक्षकांसमोर उलगडला. निमित्त होते ते सार्वजनिक वाचनालय आणि कोलाजतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘जाहीरनामा सुव्र्याचा रिवाईंड: प्रवास कवितेचा’ या कार्यक्रमाचे.

 कल्याण - कामगार, कष्टकरी तसेच शोषित वर्गाचे वास्तव चित्रण करणा-या पद्मश्री नारायण सुव्रे यांच्या कवितेचा प्रवास कवींनी प्रेक्षकांसमोर उलगडला. निमित्त होते ते सार्वजनिक वाचनालय आणि कोलाजतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘जाहीरनामा सुव्र्याचा रिवाईंड, प्रवास कवितेचा’ या कार्यक्रमाचे.    सार्वजनिक वाचनालय, कल्याण आणि कोलाज यांच्यातर्फे  कामगार दिनाच्या पूर्व संध्येला सार्वजनिक वाचलनालयाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कवी गीतेश शिंदे, उमेश जाधव, आदित्य दवणो, वृषाली विनायक यांनी कविवर्य सुव्रे यांच्या कविता आणि कामगार चळवळीतील गीते सादर केली. त्याच बरोबर मार्क्‍सवादी विचारांची जोड असणा-या कविता ही सादर केल्या. रिवाईंड : प्रवास कवितेचा या कार्यक्रमातून एका ज्येष्ठ कवींचा साहित्यीक प्रवास उलगडण्यात येतो. यापूर्वी दिवंगत कवी निरंजन उजगरे यांनी अनुवादित केलेल्या कवितांवर प्रयोग सादर करण्यात आला होता. त्यांच्या पुढील टप्प्यात काल सोमवारी कवि नारायण सुर्वे यांचा कवितेचा प्रवास सादर करण्यात येत आहे. यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी, मिलींद कुलकर्णी, भिकू बारस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.         आदित्य दवणो यांनी ‘माङो विद्यापीठ’ही कविता सादर केली. ही कविता फार मोठी असल्याने त्यातील निवडक भाग सादर करण्यात आला. उमेश जाधव यांनी ‘तर समज’ ही कविता सादर केली. त्याला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. गीतेष शिंदे यांनी ‘विझता विझता स्वत:ला सावरलेच नाही’ ही कविता सादर केली. आदित्य यांनी ‘सत्य’ या शीर्षकातील ‘तुङो गरम ओठ ओठावर टेकल्यास तेव्हा’ आणि व्हिजीट ही कविता सादर करून प्रेक्षकांना जिंकून घेतले. मुंबईसह महाराष्ट्र संयुक्त झाला तेव्हा जन्मला आलेले गीत सादर करण्यात आले. हे गीत शाहीर अमरशेख यांचे असल्याचे गीतप्रेमींना वाटत होते. पण तसे नव्हते. या गीतांने सुव्रे प्रसिध्दीच्या झोतात आले. ‘डोंगरी शेत गं बाई मी बेनू किती’ हे गीत उमेश जाधव यांनी सादर करून प्रेक्षकांची टाळ्य़ाच्या कडकडाटात दाद मिळविली. गीतेष आणि वृषाली यांनी ‘मार्क्‍स मला भेटला’ ही कविता सादर केली. आदित्य यांनी ‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुखात गेले’ ही कविता सादर करून प्रेक्षकांची वाहवाह ची दाद मिळविली. उमेश यांनी ‘काय ते पत्रत लिवा’, प्रौढ स्त्रीचे दुख मांडणारी ‘तिने खरकटी काढली’आणि गिरणीची लावणी ही चळवळतील गीतं सादर करून उपस्थितांना ठेका धरायला लावला. वृषाली यांनी निवेदनांसोबतच मनीऑर्डर मधील व्यक्तीचित्रण आणि मर्ढेकरांशी बातचीत या कविता सादर केल्या. गीतेशने लाईनमनच्या आयुष्यावरील कबुत:या , विश्वास ठेव या कविता सादर केल्या.  कार्यक्रमांचे प्रास्तविक राजीव जोशी यांनी केले. भिकू बारस्कर यांनी वाचनलयाची भूमिका मांडत आभारप्रदर्शन केले. सर्व कलाकरांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, रोप देऊन सत्कार करण्यात आला. कोलाजतर्फे लवकरच आणखी एका ज्येष्ठ कवींचा साहित्यीक प्रवास उलगडण्यात येणार आहे, अशी माहिती गीतेश शिंदे यांनी दिली.

टॅग्स :kalyanकल्याणMaharashtraमहाराष्ट्र