शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडल्याने सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 02:33 IST

कल्याण-अहमदनगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील नद्या पुराच्या पाण्यामुळे शनिवारी दुथडी भरून वाहत होत्या. सततच्या पावसामुळे भातसा धरणाचे पाच दरवाजे २.५० मीटर इतके उघडण्यात आले. धरणातून भातसा नदीत सुमारे ९३४ क्युसेस पाणी सोडण्यात आले होते.या नदीच्या काठावरील शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल, सापगाव व नदीकाठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. या काळात वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याच्या व दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी दिल्या आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ८९० मिमी पाऊस पडला. या पावसाची सरासरी १२७.१४ मिमीनोंद घेण्यात आली.दरम्यान, ठाणे येथे दोन व उल्हासनगर येथील एकाचा पावसादरम्यान मृत्यू झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाने सांगितले. यामध्ये ठाणे येथील मनोरुग्णालयाच्या वसाहतीमधील संतोष जाधव (१८) हा तरुण घरात पाणी शिरले असता फ्रीज हलवत असताना विजेचा शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. तर, दिवा येथील डीजे कम्पाउंडजवळील नाल्यात सुनीत पुनीत (३०) हा तरुण नाल्यात पडून दगावला. तर, उल्हासनगर येथील गौरीपाडा येथील मनीष चव्हाण या तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. तर, उल्हासनगर येथील कॅम्प नंबर १मध्ये एका बालिकेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.जिल्हाभरातील या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. मात्र, निर्णय घेण्यास विलंब झाल्यामुळे काही शाळा सुरू झाल्या होत्या. या दरम्यान शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना घरी सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शाळांवर सोपवली होती. रेल्वेसेवा पार कोलमडली आहे. सकाळच्या कालावधीत काही ठिकाणी उपनगरीय गाड्यांची सेवा काही काळ बंद करावी लागली. ठाणे स्टेशन परिसरात रेल्वेरुळांवर पाणी साचले होते. त्यानंतर, दुपारी सुमारे दीड तास उशिराने उपनगरीय गाड्यांची वाहतूक सुरू राहिली.सकाळच्या कालावधीत उल्हास नदीच्या पुराचे पाणी वाढल्यामुळे कल्याण-अहमदनगर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. या महामार्गावरील माळशेज घाटातील अंबेवळणावर एक झाड पडले. ते त्वरित हटवण्याचे कामही महामार्ग बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्याचे उपकार्यकारी अभियंता सुनील पाटील यांनी सांगितले.कल्याण रेल्वेस्थानकातील छतगळतीमुळे प्लॅटफॉर्मवर पाणीचपाणी झाल्यामुळे प्रवाशांना उभे राहण्यात अडथळा निर्माण झाला.याशिवाय कल्याण स्टेशन परिसरातही पाणी साचले. तर, टाटा पॉवर हाउस, वरपगाव, म्हारळ, कांबा, टिटवाळा परिसरातील रुंदे आदी परिसरांत पाणी साचले.सर्वाधिक शहापूर तालुक्यातसर्वाधिक पाऊस शहापूर तालुक्यात १४० मिमी, भिवंडी तालुक्यात १३० मिमी, कल्याणला १५८, मुरबाडला १२५, अंबरनाथला ११२, उल्हासनगरला १०८ आणि ठाणे शहरात ११७ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९७.०२ टक्के पाऊस पडला.

टॅग्स :Rainपाऊस