शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

देशहितासाठी युती झाली पाहिजे - गोपाळ शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 02:52 IST

भाजपा शिवसेना युती बाबत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. देशहितासाठी आणि देशात मजबूत सरकार येण्यासाठी युती झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी ‘लोकमत’ व्यासपीठमध्ये व्यक्त केली

भाजपाशिवसेना युती बाबत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. देशहितासाठी आणि देशात मजबूत सरकार येण्यासाठी युती झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी ‘लोकमत’ व्यासपीठमध्ये व्यक्त केली. २०१४पेक्षा यंदा लोकसभेत एनडीएला जास्त जागा मिळतील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रश्न : गेल्या साडेचार वर्षात आपण कोणते महत्वाचे प्रश्न सोडवले?- गेली ४५ वर्षे मी राजकारणात आहे़ २७ वर्षे नगरसेवक,उपमहापौर आमदार आणि आता गेली साडेचार वर्षे उत्तर मुंबईचा खासदार म्हणून कार्यरत आहे. गेल्या निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे सर्वच प्रश्न सुटले असे मी म्हणणार नाही. झोपडपट्टीवासियांना वन प्लस वन घर मिळावे म्हणून मी संघर्ष केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी हा प्रश्न सोडवला. गेली अनेक वर्षे संघर्ष करून बोरीवली येथील झाशीचे राणी उद्यान, चारकोप सेक्टर ८ मधील संघर्ष उद्यान मी नागरिकांना वचन दिल्या प्रमाणे उभे करून दिले. सतत पाठपुरावा करून मालाड ते दहिसर रेल्वे स्टेशनचा चेहरा मोहरा बदलून रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा मिळवून दिल्या. नागरिकांचा वेळ वाचण्यासाठी दहिसर ते विरारपर्यंत थेट रस्ता करण्यासाठी गेली अनेक वर्षे मी प्रयत्न केल्यामुळे या योजनेला मुहूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.

प्रश्न : मतदार संघातील समस्या सोडवण्यात अडचणी आल्या का?- नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मला अनेक वेळा प्रशासकीय व संबंधित अधिकारी वगार्शी संघर्ष करावा लागला.त्यांची प्रश्न सोडवण्याची मानसिकता नसल्याने अनेक वेळा नागरिकांना न्याय मिळत नाही. चारकोप सेक्टर ८ मधील उद्यानासाठी मला खूप संघर्ष करावा लागला.त्यामुळे या उद्यानाचे नाव मी चक्क संघर्ष उद्यान ठेवले.झोपडपट्टीत राहाणाऱ्या नागरिकांना राज्य शासनाने जानेवारी २०११ पर्यंत संरक्षण दिले आहे. मुंबई महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी हे केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशांचे पालन करत नाही, ही खेदाची बाब आहे. १५-२० वर्षांपूर्वी बांधलेली घरे तोडण्याची कारवाई मनपा प्रशासन करत आहे. त्याचा फटका गरीब जनतेला बसत आहे़त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. या मानसिकतेमुळे मुंबईतील पात्र झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळत नाही. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेने पंतप्रधान आवास योजना धाब्यावर बसवली आहे.

प्रश्न : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे, युती होणार का?- गेली साडेचार वर्षे लोकसभेत १०० टक्के माझी उपस्थिती होती. संसदेत शून्य प्रहरात व विविध आयुधे वापरून मी मतदार संघाचे प्रश्न पोटतिडकीने मांडले असल्याने अनेक समस्या सुटल्या आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मी काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा ४ लाख ५६ हजार मतांनी पराभव केला होता. आगामी निवडणुकीत माझे विजयाचे मार्जिन जास्त वाढलेले असेल. गेल्या सात निवडणुकांत ज्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मला मतदान केले नव्हते ते सुद्धा यंदा मला मतदान करतील. पहिल्यांदाच मतदान करणारा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करेल, असा मला ठाम विश्वास आहे.युती झाली पाहिजे या मताचा मी आहे. युती झाली नाही तर विजयाच्या मतांचे मार्जिन कमी होईल. शिवसेनेला मानणारा मोठा मतदार आहे. त्यांची स्वत:ची हक्काची मते आहे. देशहितासाठी युती झाली पाहिजे़शब्दांकन : मनोहर कुंभेजकर 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाGopal Shettyगोपाळ शेट्टी