शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

अजित पवार म्हणाले सुत्रधार कोण? घटनेनंतर मुख्यमंत्री संबंधित महिलेसोबत फोटोत दिसतात

By अजित मांडके | Updated: November 14, 2022 20:39 IST

मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे

ठाणे  : कायदे कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून तयार केलेले आहेत. मात्र त्याच कायद्यांचा अशा चुकीच्या पध्दतीने वापर होत असेल तर ते नक्कीच चुकीचं आहे. त्यातही न केलेल्या गुन्ह्यात अडकवले जात असेल तर तो माणूस खचणारच. त्यामुळेच व्यतीथ होऊन आव्हाड यांनी राजीनामा दिलेला आहे. मात्र, आव्हाड हे शरद पवार यांना दैवत मानतात. त्यांचा शब्द ते महत्वपूर्ण मानतात. त्यामुळे त्यांचा जो निर्णय असेल तो आव्हाड यांना पाळावाच लागेल असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठाण्यात केले. तसेच, यामागे निश्चितच एक षडयंत्र असून त्यात गोवण्याचा प्रकार होत असून यामागे नेमके कोण आहे, ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री त्या महिलेसोबत दिसत असल्याचे फोटो दिसत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारची योग्य चौकशी करुन जे जे या प्रकरणात दोषी असतील व त्याचा मुख्य सुत्रधार कोण याचा शोध घेऊन त्यांच्यावर त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.                 मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांना समजविण्यासाठी पवार हे ठाण्यात आले होते. ७२ तासात राज्याच्या माजी कॅबीनेट मंत्र्यांवर दोन दोन गुन्हे दाखल होतात, हे घाणरडे राजकारण सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. आज सरकार बदलेले आहे, म्हणून विरोधकांचा आवाज अशा पध्दतीने दाबण्याचा प्रयत्न जर सरकार करीत असेल तर ही लाजीरवाणी बाब आहे. सरकार येत असते, जात असते, कोणी कायम तेथे बसायला आलेला नसतो. जोर्पयत 145 आमदारांचा पाठींबा असतो, तो र्पयत ती व्यक्ती त्या ठिकाणी बसू शकते, हे अनेक वेळा सिध्द झालेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवे होते, किंबहुना पोलिसांनी हे सांगणो अपेक्षित होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. परंतु अशा पध्दतीने राजकारण होणार असेल तर लोकशाही, संविधान, कायदा, नियम, घटना या सगळयांनाच तिलांजली देण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जातीने लक्ष घातले पाहिजे. परंतु कायदयाचा आधार घेऊन निष्पाप व्यक्तीवर अन्याय होत असेल तर ते योग्य नाही. पोलीस दबावाखाली वागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आमच्याकडेही साडेसतरा वर्षे गृहखाते होते, मात्र आम्ही अशा पध्दतीने कायद्यांची पायमल्ली केली गेली नाही. त्यामुळे राजीनामा देता आव्हाड यांनी एकजूटपणो या विरोधात लढा देऊ असेही त्यांनी सांगितले. अधिवेषणात याविरोधात आवाज उचलला जाईल आणि जाब विचारला जाईल असेही त्यांनी सांगितले.

मध्यावती निवडणुकांची शक्यता नाही - पवार

सध्यातरी कुठेही मध्यवती निवडणुका लागणार नाहीत. असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. सध्याच्या सरकारकडे १४५ आमदारांचा पाठींबा आहे, आणि तो कुठे कमी होईल असे चित्र दिसत नाही. महाविकास आघाडीचे सरकार असतांनाही त्यांच्याकडेही १४५ आमदारांचे संख्याबळ होते. मात्र, एक गट बाहेर पडल्याने सरकार कोसळले. परंतु संजय राऊत यांनी हे विधान कसे केले, याची माहिती मी त्यांच्याशी चर्चा करुनच देईन. मात्र, तुर्तास मध्यावती निवडणुका लागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेCrime Newsगुन्हेगारीthaneठाणे