शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

उल्हासनगरातील हवेतील गुणवत्ता मुंबईपेक्षा घातक, दमा व श्वास घेण्याच्या रुग्णांत वाढ

By सदानंद नाईक | Updated: November 7, 2023 18:57 IST

प्रदूषण मंडळाचे अनिरुद्ध वऱ्हाडे यांनीही हवेतील गुणवत्ता घसरल्याची माहिती दिली आहे.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरात सुरू असलेले भुयारी गटारीचे कामे, खड्डेमय रस्ते, वाहनांची संख्या, लहान-मोठें कारखाने आदीमुळे हवेतील गुणवत्ता मुंबई पेक्षा दुपटीने घसरली. याचा परिणाम मध्यवर्ती रुग्णालयात दमा, श्वास घेण्यास तत्रास आदी रुग्णांत वाढ झाल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली.

उल्हासनगरसह एमएमआरडीए क्षेत्रातील शहरातील हवेची गुणवत्ता घसरली आहे. शहरातील हवेची गुणवत्ता मुंबईसह इतर शहरा पेक्षा दुप्पटीने घसरल्याने उघड झाले. मुंबईची हवेतील गुणवत्ता १४९ एक्यूआर तर उल्हासनगरची २७९ एक्यूआर म्हणजे दुप्पट असल्याचे उघड झाले. हवेतील हे प्रदूषण आरोग्यासाठी घातक असल्याची माहिती हिराली फौंडेशनच्या अँड सरिता खानचंदानी यांनी दिली. याप्रकरणी उल्हासनगरसह इतर महापालिकेला नोटिसा पाठविल्याच्या त्या म्हणाल्या. शहरात ४१६ कोटीच्या निधीतून भुयारी गटारीचे काम सुरू असल्याने, नेताजी गार्डन, कॅम्प नं-४ येथील हिंदू स्मशानभूमी, कुर्ला कॅम्प रस्ता, शांतीनगर ते डॉल्फिन रस्ता विकास कामामुळे मातीने व धुळीने माखले आहे. 

शहरात भुयारी गटार योजनेचे काम संथगतीने सुरू असून गटारीचे काम पूर्ण होताच रस्ता दुरुस्त केले जात नाही. त्यामुळे सर्वत्र माती व धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. शहरात प्रमाणा पेक्षा जास्त वाहनांची संख्या असून लहान-मोठे कारखाने सुरू आहेत. हवेतील गुणवत्ता २५० एक्यूआर असल्याने, ती आरोग्यासाठी धोकादायक पातळीवर पोहचली आहे. प्रदूषण मंडळाचे अनिरुद्ध वऱ्हाडे यांनीही हवेतील गुणवत्ता घसरल्याची माहिती दिली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणulhasnagarउल्हासनगरthaneठाणेMumbaiमुंबई