शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

बदलापूरमध्ये राबवणार ‘अंबरनाथ पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 2:22 AM

प्रश्न पाणीवितरणाचा; आठवड्यातून दोनदा १५ तासांची केली जाणार कपात

अंबरनाथ: पाणीटंचाई लक्षात घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ३० तासांची पाणीकपात लागू केली होती. ही कपात सरसकट केली जात असल्याने त्याचा परिणाम हा दोन ते तीन दिवस राहतो. सलग दोन ते तीन दिवस पाणी येत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आता बदलापूरमध्येही प्राधिकरणाने अंबरनाथ पॅटर्न राबवण्याचे काम हाती घेतले आहे. सलग ३० तास पाणीकपात न घेता आठवड्यातून दोन वेळा १५-१५ तासांची कपात केली जाणार आहे. अंबरनाथमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे.बदलापूरमध्ये पाणीटंचाईमुळे टँकरलॉबी सक्रिय झाल्याने याप्रकरणी संताप व्यक्त होत होता. शहरात अनेक ठिकाणी जीवन प्राधिकरण पाणी पोहोचवू शकत नसल्याने या भागात टँकरशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यातही टँकरमालक वाढीव दर आकारत असल्याने नागरिकांना दुहेरी त्रास सहन करावा लागतो. शहरातील पाणीसमस्या वाढत असल्याने प्राधिकरणाने नवीन प्रयोग हाती घेतला आहे. सलग ३० तास पाणी बंद ठेवल्याने दुसऱ्या आणि तिसºया दिवशीही पाणीवितरणात अडचणी येतात. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी प्राधिकरणाने शहराचे चार विभाग करून प्रत्येक विभागानुसार आठवड्यातून दोन वेळा १५ तासांची पाणीकपात घेतली जाणार आहे. पाणीसमस्येवर तोडगा काढत असताना १५ तासांची कपात घेतल्याने वितरणव्यवस्थेत सुधारणा करण्यास मदत होणार आहे. ३० तासांच्या कपातीमुळे सर्व जलवाहिन्या या कोरड्या पडत असल्याने वितरण सुरू झाल्यावर कोरड्या पडलेल्या वाहिन्या भरण्यातच वेळ वाया जातो. त्यामुळे जलवाहिन्या कोरड्या पडणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे सातत्याने प्राधिकरणाच्या कार्यालयावर नागरिकांचे मोर्चे निघत होते.अतिरिक्त पाण्यासाठी पाठपुरावा सुरूशहरासाठी जे ३० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी मंजूर झाले आहे, ते लवकरात लवकर नागरिकांना मिळावे, यासाठी पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात कार्यकारी अभियंता मनीषा पालंडे यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी या अतिरिक्त पाण्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र हे वाढीव पाणी बारवी धरणावर अवलंबून असल्याने या धरणाचे काम पूर्ण झाल्यावरच बदलापूरला अतिरिक्त पाणी मिळणार आहे. मात्र बारवी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अजूनही पूर्णपणे सुटलेल्या नसून जून महिन्यापर्यंत त्यांचा प्रश्न सोडविण्यात यश आले तरच बदलापूरकरांची तहान भागणार आहे. हीच परिस्थिती अंबरनाथ शहराची असून बारवीच्या पाण्यावर २० दशलक्ष लिटर आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही शहरांचा विचार करता ५० दशलक्ष पाण्यासाठी प्राधिकरणाला प्रतीक्षा करावी लागणार आहे.नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी टॅँकरवर अवलंबून असलेल्या परिसरात प्राधिकरणाने लक्ष देण्यासंदर्भात मागणी केली होती. त्यानुसार, प्राधिकरणाने लक्ष केंद्रित केले आहे. तसेच पालिका ज्या पद्धतीने प्रत्येक टँकरमागे ६०० आणि ८०० रुपये आकारत आहे, तशाच पद्धतीने प्राधिकरणाने खाजगी टँकरचालकांनाही दर निश्चित करून त्या दराने पाणी देण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली होती. त्यावरही प्राधिकरणाचे अधिकारी निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

टॅग्स :ambernathअंबरनाथbadlapurबदलापूरwater transportजलवाहतूक