शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

देशहितासाठी युती झाली पाहिजे - गोपाळ शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 02:52 IST

भाजपा शिवसेना युती बाबत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. देशहितासाठी आणि देशात मजबूत सरकार येण्यासाठी युती झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी ‘लोकमत’ व्यासपीठमध्ये व्यक्त केली

भाजपाशिवसेना युती बाबत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. देशहितासाठी आणि देशात मजबूत सरकार येण्यासाठी युती झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी ‘लोकमत’ व्यासपीठमध्ये व्यक्त केली. २०१४पेक्षा यंदा लोकसभेत एनडीएला जास्त जागा मिळतील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रश्न : गेल्या साडेचार वर्षात आपण कोणते महत्वाचे प्रश्न सोडवले?- गेली ४५ वर्षे मी राजकारणात आहे़ २७ वर्षे नगरसेवक,उपमहापौर आमदार आणि आता गेली साडेचार वर्षे उत्तर मुंबईचा खासदार म्हणून कार्यरत आहे. गेल्या निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे सर्वच प्रश्न सुटले असे मी म्हणणार नाही. झोपडपट्टीवासियांना वन प्लस वन घर मिळावे म्हणून मी संघर्ष केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी हा प्रश्न सोडवला. गेली अनेक वर्षे संघर्ष करून बोरीवली येथील झाशीचे राणी उद्यान, चारकोप सेक्टर ८ मधील संघर्ष उद्यान मी नागरिकांना वचन दिल्या प्रमाणे उभे करून दिले. सतत पाठपुरावा करून मालाड ते दहिसर रेल्वे स्टेशनचा चेहरा मोहरा बदलून रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा मिळवून दिल्या. नागरिकांचा वेळ वाचण्यासाठी दहिसर ते विरारपर्यंत थेट रस्ता करण्यासाठी गेली अनेक वर्षे मी प्रयत्न केल्यामुळे या योजनेला मुहूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.

प्रश्न : मतदार संघातील समस्या सोडवण्यात अडचणी आल्या का?- नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मला अनेक वेळा प्रशासकीय व संबंधित अधिकारी वगार्शी संघर्ष करावा लागला.त्यांची प्रश्न सोडवण्याची मानसिकता नसल्याने अनेक वेळा नागरिकांना न्याय मिळत नाही. चारकोप सेक्टर ८ मधील उद्यानासाठी मला खूप संघर्ष करावा लागला.त्यामुळे या उद्यानाचे नाव मी चक्क संघर्ष उद्यान ठेवले.झोपडपट्टीत राहाणाऱ्या नागरिकांना राज्य शासनाने जानेवारी २०११ पर्यंत संरक्षण दिले आहे. मुंबई महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी हे केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशांचे पालन करत नाही, ही खेदाची बाब आहे. १५-२० वर्षांपूर्वी बांधलेली घरे तोडण्याची कारवाई मनपा प्रशासन करत आहे. त्याचा फटका गरीब जनतेला बसत आहे़त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. या मानसिकतेमुळे मुंबईतील पात्र झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळत नाही. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेने पंतप्रधान आवास योजना धाब्यावर बसवली आहे.

प्रश्न : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे, युती होणार का?- गेली साडेचार वर्षे लोकसभेत १०० टक्के माझी उपस्थिती होती. संसदेत शून्य प्रहरात व विविध आयुधे वापरून मी मतदार संघाचे प्रश्न पोटतिडकीने मांडले असल्याने अनेक समस्या सुटल्या आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मी काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा ४ लाख ५६ हजार मतांनी पराभव केला होता. आगामी निवडणुकीत माझे विजयाचे मार्जिन जास्त वाढलेले असेल. गेल्या सात निवडणुकांत ज्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मला मतदान केले नव्हते ते सुद्धा यंदा मला मतदान करतील. पहिल्यांदाच मतदान करणारा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करेल, असा मला ठाम विश्वास आहे.युती झाली पाहिजे या मताचा मी आहे. युती झाली नाही तर विजयाच्या मतांचे मार्जिन कमी होईल. शिवसेनेला मानणारा मोठा मतदार आहे. त्यांची स्वत:ची हक्काची मते आहे. देशहितासाठी युती झाली पाहिजे़शब्दांकन : मनोहर कुंभेजकर 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाGopal Shettyगोपाळ शेट्टी