शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

प्रचंड भराव अन् बेकायदा बांधकामामुळे पाली गावातील शेती पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 00:01 IST

निवेदनात मंडळाने म्हटले आहे कि, पाली गावचे पाणी जाण्याचा एकमेव मार्ग नवीखाडी असून तो प्रचंड भराव करून बंद केलेला आहे

मीरारोड - भाईंदर पाली गावातील ग्रामस्थांची शेती पाण्याखाली गेली आहे. पालिकेच्या धावगी डोंगरावरून येणाऱ्या डम्पिंगच्या घाण पाण्याचा लोंढा. त्यासोबतच, नैसर्गिक नाले व खाड्यामध्ये भराव करून बेकायदा बांधकामे आणि मोकळ्या जमिनीत झालेली वारेमाप भरणी यामुळे हा परिसर पाण्याखाली गेला आहे. पालीगाव उत्कर्ष मंडळाने महापालिका आयुक्तांसह अपर तहसीलदार, तलाठी व स्थानिक ३ नगरसेवकांना गेल्यावर्षीपासून लेखी निवेदने दिली आहेत. 

निवेदनात मंडळाने म्हटले आहे कि, पाली गावचे पाणी जाण्याचा एकमेव मार्ग नवीखाडी असून तो प्रचंड भराव करून बंद केलेला आहे. उत्तर भागातील इतर नाले देखील बंद केले आहेत. त्यामुळे धावगी डोंगरावरील कचरा डम्पिंगमधून येणारे घाणीचे पाणी शेतात व पाली गावात शिरून लोकांच्या आरोग्याचे प्रश्न गंभीर बनले आहेत. शेतात जूनमध्ये पेरणी केलेले भात पीक पाण्याखाली गेले आहे. तर, डंपिंग ग्राउंड येथील काँक्रिट भिंत तोडून घाण पाणी शेतात सोडण्यात आले आहे. 

परिसरात मोठ्या प्रमाणात भराव होत असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. डम्पिंगच्या घाण पाण्या मुळे पावसाळ्यात मिळणारे चिवनी मासे सुद्धा दुर्मिळ झाले आहेत. स्थानिक नरसेविका शर्मिला बगाजी यांनी पालिकेच्या माध्यमातून जेसीबी उपलब्ध करून घेतसुद्धा जेसेपी घेऊन पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, ते उपयोगी ठरले नाहीत. पाली ग्रामस्थांसह उत्तर भागातील स्थानिकांनी देखील वारेमाप बेकायदा भराव व अनधिकृत बांधकामांनी खाडीपात्र व नैसर्गिक नाले बंद होत असल्याच्या तसेच मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात भराव केले गेल्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून करून देखील महापालिका, महसूल व राजकारणी- नगरसेवक यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक चालविल्याने दरवर्षी परिस्थिती आणखी गंभीर बनत चालल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीpali-pcपालीmira roadमीरा रोड