शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

दिल्लीच्या अमृत वाटिकेसाठी ठाणे जिल्ह्यातील माती, तांदूळ घेवून अमृत कलश रवाना

By सुरेश लोखंडे | Updated: October 26, 2023 18:57 IST

देशप्रेमाने भारावलेल्या अत्यंत उत्साही वातावरणात व भारतमाता की जय, वंदे मातरम् च्या जयघोषात व लेझीम पथकांच्या साथीने कलश घेवून जाणाऱ्या बस सायंकाळी मुंबईला रवाना झाली आहे.

ठाणे: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत "मेरी माटी मेरा देश" अर्थात "माझी माती माझा देश" या उपक्रमामध्ये ठाणे जिल्ह्यातील "अमृत कलश" घेवून जाणाऱ्या स्वयंसेवक व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते आज शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी कायार्लयाच्या प्रांगणातून रवाना झालेल्या बसला निराेप देण्यासाठी अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये-धुळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी.गोदापुरे,जिल्हा क्रीडा अधिकारी सूवर्णा बारटक्के, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर(नि.)प्रांजळ जाधव, तहसिलदार नीलिमा सूर्यवंशी, संजय भोसले आदी उपस्थित होते.

देशप्रेमाने भारावलेल्या अत्यंत उत्साही वातावरणात व भारतमाता की जय, वंदे मातरम् च्या जयघोषात व लेझीम पथकांच्या साथीने कलश घेवून जाणाऱ्या बस सायंकाळी मुंबईला रवाना झाली आहे. त्यासाठभ् ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात खास कार्यक्रम साजरा करण्यात आला. यासाठी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, अभ्यागत उत्साहाने सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा व ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये "माझी माती माझा देश" उपक्रमाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावातून व वॉर्डातून माती व तांदूळ गोळा करून जिल्ह्यातून सहा महापालिका, नगरपरिषदेचा एक व ठाणे जिल्हा परिषदेच्या पंचायत समित्यांचे पाच असे एकूण १२ कलश मुंबईतील राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी नेण्यात येत आहेत. 

आज या कलशांना स्वयंसेवकांच्या हस्ते मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात होणाऱ्या कार्यक्रमासाठी रवाना करण्यात आले. यावेळी ठाणे महापालिकेचे सुरक्षा रक्षक व टीडीआरएफच्या पथकाने अमृत कलशांना सलामी दिली. यावेळी ठाणे महापालिकेचे कर्मचारी योगेश विसपुते यांनी जबरदस्त पोवाडा सादर केला. यावेळी ठाणे शहरातील राबोडी येथील सरस्वती हायस्कूल ॲण्ड कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीमचा बहारदार खेळ सादर केला. ठाणे महानगरपालिकेच्या फुलांनी सजविलेल्या ई-बसमधून उल्हासनगर महापालिकेच्या सचिव तथा या उपक्रमाच्या समन्वयक प्राजक्ता कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील २४ स्वयंसेवकांची तुकडी अमृत कलश घेऊन मुंबईकडे रवाना झाली.

टॅग्स :thaneठाणे