शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

टिएमटीच्या सावळ्या गोंधळला आता पालिका घालणार लगाम, संगणकाने जोडले जाणार सर्व विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 16:19 IST

परिवहनच्या बेफान कारभाराला लगाम घालण्यासाठी, ठाणे महापालिकेने आता पावले उचलली आहेत. त्यानुसार आता ई. आर. पी. या संगणक प्रणालीचा आधार घेतला जाणार आहे. त्यामाध्यमातून परिवहनचा कारभार सुधारण्याचा पालिकेचा मानस आहे.

ठळक मुद्देपरिवहनच्या कर्मचाऱ्यांसह विविध विभागांना लागणार शिस्तकमांड सेंटर देखील उभारले जाणारसर्व विभाग संगणकाद्वारे जोडले जाणार

ठाणे - ठाणे परिवहन सेवेतील सावळ्या गोंधळाला लगाम घालण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. त्यानुसार परिवहनची कार्यशाळा, बसेस दुरुस्तीसाठी आलेले पार्ट्स आणि एकूणच कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी ठाणे महापालिका ई. आर. पी. (इंटरप्रायजेस रिर्सोस प्लॅनींग) ही संगणक प्रणालीचा वापर करणार आहे. या माध्यमातून सर्व यंत्रणांना संगणाद्वारे जोडण्यात येणार असून प्रत्येक विभागातील प्रत्येक मिनिटा मिनिटांच्या घडामोडी यामाध्यमाूतन टिपल्या जाणार आहेत. शिवाय यासाठी एक कमांड सेंटर देखील कार्यान्वित केले जाणार असून या माध्यमातून प्रत्येकावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. यासाठी ८ कोटी ५० लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.ठाणे परिवहन सेवेत आजच्या घडीला ३५० हून अधिक बसेस आहेत. परंतु जीसीसी वगळता परिवहनच्या स्वत:च्या केवळ ९० च्या आसपासच बसेस रस्त्यावर धावत आहेत. सध्या परिवहनच्या २७० च्या आसपास बसेस रस्त्यावर धावत आहेत. जीसीसी कंत्राटदारामुळे परिवहन सेवेला काहीसा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी मागील कित्येक वर्षापासून कार्यशाळेची सुरु असलेली बोंब, किती साहित्य आले कीती वापरले गेले, टायर किती आले, स्पेअरपार्ट्स किती आले, कोणता कर्मचारी कामावर आला कोणता गेला, बस वेळेवर धावत का नाही, बसेस दुरुस्तीसाठी केव्हा पासून आगारात उभ्या आहेत, किती वेळेत त्या दुरुस्त होणे अपेक्षित आहेत. यासंह येथील कर्मचाऱ्यांवर देखील कोणत्याही प्रकारे अंकुश ठेवण्यात येत नव्हता. याच मुद्यावरुन कित्येक वेळेला परिवहन समित्याच्या बैठकीतही कार्यशाळा आणि एकूणच परिवहनच्या या कार्यप्रणालीचे वाभाडे काढण्यात आले आहेत. परिवहनच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी, किती सामान आले, किती वापरले गेले आहे, याची माहिती उपलब्ध व्हावी, किंबहुना त्यांचे रेकॉर्ड उपलब्ध व्हावेत अशी मागणी कित्येक वेळेला लावून धरण्यात आली आहे.दरम्यान, त्यानुसार मागील दोन वर्षापासून परिवहनला शिस्त लावण्यासाठी पालिकेकडून या प्रणालीचा वापर करण्याचा विचार सुरु होता. परंतु, निधी अभावी हे काम पालिकेला करता येत नव्हते. अखेर आता दोन वर्षानंतर पालिकेने परिवहनच्या कारभाराला अकुंश लावण्यासाठी ई. आर. पी. प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी या प्रणालीचा यशस्वी वापर नवी मुंबई परिवहन सेवेने केला आहे. त्यानंतर आता ठाणे परिवहन सेवेतही या प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्यानुसार परिवहनचा सर्व कारभार आता संगणीकृत करण्यात येणार असून काय आले काय गेले, कोणते साहित्य वापरले गेले, बसेसची वेळेत दुरुस्ती झाली का, कर्मचारी किती वाजता आला किती वाजता गेला, यासह सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यामुळे परिवहनच्या सावळ्या गोंधळाच्या कारभाराला अंकुश बसणार असून परिवहन सेवा सुरळीत सुरु होण्यास मदत होणार असल्याचे मत परिवहनचे प्रभारी व्यवस्थापक संदीप माळवी यांनी व्यक्त केले. तसेच कमांड सेंटर देखील उभारण्यात येणार असल्याने त्यामाध्यमातून सर्व डेटा सेव्ह केला जाणार आहे. या कामासाठी खाजगी संस्थेची मदत घेतली जाणार असून, पुढील पाच वर्षासाठी हे काम संबधींत संस्थेला दिले जाणार आहे. डेटा सेंटरच्या ठिकाणी त्या संस्थेचे कर्मचारी आणि टिएमटीचे देखील काही कर्मचारी काम करणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त