शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

स्मार्ट सिटीबाबत सर्वपक्षीयांचे मौन

By admin | Updated: January 30, 2016 02:24 IST

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीतून ठाणे शहर बाद झाल्याने ठाणेकरांची घोर निराशा झाली आहे. असे असताना या मुद्यावरून स्थायी समितीत विरोधक

ठाणे : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीतून ठाणे शहर बाद झाल्याने ठाणेकरांची घोर निराशा झाली आहे. असे असताना या मुद्यावरून स्थायी समितीत विरोधक सत्ताधारी आणि प्रशासनाला जाब विचारतील, अशी अपेक्षा असताना त्यांनी मात्र मौन बाळगले. स्मार्ट सिटीला का वगळले, असा सवालही कोणी उपस्थित न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वांनीच आपल्या प्रभागातील प्रस्ताव मंजूर करण्यावर भर दिल्याचे या बैठकीत दिसून आले.दोन महिन्यांपूर्वी पालिकेने विविध पद्धतींचा अवलंब करून ठाणेकरांच्या नजरेतून स्मार्ट सिटीचा ६६३० कोटींचा जम्बो आराखडा तयार केला होता. यामध्ये ७५० एकरांचा विकास करण्याचे स्वप्नही पालिकेने दाखविले. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीतून ठाण्याला वगळल्याने पालिका प्रशासनही अचंबित झाले आहे. परंतु, एप्रिल महिन्यात जाहीर होणाऱ्या दुसऱ्या यादीत ठाण्याचा नंबर लागेल, असा ठाम विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे ठाण्याला वगळण्यामागे पुढील वर्षी होणारी मनपा निवडणूक कारणीभूत ठरली असून निवडणुकीच्या तोंडावर ठाण्याची निवड होणार असल्याचे उघड झाले आहे. तरीही एकाही सदस्याने साधा स्मार्ट सिटी हा उल्लेख करणेसुद्धा टाळले. बैठकीत दिसले खेदजनक चित्रविशेष म्हणजे स्मार्ट सिटीचा आराखडा तयार करण्यासाठी झालेला खर्च, जनजागृती आणि ज्या संस्थेला हे काम दिले होते, त्यांचा झालेला खर्च यासंदर्भातील लाखो रुपयांचे प्रस्ताव स्थायीच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर होते. परंतु, ठाण्याची निवड झालीच नाही, तर याला मंजुरी का द्यायची, असा सवाल उपस्थित करून विरोधक प्रशासनाचे हे प्रस्ताव रोखून धरतील, असेही वाटत होते. परंतु, त्यांनी तलवारच म्यान केल्याने स्मार्ट सिटी होवो ना होवो, आपल्या प्रभागातील प्रस्ताव मंजूर करण्यात सर्वपक्षीय सदस्यांनी धन्यता मानल्याचे खेदजनक चित्र स्थायी समितीत दिसले.