शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

टिएमटीच्या सावळ्या गोंधळला आता पालिका घालणार लगाम, संगणकाने जोडले जाणार सर्व विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 16:19 IST

परिवहनच्या बेफान कारभाराला लगाम घालण्यासाठी, ठाणे महापालिकेने आता पावले उचलली आहेत. त्यानुसार आता ई. आर. पी. या संगणक प्रणालीचा आधार घेतला जाणार आहे. त्यामाध्यमातून परिवहनचा कारभार सुधारण्याचा पालिकेचा मानस आहे.

ठळक मुद्देपरिवहनच्या कर्मचाऱ्यांसह विविध विभागांना लागणार शिस्तकमांड सेंटर देखील उभारले जाणारसर्व विभाग संगणकाद्वारे जोडले जाणार

ठाणे - ठाणे परिवहन सेवेतील सावळ्या गोंधळाला लगाम घालण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. त्यानुसार परिवहनची कार्यशाळा, बसेस दुरुस्तीसाठी आलेले पार्ट्स आणि एकूणच कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी ठाणे महापालिका ई. आर. पी. (इंटरप्रायजेस रिर्सोस प्लॅनींग) ही संगणक प्रणालीचा वापर करणार आहे. या माध्यमातून सर्व यंत्रणांना संगणाद्वारे जोडण्यात येणार असून प्रत्येक विभागातील प्रत्येक मिनिटा मिनिटांच्या घडामोडी यामाध्यमाूतन टिपल्या जाणार आहेत. शिवाय यासाठी एक कमांड सेंटर देखील कार्यान्वित केले जाणार असून या माध्यमातून प्रत्येकावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. यासाठी ८ कोटी ५० लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.ठाणे परिवहन सेवेत आजच्या घडीला ३५० हून अधिक बसेस आहेत. परंतु जीसीसी वगळता परिवहनच्या स्वत:च्या केवळ ९० च्या आसपासच बसेस रस्त्यावर धावत आहेत. सध्या परिवहनच्या २७० च्या आसपास बसेस रस्त्यावर धावत आहेत. जीसीसी कंत्राटदारामुळे परिवहन सेवेला काहीसा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी मागील कित्येक वर्षापासून कार्यशाळेची सुरु असलेली बोंब, किती साहित्य आले कीती वापरले गेले, टायर किती आले, स्पेअरपार्ट्स किती आले, कोणता कर्मचारी कामावर आला कोणता गेला, बस वेळेवर धावत का नाही, बसेस दुरुस्तीसाठी केव्हा पासून आगारात उभ्या आहेत, किती वेळेत त्या दुरुस्त होणे अपेक्षित आहेत. यासंह येथील कर्मचाऱ्यांवर देखील कोणत्याही प्रकारे अंकुश ठेवण्यात येत नव्हता. याच मुद्यावरुन कित्येक वेळेला परिवहन समित्याच्या बैठकीतही कार्यशाळा आणि एकूणच परिवहनच्या या कार्यप्रणालीचे वाभाडे काढण्यात आले आहेत. परिवहनच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी, किती सामान आले, किती वापरले गेले आहे, याची माहिती उपलब्ध व्हावी, किंबहुना त्यांचे रेकॉर्ड उपलब्ध व्हावेत अशी मागणी कित्येक वेळेला लावून धरण्यात आली आहे.दरम्यान, त्यानुसार मागील दोन वर्षापासून परिवहनला शिस्त लावण्यासाठी पालिकेकडून या प्रणालीचा वापर करण्याचा विचार सुरु होता. परंतु, निधी अभावी हे काम पालिकेला करता येत नव्हते. अखेर आता दोन वर्षानंतर पालिकेने परिवहनच्या कारभाराला अकुंश लावण्यासाठी ई. आर. पी. प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी या प्रणालीचा यशस्वी वापर नवी मुंबई परिवहन सेवेने केला आहे. त्यानंतर आता ठाणे परिवहन सेवेतही या प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्यानुसार परिवहनचा सर्व कारभार आता संगणीकृत करण्यात येणार असून काय आले काय गेले, कोणते साहित्य वापरले गेले, बसेसची वेळेत दुरुस्ती झाली का, कर्मचारी किती वाजता आला किती वाजता गेला, यासह सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यामुळे परिवहनच्या सावळ्या गोंधळाच्या कारभाराला अंकुश बसणार असून परिवहन सेवा सुरळीत सुरु होण्यास मदत होणार असल्याचे मत परिवहनचे प्रभारी व्यवस्थापक संदीप माळवी यांनी व्यक्त केले. तसेच कमांड सेंटर देखील उभारण्यात येणार असल्याने त्यामाध्यमातून सर्व डेटा सेव्ह केला जाणार आहे. या कामासाठी खाजगी संस्थेची मदत घेतली जाणार असून, पुढील पाच वर्षासाठी हे काम संबधींत संस्थेला दिले जाणार आहे. डेटा सेंटरच्या ठिकाणी त्या संस्थेचे कर्मचारी आणि टिएमटीचे देखील काही कर्मचारी काम करणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त