शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

आनंद विश्व गुरुकुल आणि ज्ञानसाधना महाविद्यालयांनी दत्तक घेतले पुरग्रस्त गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 16:51 IST

कोल्हापूर येथील भेंडवडे गावात १५ आॅगस्ट रोजी एक अनोखा रक्षाबंधन साजरा होणार आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर येथील भेंडवडे गावात १५ आॅगस्ट रोजी एक अनोखा रक्षाबंधन२० टनांचा माल घेऊन कोल्हापूरकडे रवाना जवळपास ६५० घरांना आजून मदत पोहचली नाही : प्रा. प्रदीप ढवळ

ठाणे : ठाणे शहरातून विविध संस्थांनी पुरग्रस्तांना मदतीचा हात देत असतानाच ठाण्यातील आनंद विश्व गुरु कुल आणि सतिश प्रधान ज्ञानसाधना या दोन महाविद्यालयांनी मु.पो. भेंडवडे, ता. हातकंणगले, जि. कोल्हापूर हे गाव दत्तक घेतले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पुवर्संध्येला या दोन्ही महाविद्यालयाचे प्राध्यापक, एनएसएस, एनसीसी, सेल्फ डिफेन्सचे विद्यार्थी मदतीसाठी रवाना होत आहे. १५ आॅगस्ट रोजी या गावात मदत पोहोचवून एक अनोख्याप्रकारे रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लागणाऱ्या सर्व वस्तू असा जवळपास २० टनांचा माल घेऊन ही मंडळी कोल्हापूरकडे रवाना होत आहेत.            शारदा एज्युकेशन सोसायटी संचालित, आनंद विश्व गुरु कुल महाविद्यालय आणि ज्ञानसाधना महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त महाराष्ट्राला मदत करण्याचे ठरवले आहे. या गावातील जवळपास ६५० घरांना आजून मदत पोहचली नाही. महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकानी यांनी सर्वांना अवाहन केले की, पूरग्रस्त माणसांना तांदूळ, साखर, मीठ, पीठ, बिस्कीट, रेडी टू कुक पदार्थ, चादरी, कपडे तसेच शैक्षणकि साहित्य अशा पद्धतीची मदत करवी. हे आवाहन स्वयंसेवकानी तर केलेच पण कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरु वात ही स्वत:पासून करावी हे राष्ट्रीय सेवा योजनेने शिकवले त्यामुळे स्वत: स्वयंसेवक, प्राध्यापक, कर्मचारी असे सर्व मिळून जवळपास ६० जणांचा ताफा गुरूवार १५ आॅगस्ट रोजी भेंडवडे गावाला पोहोचत आहे असे प्रा. प्रदीप ढवळ यांनी लोकमतला सांगितले. ही मदत गावातील प्रत्येक घरांत पोहोचविली जाणार आहे. रक्षाबंधनासाठी आपले भाऊ बहीण तर जवळ आहेतच पण त्या पूरग्रस्त माणसांना ठाऊक सुद्धा नसेल कि या पुरात आपले भाऊ बहीण कुठे असतील आणि कोणत्या परिस्थितीमध्ये असतील. अशा या भावा- बहिणींसाठी स्वयंसेवक त्यांचे भाऊ बहीण बनून त्यांना साथ देणार आहेत. दोन्ही महाविद्यालयाचा परिवार सज्ज झाला आहे भेंडवडे गावाला आधार देण्यासाठी, त्यांचे घर पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी आणि मदतीचा हात व प्रेमाची साथ देण्यासाठी. या गावाला एका दिवसापुरती मदत न देता ज्या ज्या वेळी गरज लागेल त्या त्या वेळी ती पुरविली जाणार असल्याचे आश्वासन प्रा. ढवळ यांनी दिले. विद्यार्थ्यांबरोबर शारदा एज्युकेशन सोसायटीचे विलास ठुसे, महाविद्यालयाच्या प्राचार्या हर्षला लिखिते, डॉ. सुयश प्रधान, सिद्धेश बागवे व इतर प्राध्यापक वर्ग रवाना होत आहे.

टॅग्स :thaneठाणेkolhapurकोल्हापूरfloodपूर