शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

बारवी धरणाचे सर्व दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 03:50 IST

२५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

बदलापूर : ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाचे सर्व दरवाजे रविवारी उघडण्यात आले. धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे हे धरण सकाळी ९ वाजता भरून वाहण्यास सुरुवात झाली. धरणातील ११ दरवाजे स्वयंचलित असून, पाण्याच्या प्रवाहासोबत धरणाचे सर्व दरवाजे टप्प्याटप्प्याने उघडण्यात आले. बारवी धरणाची उंची वाढविल्यानंतर पहिल्यांदाच या धरणात पाणीसाठा निर्माण करण्यात आला. उंची वाढविल्यानंतर पहिल्याच वर्षी हे धरण भरल्याने येथे जलपूजन करण्यात आले.बारवी धरणाची उंची यंदा चार मीटरने वाढविण्यात आली होती. पूर्वी धरणाची पाण्याची पातळी ही ६८.६० मीटर एवढी होती. या जुन्या पातळीनुसार धरणात २३० एमसीएम एवढा पाणीसाठा बारवीत होत होता. यंदा या धरणाची उंची चार मीटरने वाढविली आहे. सोबतच या धरणावर स्वयंचलित दरवाजेही बसविले आहेत. त्यामुळे या धरणाची पाण्याची पातळी ७२.६० मीटर एवढी झाली आहे. प्रथमच हे धरण वाढीव उंचीनुसार भरण्यास सुरुवात करण्यात आली. धरणात ३४० एमसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. धरणावर बसविलेल्या ११ स्वयंचलित दरवाजांपैकी गेट नंबर ४ सकाळी ९ वाजता उघडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर, दोन तासांतच धरणाचे सर्व दरवाजे उघडले. धरण क्षेत्रात पाऊस जास्त झाल्याने, धरणातून २५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.बारवी धरण भरल्याने धरणातून होणाºया पाण्याचा विसर्ग हा मोठा आहे. त्यामुळे हे सर्व पाणी बारवी नदीमार्गातून उल्हास नदीला मिळणार आहे. त्यामुळे उल्हास नदी आणि बारवी नदी ज्या भागात मिळते, त्याच्यापुढे असलेल्या कल्याण ग्रामीण भागाला सर्वात मोठा फटका सहन करावा लागणार आहे.

टॅग्स :Damधरण