शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

आगळ्या वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन करत समस्त पुरुष वर्ग होणार वचनबद्ध, महाराष्ट्रभरात राबविणार उपक्रम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 17:04 IST

अर्थ फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने  ' पुरुषार्थ ' हा  उपक्रम ठाणे शहरासह संपूर्ण राज्यातील शाळा , महाविद्यालयात राबवण्यात येणार आहे. 

ठळक मुद्दे रक्षाबंधन करत समस्त पुरुष वर्ग होणार वचनबद्ध महाराष्ट्रभरात राबविणार उपक्रम अर्थ फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने  ' पुरुषार्थ '

ठाणेरक्षाबंधन भावा बहिणीच्या अतूट नात्याचा उत्सव. आपल्या भावाला राखी बांधते . या निमित्ताने भाऊ आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देतो .मात्र हे वचन वैयत्तिक असते . समाजात वावरताना विविध नात्यातील महिला ' पुरुषांच्या ' आयुष्यात येतात . त्यामुळे ' रक्षण ' आणि ' आदर ' केवळ बहीण आणि रक्षाबंधन पुरता मर्यादित न राहता त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक महिलेप्रती तो आदरभाव असावा यासाठी पुरुषांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी अर्थ फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने  ' पुरुषार्थ ' हा  उपक्रम ठाणे शहरासह संपूर्ण राज्यातील शाळा , महाविद्यालयात राबवण्यात येणार आहे . 

 या उपक्रमाचा शुभारंभ २७ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी ३ वाजता जोशी - बेडेकर महाविद्यालयाच्या थोरले बाजीराव सभागृह येथे होणार आहे . या उपक्रमाचा शुभारंभ ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर , ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल , आमदार संजय केळकर , आमदार निरंजन डावखरे ,सुप्रसिद्ध  चित्रपट दिग्दर्शक विजू माने यांच्या उपस्थित होणार आहे . या निमित्ताने महाविद्यालयाचे ५०० विद्यार्थी खऱ्या अर्थाने वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन करण्यासाठी सज्ज होणार आहेत . हा उपक्रम रक्षाबंधन ते भाऊबीज या कालावधीत संपूर्ण राज्यातील शाळा , महाविद्यालयात आयोजित करण्यात येणार आहे . या निमित्ताने विद्यार्थी  ' पुरुषार्थाचा 'अर्थ सांगणारी प्रतिज्ञा घेतील .. तसेच  या उपक्रमात  समाजातील विविध क्षेत्रातील प्रभावशाली पुरुष सहभागी होऊन विद्यार्थ्यांसमवेत ' पुरुषार्थाचा 'अर्थ सांगणारी प्रतिज्ञा घेणार आहेत.  उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्षा महिला मोर्चा ऍड . माधवी नाईक यांनी सांगितले ,  भविष्यात सुदृढ समाज निर्माण व्हावा तसेच महिलांनी स्वसंरक्षण कसे करावे याचे धडे दिले जातात मात्र त्यांचा इच्छांचा आदर करण्याचा संस्कार मुलांवर झाला पाहिजे तर भविष्यात समाजात घडणार्या आळा बसण्यास प्रारंभ होईल त्यासाठी रक्षाबंधन कडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा हा प्रयत्न असल्याचे नमूद केले.

टॅग्स :thaneठाणेBJPभाजपाEducationशिक्षण