शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

सरकारवर आरोप परमबीर सिंहांचे, बिऱ्हाड हलविले इतर अधिकाऱ्यांचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 09:24 IST

गेल्या आठवड्यात ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे अन्वेषण शाखा घटक क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची बदली करण्यात आली.

राजू ओढे -ठाणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या वसुलीच्या आरोपांमुळे महाविकास आघाडीची प्रतिमा मलिन झालेली असताना, सरकारची वक्रदृष्टी कधीकाळी परमबीर सिंह यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळख असलेल्या सर्वांकडेच वळली आहे. यातूनच पोलीस दलात बदल्यांचे आदेशावर आदेश निघत असून, त्याचा फटका ठाण्यातील काही अधिकाऱ्यांनाही बसला आहे.गेल्या आठवड्यात ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे अन्वेषण शाखा घटक क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची बदली करण्यात आली. त्याआधी ठाण्यातील खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्यासह मुंबईच्या काही अधिकाऱ्यांचेही बदलीचे आदेश असेच तडकाफडकी काढण्यात आले. वरिष्ठांकडे गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आणि वादग्रस्त पार्श्वभूमी असलेले मोजके अधिकारी वगळता उर्वरित अधिकाऱ्यांच्या बदलीचे खास प्रयोजन नव्हते. या अधिकाऱ्यांनी कधीकाळी परमबीर सिंह यांच्यासोबत काम केल्याने त्यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. हीच ओळख त्यांना भोवली. वास्तविक त्यातील बरेच अधिकारी दीर्घ काळापासून परमबीर सिंह यांच्या संपर्कातही नव्हते. त्यामुळे या अधिकाऱ्यांची बदली केल्याने परमबीर सिंह यांना त्रास होईल, अशातलाही भाग नाही. गुन्हे अन्वेषण शाखेचे कामकाज सांभाळताना नितीन ठाकरे यांनी बोगस कॉल सेंटरपासून लष्कराच्या पेपरफुटीपर्यंतचे एकापेक्षा एक मोठे गुन्हे उघडकीस आणून ठाणे पोलिसांचा नावलौकिक उंचावला. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही प्रकरणांचा उलगडा त्यांनी या काळात केला. योगायोगाने त्या काळात परमबीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त होते. आता परमबीर सिंह यांच्या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याने, सरकारने काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात नितीन ठाकरे यांची बदली नंदुरबार येथे जात पडताळणी समितीमध्ये करण्यात आली आहे. प्रशासकीय वर्तुळात अधिकाऱ्यांच्या बदलीकडे केवळ कारवाई म्हणून नव्हे, तर व्यवस्थेची गरज म्हणूनही बघितले जाते. मात्र, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची बदली थेट नंदुरबार येथे आणि तीही पालक शाखेतून काढून जात पडताळणीसारख्या दुय्यम शाखेत केल्यास योग्य संदेश जात नाही. सरकारची ही भूमिका पोलीस दलात अस्वस्थता निर्माण करणारी आहे.

अधिकाऱ्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेचे काय? सरकारी नोकरी म्हटले की, ठराविक काळानंतर बदली आपसूक आलीच. त्यामुळे कधीही बिऱ्हाड हलविण्याची मानसिकता अधिकाऱ्यांची नेहमीच असते. मात्र, परमबीर सिंह यांनी सरकारवर आरोप केल्यानंतर झालेल्या अशाप्रकारच्या बदल्यांमुळे अधिकाऱ्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सचिन वाझे किंवा मनसुख हिरेन हत्या प्रकरणात तर या अधिकाऱ्यांचा संबंध नाही, अशा संशयाने त्यांच्याकडे बघितले जात आहे. बदलीपेक्षा सामाजिक प्रतिष्ठेची झालेली हानी या अधिकाऱ्यांसाठी जास्त त्रासदायक ठरत आहे.  

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगPoliceपोलिसthaneठाणे