शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

उल्हासनगरातील हवेतील गुणवत्ता मुंबईपेक्षा घातक, दमा व श्वास घेण्याच्या रुग्णांत वाढ

By सदानंद नाईक | Updated: November 7, 2023 18:57 IST

प्रदूषण मंडळाचे अनिरुद्ध वऱ्हाडे यांनीही हवेतील गुणवत्ता घसरल्याची माहिती दिली आहे.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरात सुरू असलेले भुयारी गटारीचे कामे, खड्डेमय रस्ते, वाहनांची संख्या, लहान-मोठें कारखाने आदीमुळे हवेतील गुणवत्ता मुंबई पेक्षा दुपटीने घसरली. याचा परिणाम मध्यवर्ती रुग्णालयात दमा, श्वास घेण्यास तत्रास आदी रुग्णांत वाढ झाल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली.

उल्हासनगरसह एमएमआरडीए क्षेत्रातील शहरातील हवेची गुणवत्ता घसरली आहे. शहरातील हवेची गुणवत्ता मुंबईसह इतर शहरा पेक्षा दुप्पटीने घसरल्याने उघड झाले. मुंबईची हवेतील गुणवत्ता १४९ एक्यूआर तर उल्हासनगरची २७९ एक्यूआर म्हणजे दुप्पट असल्याचे उघड झाले. हवेतील हे प्रदूषण आरोग्यासाठी घातक असल्याची माहिती हिराली फौंडेशनच्या अँड सरिता खानचंदानी यांनी दिली. याप्रकरणी उल्हासनगरसह इतर महापालिकेला नोटिसा पाठविल्याच्या त्या म्हणाल्या. शहरात ४१६ कोटीच्या निधीतून भुयारी गटारीचे काम सुरू असल्याने, नेताजी गार्डन, कॅम्प नं-४ येथील हिंदू स्मशानभूमी, कुर्ला कॅम्प रस्ता, शांतीनगर ते डॉल्फिन रस्ता विकास कामामुळे मातीने व धुळीने माखले आहे. 

शहरात भुयारी गटार योजनेचे काम संथगतीने सुरू असून गटारीचे काम पूर्ण होताच रस्ता दुरुस्त केले जात नाही. त्यामुळे सर्वत्र माती व धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. शहरात प्रमाणा पेक्षा जास्त वाहनांची संख्या असून लहान-मोठे कारखाने सुरू आहेत. हवेतील गुणवत्ता २५० एक्यूआर असल्याने, ती आरोग्यासाठी धोकादायक पातळीवर पोहचली आहे. प्रदूषण मंडळाचे अनिरुद्ध वऱ्हाडे यांनीही हवेतील गुणवत्ता घसरल्याची माहिती दिली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणulhasnagarउल्हासनगरthaneठाणेMumbaiमुंबई