शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

स्मार्ट सिटीबाबत सर्वपक्षीयांचे मौन

By admin | Updated: January 30, 2016 02:24 IST

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीतून ठाणे शहर बाद झाल्याने ठाणेकरांची घोर निराशा झाली आहे. असे असताना या मुद्यावरून स्थायी समितीत विरोधक

ठाणे : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीतून ठाणे शहर बाद झाल्याने ठाणेकरांची घोर निराशा झाली आहे. असे असताना या मुद्यावरून स्थायी समितीत विरोधक सत्ताधारी आणि प्रशासनाला जाब विचारतील, अशी अपेक्षा असताना त्यांनी मात्र मौन बाळगले. स्मार्ट सिटीला का वगळले, असा सवालही कोणी उपस्थित न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वांनीच आपल्या प्रभागातील प्रस्ताव मंजूर करण्यावर भर दिल्याचे या बैठकीत दिसून आले.दोन महिन्यांपूर्वी पालिकेने विविध पद्धतींचा अवलंब करून ठाणेकरांच्या नजरेतून स्मार्ट सिटीचा ६६३० कोटींचा जम्बो आराखडा तयार केला होता. यामध्ये ७५० एकरांचा विकास करण्याचे स्वप्नही पालिकेने दाखविले. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीतून ठाण्याला वगळल्याने पालिका प्रशासनही अचंबित झाले आहे. परंतु, एप्रिल महिन्यात जाहीर होणाऱ्या दुसऱ्या यादीत ठाण्याचा नंबर लागेल, असा ठाम विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे ठाण्याला वगळण्यामागे पुढील वर्षी होणारी मनपा निवडणूक कारणीभूत ठरली असून निवडणुकीच्या तोंडावर ठाण्याची निवड होणार असल्याचे उघड झाले आहे. तरीही एकाही सदस्याने साधा स्मार्ट सिटी हा उल्लेख करणेसुद्धा टाळले. बैठकीत दिसले खेदजनक चित्रविशेष म्हणजे स्मार्ट सिटीचा आराखडा तयार करण्यासाठी झालेला खर्च, जनजागृती आणि ज्या संस्थेला हे काम दिले होते, त्यांचा झालेला खर्च यासंदर्भातील लाखो रुपयांचे प्रस्ताव स्थायीच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर होते. परंतु, ठाण्याची निवड झालीच नाही, तर याला मंजुरी का द्यायची, असा सवाल उपस्थित करून विरोधक प्रशासनाचे हे प्रस्ताव रोखून धरतील, असेही वाटत होते. परंतु, त्यांनी तलवारच म्यान केल्याने स्मार्ट सिटी होवो ना होवो, आपल्या प्रभागातील प्रस्ताव मंजूर करण्यात सर्वपक्षीय सदस्यांनी धन्यता मानल्याचे खेदजनक चित्र स्थायी समितीत दिसले.