शहरं
Join us  
Trending Stories
1
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
2
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
3
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
4
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
5
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
6
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
7
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
8
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
9
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
10
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
11
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
12
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
13
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
14
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
15
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
16
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
17
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
18
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
19
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
20
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!

भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडल्याने सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 02:33 IST

कल्याण-अहमदनगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील नद्या पुराच्या पाण्यामुळे शनिवारी दुथडी भरून वाहत होत्या. सततच्या पावसामुळे भातसा धरणाचे पाच दरवाजे २.५० मीटर इतके उघडण्यात आले. धरणातून भातसा नदीत सुमारे ९३४ क्युसेस पाणी सोडण्यात आले होते.या नदीच्या काठावरील शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल, सापगाव व नदीकाठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. या काळात वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याच्या व दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी दिल्या आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ८९० मिमी पाऊस पडला. या पावसाची सरासरी १२७.१४ मिमीनोंद घेण्यात आली.दरम्यान, ठाणे येथे दोन व उल्हासनगर येथील एकाचा पावसादरम्यान मृत्यू झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाने सांगितले. यामध्ये ठाणे येथील मनोरुग्णालयाच्या वसाहतीमधील संतोष जाधव (१८) हा तरुण घरात पाणी शिरले असता फ्रीज हलवत असताना विजेचा शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. तर, दिवा येथील डीजे कम्पाउंडजवळील नाल्यात सुनीत पुनीत (३०) हा तरुण नाल्यात पडून दगावला. तर, उल्हासनगर येथील गौरीपाडा येथील मनीष चव्हाण या तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. तर, उल्हासनगर येथील कॅम्प नंबर १मध्ये एका बालिकेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.जिल्हाभरातील या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. मात्र, निर्णय घेण्यास विलंब झाल्यामुळे काही शाळा सुरू झाल्या होत्या. या दरम्यान शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना घरी सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शाळांवर सोपवली होती. रेल्वेसेवा पार कोलमडली आहे. सकाळच्या कालावधीत काही ठिकाणी उपनगरीय गाड्यांची सेवा काही काळ बंद करावी लागली. ठाणे स्टेशन परिसरात रेल्वेरुळांवर पाणी साचले होते. त्यानंतर, दुपारी सुमारे दीड तास उशिराने उपनगरीय गाड्यांची वाहतूक सुरू राहिली.सकाळच्या कालावधीत उल्हास नदीच्या पुराचे पाणी वाढल्यामुळे कल्याण-अहमदनगर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. या महामार्गावरील माळशेज घाटातील अंबेवळणावर एक झाड पडले. ते त्वरित हटवण्याचे कामही महामार्ग बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्याचे उपकार्यकारी अभियंता सुनील पाटील यांनी सांगितले.कल्याण रेल्वेस्थानकातील छतगळतीमुळे प्लॅटफॉर्मवर पाणीचपाणी झाल्यामुळे प्रवाशांना उभे राहण्यात अडथळा निर्माण झाला.याशिवाय कल्याण स्टेशन परिसरातही पाणी साचले. तर, टाटा पॉवर हाउस, वरपगाव, म्हारळ, कांबा, टिटवाळा परिसरातील रुंदे आदी परिसरांत पाणी साचले.सर्वाधिक शहापूर तालुक्यातसर्वाधिक पाऊस शहापूर तालुक्यात १४० मिमी, भिवंडी तालुक्यात १३० मिमी, कल्याणला १५८, मुरबाडला १२५, अंबरनाथला ११२, उल्हासनगरला १०८ आणि ठाणे शहरात ११७ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९७.०२ टक्के पाऊस पडला.

टॅग्स :Rainपाऊस