शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

आगरी-कोळीबांधवांचा लाँग मार्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 05:09 IST

जिल्हाधिकारी कार्यालयावर एकदिवसीय धरणे आंदोलन : शेतजमिनी न देण्याचा इशारा

ठाणे : विविध कारणांसाठी शासनाने घेतलेल्या भूमिपुत्रांच्या जमिनी परत करा, कोस्टल रोड रद्द करा, गावठाण कोळीवाड्यांचे सीमांकन निश्चित करा, अशा विविध घोषणा करून बुधवारी आगरी-कोळीबांधव जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धडकले होते. यावेळी राबोडी ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा लॉँग मार्च काढून एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

२० डिसेंबरच्या महासभेत महापालिका प्रशासनाने पाच भागांमध्ये क्लस्टर राबवण्याचा प्रस्ताव पटलावर ठेवला आहे. त्यात गावठाण आणि कोळीवाडे वगळल्याचाही उल्लेख केला आहे. त्यामुळेच त्याविरोधात गावठाण आणि कोळीवाड्यांनी एकत्र येऊन बुधवारी आवाज उठवला. बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, माजिवडे, राबोडी, कळवा आणि घोडबंदर भागातील शेतजमिनी औद्योगिक प्रयोजनाकरिता घेतल्या. त्यासाठी काही शेतकऱ्यांना अत्यल्प, तर काहींना मोबदलाच दिलेला नाही. आता या जमिनींचे प्रयोजन बदलून निवासी बांधकामे असे केले जात आहे. मात्र, या प्रक्रि येमुळे मूळ मालक असलेल्यांना साधी बाजू मांडण्याची संधीही दिली नसल्याचे या शेतकºयांचे म्हणणे आहे. क्लस्टर राबवत असताना गावठाण आणि कोळीवाड्यांचे सीमांकन निश्चित केलेले नाही. असे असतानाही तिचा प्रस्ताव महासभेत आलाच कसा, असा सवाल यावेळी शेतकºयांनी केला.या आंदोलनाच्या निमित्ताने घोडबंदर भागातील कोस्टल रोडचा मुद्दाही यानिमित्ताने पुन्हा एकदा रडारवर आला. तो भूमिपुत्रांच्या दृष्टीने चुकीचा असून त्यामुळे त्यांच्या जमिनी जाणार असल्याचा दावा या शेतकºयांनी केला. यापूर्वी विविध विकासकामांसाठी घेतलेल्या जमिनींबाबत अनेकांना अजून योग्य तो मोबदला मिळालेला नाही. असे असताना पुन्हा नवनवीन प्रस्ताव प्रशासनाने पुढे आणले आहेत. त्यामुळे प्रस्तावित कोस्टल रोडला भूमिपुत्रांचा विरोध असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवाय, मेट्रो कास्टिंग यार्ड प्रकल्पास नागरिकांचा विरोध असून त्यासाठी शेतकरी जमीन देण्यास तयार नाहीत. खाडीकिनारी भराव टाकून कांदळवन नष्ट केले जात असून त्याकडेही दुर्लक्ष झाले आहे. या सर्व मागण्यांकडे राज्य शासन आणि महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी राबोडी पोलीस चौकी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा लाँग मार्च काढला होता.प्रशासनावर दबाव टाकाराष्ट्रवादीने या आगरी-कोळीबांधवांची भेट घेऊन त्यांच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला. महापालिकेत सत्ता शिवसेनेची असल्याने आगरी-कोळी समाजातील शिवसेनेच्या प्रतिनिधींनी प्रशासनावर दबाव टाकावा, असे आवाहन यावेळी राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. गावठाणे आणि कोळीवाड्यांचे आधी सीमांकन निश्चित करावे. बुलेट ट्रेनसाठी जाणाºया जमिनींविरोधातही आम्ही शेतकºयांसोबत असल्याचे आश्वासन यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले.

टॅग्स :Morchaमोर्चाthaneठाणे