शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

काॅंग्रेसला कोकणातून संपविण्यासाचा मित्र पक्षांचा डाव, कोकणातील काॅंग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 18:56 IST

हितेन नाईक/ पालघर : कोकणामध्ये असलेल्या सहा लोकसभा मतदारसंघात  काही वर्षांपूर्वी काॅंग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष होता. 2008 मध्ये ...

हितेन नाईक/ पालघर: कोकणामध्ये असलेल्या सहा लोकसभा मतदारसंघात  काही वर्षांपूर्वी काॅंग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष होता. 2008 मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचने नंतर काॅंग्रेसची पिछेहाट होऊन तो दुसऱ्या क्रमांकांवर गेला. आजही कोकणात काॅंग्रेसची ब-यापैकी ताकद असतानाही महाविकास आघाडीच्या जागावाटपात संपूर्ण कोकणात सहा जागांपैकी एकही जागा काॅंग्रेसला न देणे हा काॅंग्रेसला कोकणातून संपविण्यासाचा महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचा डाव आहे. असा आरोप शनिवारी (6 एप्रिल) रोजी किसान काॅंग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पराग पष्टे यांनी वाडा येथे पत्रकारांशी बोलताना केला.

कोकणातून काॅंग्रेसला संपविण्यासाचा डावच महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट या मित्र पक्षांनी केला आहे. या मित्र पक्षांकडून आघाडीचा धर्म पाळला जात नाही, असा आरोपही पष्टे यांनी यावेळी केला.मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या 2009 च्या लोकसभेच्या भिवंडी मतदार संघातून काॅंग्रेसचे उमेदवार 42 हजार मतांची आघाडी घेऊन विजयी झाले होते. त्यानंतरही या मतदारसंघात सन 2014 व 2019 अशा दोन निवडणुकीत येथे झालेल्या तिरंगी लढतीत काॅंग्रेसने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची आघाडीतील मित्र पक्षापेक्षा दुप्पट ताकद असतानाही काॅंग्रेसला येथील जागा न देणे हा येथील काॅंग्रेस कार्यकर्त्यांचाच अपमान नव्हे तर नुकताच या भागात भारत जोडो न्याय यात्रेसाठी आलेले देशाचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचा अवमान असल्याचे या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले  काॅंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस योगेश नम यांनी  सांगितले. दरम्यान कुठल्याही परिस्थितीत कोकणातील भिवंडी व पालघर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पुरस्कृत उमेदवार उभे करणारच मग आघाडी धर्म पाळला गेला नाही अशी टीका मित्र पक्षांनी केली तरी त्याची तमा बाळगणार नाही असे पराग पष्टे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :palgharपालघरcongressकाँग्रेस