शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

आगरी-कोळीबांधवांचा लाँग मार्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 05:09 IST

जिल्हाधिकारी कार्यालयावर एकदिवसीय धरणे आंदोलन : शेतजमिनी न देण्याचा इशारा

ठाणे : विविध कारणांसाठी शासनाने घेतलेल्या भूमिपुत्रांच्या जमिनी परत करा, कोस्टल रोड रद्द करा, गावठाण कोळीवाड्यांचे सीमांकन निश्चित करा, अशा विविध घोषणा करून बुधवारी आगरी-कोळीबांधव जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धडकले होते. यावेळी राबोडी ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा लॉँग मार्च काढून एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

२० डिसेंबरच्या महासभेत महापालिका प्रशासनाने पाच भागांमध्ये क्लस्टर राबवण्याचा प्रस्ताव पटलावर ठेवला आहे. त्यात गावठाण आणि कोळीवाडे वगळल्याचाही उल्लेख केला आहे. त्यामुळेच त्याविरोधात गावठाण आणि कोळीवाड्यांनी एकत्र येऊन बुधवारी आवाज उठवला. बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, माजिवडे, राबोडी, कळवा आणि घोडबंदर भागातील शेतजमिनी औद्योगिक प्रयोजनाकरिता घेतल्या. त्यासाठी काही शेतकऱ्यांना अत्यल्प, तर काहींना मोबदलाच दिलेला नाही. आता या जमिनींचे प्रयोजन बदलून निवासी बांधकामे असे केले जात आहे. मात्र, या प्रक्रि येमुळे मूळ मालक असलेल्यांना साधी बाजू मांडण्याची संधीही दिली नसल्याचे या शेतकºयांचे म्हणणे आहे. क्लस्टर राबवत असताना गावठाण आणि कोळीवाड्यांचे सीमांकन निश्चित केलेले नाही. असे असतानाही तिचा प्रस्ताव महासभेत आलाच कसा, असा सवाल यावेळी शेतकºयांनी केला.या आंदोलनाच्या निमित्ताने घोडबंदर भागातील कोस्टल रोडचा मुद्दाही यानिमित्ताने पुन्हा एकदा रडारवर आला. तो भूमिपुत्रांच्या दृष्टीने चुकीचा असून त्यामुळे त्यांच्या जमिनी जाणार असल्याचा दावा या शेतकºयांनी केला. यापूर्वी विविध विकासकामांसाठी घेतलेल्या जमिनींबाबत अनेकांना अजून योग्य तो मोबदला मिळालेला नाही. असे असताना पुन्हा नवनवीन प्रस्ताव प्रशासनाने पुढे आणले आहेत. त्यामुळे प्रस्तावित कोस्टल रोडला भूमिपुत्रांचा विरोध असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवाय, मेट्रो कास्टिंग यार्ड प्रकल्पास नागरिकांचा विरोध असून त्यासाठी शेतकरी जमीन देण्यास तयार नाहीत. खाडीकिनारी भराव टाकून कांदळवन नष्ट केले जात असून त्याकडेही दुर्लक्ष झाले आहे. या सर्व मागण्यांकडे राज्य शासन आणि महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी राबोडी पोलीस चौकी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा लाँग मार्च काढला होता.प्रशासनावर दबाव टाकाराष्ट्रवादीने या आगरी-कोळीबांधवांची भेट घेऊन त्यांच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला. महापालिकेत सत्ता शिवसेनेची असल्याने आगरी-कोळी समाजातील शिवसेनेच्या प्रतिनिधींनी प्रशासनावर दबाव टाकावा, असे आवाहन यावेळी राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. गावठाणे आणि कोळीवाड्यांचे आधी सीमांकन निश्चित करावे. बुलेट ट्रेनसाठी जाणाºया जमिनींविरोधातही आम्ही शेतकºयांसोबत असल्याचे आश्वासन यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले.

टॅग्स :Morchaमोर्चाthaneठाणे