शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आंबेडकर साहित्य समीक्षक हरेश खंडेराव यांचे निधन

By सदानंद नाईक | Updated: March 4, 2023 20:53 IST

वृद्धपकाळाने व अल्पशा आजाराने वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सदानंद नाईक, उल्हासनगर: डॉ आंबेडकर साहित्य समीक्षक व साहित्यिक हरेश खंडेराव यांचे वृद्धपकाळाने व अल्पशा आजाराने वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर कॅम्प नं-४ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले असून यावेळी डॉ आंबेडकर चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

उल्हासनगरात स्थायिक झालेले हरेश खंडेराव हे मुंबई आकाशवाणीत उच्च अधिकारी होते. त्यांच्या आकाशवाणी वरील कार्यक्रमाला अमाप प्रसिद्ध मिळाली होती. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९४७ ला नारखेड, नांदुरा जिल्हा- बुलडाणा येथे झाला असून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात त्यांना मिलिंद कुमार म्हणून गौरविण्यात आलेले होते. आंबेडकर साहित्यिक समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले खंडेराव यांनी अनेक पुस्तके लिहिली. आजपर्यंत त्यांच्या अनेक साहित्यकृती प्रकाशित झाल्या असून काही प्रकाशित होणे बाकी आहेत. त्यांच्या एकूण साहित्यावर मान्यवर साहित्यिकांच्या समिक्षांचे संपादन साहित्यिक आनंद चक्रणारायन यांनी मागील वर्षी केलेले असून महाराष्ट्रभर त्या ग्रंथावर ठिकठिकाणी चर्चासत्र आयोजित केले होते. 

प्रसिद्ध समीक्षक व साहित्यिक हरिष खंडेराव प्रसिद्धीलोलुप कधीच नव्हते. त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही ग्रंथावर लेखकाचा फोटो म्हणून त्यांचा फोटो व परिचय त्यांनी टाकलेला नाही. शिवाय त्यांच्यावर लिहिलेल्या वा संपादन केलेल्या ग्रंथावर सुद्धा टाकू नका म्हणून त्यांनी संपादकास सूचना केली होती. त्यांच्या निधनाने डॉ आंबेडकर साहित्यिकात पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया प्रा. संजय अभ्यंकर यांनी दिली. सुभाष टेकडी परिसरात आंबेडकर साहित्यिकांची देणगी असून त्यांच्या विचारांवर सर्वांनी चालायला हवे. असेही अभ्यंकर म्हणाले. त्यांच्या अंत्यसंस्काराला नामवंतांसह शेकडो नागरिकांनी हजेरी लावली होती.

टॅग्स :thaneठाणे