शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

प्रचंड भराव अन् बेकायदा बांधकामामुळे पाली गावातील शेती पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 00:01 IST

निवेदनात मंडळाने म्हटले आहे कि, पाली गावचे पाणी जाण्याचा एकमेव मार्ग नवीखाडी असून तो प्रचंड भराव करून बंद केलेला आहे

मीरारोड - भाईंदर पाली गावातील ग्रामस्थांची शेती पाण्याखाली गेली आहे. पालिकेच्या धावगी डोंगरावरून येणाऱ्या डम्पिंगच्या घाण पाण्याचा लोंढा. त्यासोबतच, नैसर्गिक नाले व खाड्यामध्ये भराव करून बेकायदा बांधकामे आणि मोकळ्या जमिनीत झालेली वारेमाप भरणी यामुळे हा परिसर पाण्याखाली गेला आहे. पालीगाव उत्कर्ष मंडळाने महापालिका आयुक्तांसह अपर तहसीलदार, तलाठी व स्थानिक ३ नगरसेवकांना गेल्यावर्षीपासून लेखी निवेदने दिली आहेत. 

निवेदनात मंडळाने म्हटले आहे कि, पाली गावचे पाणी जाण्याचा एकमेव मार्ग नवीखाडी असून तो प्रचंड भराव करून बंद केलेला आहे. उत्तर भागातील इतर नाले देखील बंद केले आहेत. त्यामुळे धावगी डोंगरावरील कचरा डम्पिंगमधून येणारे घाणीचे पाणी शेतात व पाली गावात शिरून लोकांच्या आरोग्याचे प्रश्न गंभीर बनले आहेत. शेतात जूनमध्ये पेरणी केलेले भात पीक पाण्याखाली गेले आहे. तर, डंपिंग ग्राउंड येथील काँक्रिट भिंत तोडून घाण पाणी शेतात सोडण्यात आले आहे. 

परिसरात मोठ्या प्रमाणात भराव होत असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. डम्पिंगच्या घाण पाण्या मुळे पावसाळ्यात मिळणारे चिवनी मासे सुद्धा दुर्मिळ झाले आहेत. स्थानिक नरसेविका शर्मिला बगाजी यांनी पालिकेच्या माध्यमातून जेसीबी उपलब्ध करून घेतसुद्धा जेसेपी घेऊन पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, ते उपयोगी ठरले नाहीत. पाली ग्रामस्थांसह उत्तर भागातील स्थानिकांनी देखील वारेमाप बेकायदा भराव व अनधिकृत बांधकामांनी खाडीपात्र व नैसर्गिक नाले बंद होत असल्याच्या तसेच मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात भराव केले गेल्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून करून देखील महापालिका, महसूल व राजकारणी- नगरसेवक यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक चालविल्याने दरवर्षी परिस्थिती आणखी गंभीर बनत चालल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीpali-pcपालीmira roadमीरा रोड