शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

वडोदरा महामार्ग भूसंपादनाच्या माेबदल्यात घाेटाळा; अंबरनाथच्या शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपाेषण!

By सुरेश लोखंडे | Updated: November 26, 2024 17:52 IST

संबंधित आदिवासी शेतकरी बळीराज सेना या संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर आजपासून बेमुदत अमरण उपाेषणाला बसले आहेत.

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्ह्यातून वडाेदरा राष्र्टीय महामार्ग जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेत जमिनी संपादीत केलेल्या आहे. त्यानुसार अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांचीही शेतजमीन संपादीत झाली आहे. पण त्या बदल्यात त्यांना माेबदला मिळाला नसून ताे परस्पर काढून घेतल्याचा आराेप करीत त्याविराेधात संबंधित आदिवासी शेतकरी बळीराज सेना या संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर आजपासून बेमुदत अमरण उपाेषणाला बसले आहेत.

सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्रालय भारत सरकारच्या वडोदरा महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या शेत जमिनी माेठ्याप्रमाणात भूसंपादीत करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील मौजे दहिवली, ता. अंबरनाथ, येथील स.नं. ६/३ मध्ये क्षेत्र ०.३५.४० हेक्टर जमिनीचे भूसंपादनही झालेले आहे. मात्र या जमिनीचा माेबदला संबंधित शेतकऱ्यांना न मिळता ताे परस्पर काढून भ्रष्टाचार केल्याचा आराेप या उपाेषणकर्त्या शेतकऱ्यांकडून केला जात आहे. या भ्रष्टाचाराला कारणीभूत असलेले संबधीत प्रांत अधिकारी व दलाल यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि संबंधित शेत जमिनीचा माेबदला मुळमालकाला मिळावा, या मागणीसाठी न्याय मिळावा यासाठी १३ आदिवासी शेतकरी आजपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत अमरण उपाेशणाला बसले, असे या बळीराज सेनेचे संपर्कप्रमुख दशरथ भाेईर यांनी लाेकमतला सांगितले आहे.

अंबरनाथ तालुक्यातील दहिवली येथील सर्वे नंबर ६/३ मधील आदिवासी शेतकऱ्याची ०.३५.४० हेक्टर जमीन या वडाेदरा राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन झाले आहे. या शेत जमिनीचा मोबदला साधारणतः पाच कोटी ७७ लाख रूपये असा असतांना सातबाऱ्यावरील (७/१२) वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये खात्यावर टाकणेत आले. त्यानुसार एकुण एक कोटी ७० लाख रूपये वारसांच्या खात्यावर पडले. परंतु त्यातील ही ७६ लाख रूपये प्रांत अधिकारी व दलाल यांचे नांवे नेरल बँकेतून परस्पर गेले, असा आराेप या उपाेषणकर्त्या शेतकऱ्यांकडून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेल्या तक्रारीत केलेला आहे. बेकेतुन परस्पर काढलेल्या रकमे व्यतिरिक्त उर्वरित रक्कम चार कोटी सात लाख रूपये दोन व्यक्तींच्या नांवे राहिली. परंतु ती रक्कम देखील प्रांत व दलाल यांनी परस्पर गायब केल्याचा आराेप या आदिवासी शेतकऱ्यांकडून केला जात आहे. हा घाेळ गंभीर स्वरूपाचा असुन आदिवासी शेतकऱ्यावर अन्याय करणारा आहे. त्याविराेधात कडक चौकशी करून आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी बेमुदत उपाेषणकर्ते बळीराज सेनेचे पदाधिकारी व संबधीत आदिवासी शेतकऱ्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी