शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

बेघर मुलांचा सरकारला आधार, स्वत: तयार केलेली भाजी आणि मास्कचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 14:59 IST

कोरोनासाठी सर्वच पातळीवरुन मदतीचा हात पुढा होत आहे. अशातच समतोल फाऊंडेशनच्या मुलांनी देखील स्वत: पिकवलेली भाजी आणि तयार केलेले मास्क मोफत वाटण्याचे मोलाचे काम करीत आहेत.

ठाणे : कोरोनाला पराभूत करण्यासाठी सरकार आणि शासनाला अनेक सामाजिक संस्था हातभार लावत आहेत. घरातून पळून आलेल्या रस्त्यावरील मुलांनीही आपला खारीचा वाटा देत सरकारच्या कामात हातभार लावण्यासाठी पाऊल उचलले आहे. सरकारच्या नजरेतून दुर्लक्षित राहिलेल्या वीटभट्टी मजूर, बालसुधार गृहातील बालके आणि रस्त्यावरील मुलांना मास्क आणि भाजीपाल्यांचे वाटप केले. विशेष म्हणजे हे मास्क आणि भाजीपाला त्यांनीच तयार केला आहे.          रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे त्यांच्याच कुटुंबात संगोपालन व्हावे यासाठी समतोल फाउंडेशन ही सेवाभावी संस्था काम करते. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे संस्थेचे घरातून पळून आलेल्या मुलांचे शेल्टर आहे. त्याचप्रमाणे मुरबाड येथे मनपरिवर्तन केंद्र आहे. या ठिकाणी रस्त्यावर सापडलेल्या मुलांसोबत विविध प्रकारचे उपक्र म राबवीत त्यांचे मनपरिवतर्न केले जाते. त्यांना पुन्हा घरी जाणयासाठी तयार केले जाते. सद्य स्थितीत या केंद्रात २२ मुले आहेत. देशात आणि राज्यात कोरोनाचा व्हायरस पसरल्याने संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे गरिबांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. हा व्हायरस आता खेड्या पाड्यातही पोहचू लागला आहे. त्यांच्या हाताला काही काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळे आली आहे. मात्र रस्त्यावरील मुलांनी आता या गरजुंच्या मदतीला धावून जाण्याचा निर्णय घेतला आहे. मनपरिवर्तन केंद्रात ही मुले स्वत: सेंद्रिय पद्धतीने भाजीपाल्याची शेती करतात. तसेच स्वत: शिवण यंत्रावर मास्क शिवतात. त्याचबरोबर आयर्वेदिक नर्सरी देखील येथे तयार केलेली आहे. सोलरींग गोसेवा देखील चालविली जाते. केंद्राच्या आजुबाजुला अदिवासी पाडे व वीटभट्ट्या आहेत. तेथील मजुरांना या मुलांनी स्वत: भाजीपाला पिकवून तो तेथील मजुरांना देत आहेत. त्यासोबतच आपल्यासारख्याच बालसुधार गृहात असलेल्या उल्हासनगर येथील मुलांसाठी देखील भाजीपाला पाठवित आहेत. तयार केलेले मास्क सुद्धा त्यांनी वाटले आहेत. सध्या या मुलांनी पिकविलेल्या भाजीपाला आणि मास्कचा मजुर आणि बालसुधार गृहातील मुलांना मोठा आधार होत आहे. स्वत:ची काळजी घेत ही मुले कोरोनाच्या संकटात सापडलेल्या इतरांचाही आधार बनत आहेत. 

राज्यातील वेगवेगळ्या भागातून घरातून पळून आलेली मुले येथे राहतात. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या मुलांना रेल्वे स्टेशन, एसटी डेपो सारख्या ठिकाणाहून आणले जाते. घरातून पळून येण्याचे अनेकांचे कारण घरातील गरिबी असते. येथे त्यांचे मनपरिवर्तन करून त्यांना व्यवसायिक प्रशिक्षण देऊन परत त्यांच्या आईवडीलांच्या ताब्यात दिले जाते. सध्या २० मुले येथे असून ते मास्क शिवण्यासोबतच भाजी पिकवणे यासारखी कामे करतात, ही मास्क आणि भाजीपाला गरजूंना वाटला जातो.- विजय जाधव, अध्यक्ष समतोल फाउंडेशन 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या