शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

अजित पवार म्हणाले सुत्रधार कोण? घटनेनंतर मुख्यमंत्री संबंधित महिलेसोबत फोटोत दिसतात

By अजित मांडके | Updated: November 14, 2022 20:39 IST

मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे

ठाणे  : कायदे कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून तयार केलेले आहेत. मात्र त्याच कायद्यांचा अशा चुकीच्या पध्दतीने वापर होत असेल तर ते नक्कीच चुकीचं आहे. त्यातही न केलेल्या गुन्ह्यात अडकवले जात असेल तर तो माणूस खचणारच. त्यामुळेच व्यतीथ होऊन आव्हाड यांनी राजीनामा दिलेला आहे. मात्र, आव्हाड हे शरद पवार यांना दैवत मानतात. त्यांचा शब्द ते महत्वपूर्ण मानतात. त्यामुळे त्यांचा जो निर्णय असेल तो आव्हाड यांना पाळावाच लागेल असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठाण्यात केले. तसेच, यामागे निश्चितच एक षडयंत्र असून त्यात गोवण्याचा प्रकार होत असून यामागे नेमके कोण आहे, ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री त्या महिलेसोबत दिसत असल्याचे फोटो दिसत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारची योग्य चौकशी करुन जे जे या प्रकरणात दोषी असतील व त्याचा मुख्य सुत्रधार कोण याचा शोध घेऊन त्यांच्यावर त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.                 मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांना समजविण्यासाठी पवार हे ठाण्यात आले होते. ७२ तासात राज्याच्या माजी कॅबीनेट मंत्र्यांवर दोन दोन गुन्हे दाखल होतात, हे घाणरडे राजकारण सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. आज सरकार बदलेले आहे, म्हणून विरोधकांचा आवाज अशा पध्दतीने दाबण्याचा प्रयत्न जर सरकार करीत असेल तर ही लाजीरवाणी बाब आहे. सरकार येत असते, जात असते, कोणी कायम तेथे बसायला आलेला नसतो. जोर्पयत 145 आमदारांचा पाठींबा असतो, तो र्पयत ती व्यक्ती त्या ठिकाणी बसू शकते, हे अनेक वेळा सिध्द झालेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवे होते, किंबहुना पोलिसांनी हे सांगणो अपेक्षित होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. परंतु अशा पध्दतीने राजकारण होणार असेल तर लोकशाही, संविधान, कायदा, नियम, घटना या सगळयांनाच तिलांजली देण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जातीने लक्ष घातले पाहिजे. परंतु कायदयाचा आधार घेऊन निष्पाप व्यक्तीवर अन्याय होत असेल तर ते योग्य नाही. पोलीस दबावाखाली वागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आमच्याकडेही साडेसतरा वर्षे गृहखाते होते, मात्र आम्ही अशा पध्दतीने कायद्यांची पायमल्ली केली गेली नाही. त्यामुळे राजीनामा देता आव्हाड यांनी एकजूटपणो या विरोधात लढा देऊ असेही त्यांनी सांगितले. अधिवेषणात याविरोधात आवाज उचलला जाईल आणि जाब विचारला जाईल असेही त्यांनी सांगितले.

मध्यावती निवडणुकांची शक्यता नाही - पवार

सध्यातरी कुठेही मध्यवती निवडणुका लागणार नाहीत. असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. सध्याच्या सरकारकडे १४५ आमदारांचा पाठींबा आहे, आणि तो कुठे कमी होईल असे चित्र दिसत नाही. महाविकास आघाडीचे सरकार असतांनाही त्यांच्याकडेही १४५ आमदारांचे संख्याबळ होते. मात्र, एक गट बाहेर पडल्याने सरकार कोसळले. परंतु संजय राऊत यांनी हे विधान कसे केले, याची माहिती मी त्यांच्याशी चर्चा करुनच देईन. मात्र, तुर्तास मध्यावती निवडणुका लागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेCrime Newsगुन्हेगारीthaneठाणे