शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

बारवी धरणाचे सर्व दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 03:50 IST

२५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

बदलापूर : ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाचे सर्व दरवाजे रविवारी उघडण्यात आले. धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे हे धरण सकाळी ९ वाजता भरून वाहण्यास सुरुवात झाली. धरणातील ११ दरवाजे स्वयंचलित असून, पाण्याच्या प्रवाहासोबत धरणाचे सर्व दरवाजे टप्प्याटप्प्याने उघडण्यात आले. बारवी धरणाची उंची वाढविल्यानंतर पहिल्यांदाच या धरणात पाणीसाठा निर्माण करण्यात आला. उंची वाढविल्यानंतर पहिल्याच वर्षी हे धरण भरल्याने येथे जलपूजन करण्यात आले.बारवी धरणाची उंची यंदा चार मीटरने वाढविण्यात आली होती. पूर्वी धरणाची पाण्याची पातळी ही ६८.६० मीटर एवढी होती. या जुन्या पातळीनुसार धरणात २३० एमसीएम एवढा पाणीसाठा बारवीत होत होता. यंदा या धरणाची उंची चार मीटरने वाढविली आहे. सोबतच या धरणावर स्वयंचलित दरवाजेही बसविले आहेत. त्यामुळे या धरणाची पाण्याची पातळी ७२.६० मीटर एवढी झाली आहे. प्रथमच हे धरण वाढीव उंचीनुसार भरण्यास सुरुवात करण्यात आली. धरणात ३४० एमसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. धरणावर बसविलेल्या ११ स्वयंचलित दरवाजांपैकी गेट नंबर ४ सकाळी ९ वाजता उघडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर, दोन तासांतच धरणाचे सर्व दरवाजे उघडले. धरण क्षेत्रात पाऊस जास्त झाल्याने, धरणातून २५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.बारवी धरण भरल्याने धरणातून होणाºया पाण्याचा विसर्ग हा मोठा आहे. त्यामुळे हे सर्व पाणी बारवी नदीमार्गातून उल्हास नदीला मिळणार आहे. त्यामुळे उल्हास नदी आणि बारवी नदी ज्या भागात मिळते, त्याच्यापुढे असलेल्या कल्याण ग्रामीण भागाला सर्वात मोठा फटका सहन करावा लागणार आहे.

टॅग्स :Damधरण