शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ट्रायच्या नव्या धोरणाच्या विरोधात जिल्ह्यातील केबल ऑपरेटरचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 14:36 IST

ट्रायने लागू केलेल्या नव्या धोरणाच्या विरोधात सोमवारी ठाणे जिल्हा केबल सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी वाढीव कमीशन मिळावे अशी मागणी त्यांनी केली.

ठळक मुद्दे४० टक्के कमीशन मिळावेकेंद्राने योग्य तो तोडगा काढावा

ठाणे - नव्या वर्षात आता ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनेल पाहण्याची आणि जेवढे चॅनेल पाहतोय त्याचेच पैसे देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. परंतु ट्रायच्याय ा निर्णया विरोधात सोमवारी ठाणे जिल्हा केबल सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे एक निवदेनही देण्यात आले असून केबल चालकांना ४० टक्के कमीशन मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. येत्या १ जानेवारी पासून ग्राहकांना आपल्या आवडीची वाहीन्या बघण्याची संधी मिळणार आहे. सध्या ठाणे किंवा इतर ठिकाणांचा विचार केल्यास या भागांमध्ये केबल आॅपरेटर मोठ्या संख्येने कार्यरत आहे. केवळ ठाण्यातच ३५० च्या आसपास केबल आॅपरेटर असून त्यामध्ये १ हजारांच्या आसपास कामगार काम करीत आहेत. तर ठाण्यात केबल ग्राहकांचे २ लाखांच्या आसपास जाळे पसरले आहे. परंतु या नव्या धोरणानुसार केवळ ग्राहकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचाच प्रयत्न असल्याचा दावा ठाणे जिल्हा केबल सेनेने केला आहे. ग्राहकांना साधे बेसीक चॅनेल बघायचे असतील तरी सुध्दा हा खर्च ४८० रुपयांच्या आसपास जाणार आहे. त्यामुळे आता नव्या धोरणानुसार जास्तीचे पैसे ग्राहकांना मोजावे लागणार असून केबल आॅपरेटवाल्यांचेही नुकसान होणार असल्याचे मत ठाणे जिल्हा केबल सेनेचे अध्यक्ष मंगेश वाळुंज यांनी व्यक्त केले आहे. या नव्या धोरणानुसार केबल आॅपरेटरला यामधून केवळ १० टक्केच कमीशन मिळणार आहे. जे १० टक्के कमीशन मिळणार आहे. त्यातून कामगारांचे पगार द्यायचे कसे, तांत्रिक दुरुस्तीची कामे असतात, नवीन तंत्रज्ञान विकसित होत असते, त्याचा खर्च भागवायचा कसा असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे. तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेले हजारो कुटुंबे बेघर होतील अशी भितीही यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.

केंद्राच्या ट्रायच्या नियमावलीमुळे केबल आॅपरेर्टसचे नुकसान होणार आहे. केवळ रोजगाराच्या माध्यमातून हे आॅपरेटर काम करीत होते. त्यात मिळणारे उत्पन्न ही कमी आहे. त्यात आता नव्या धोरणानुसार उत्पन्नात आणखी कमी होणार आहे. या सर्वांवर उपासमारीची वेळ येणार आहे. भविष्यात ट्रायने या केबल आॅपरेटवर अन्याय होणार नाही, त्या दृष्टीने केंद्राने यात मध्यस्ती करुन योग्य तो तोडगा काढला पाहिजे.(प्रताप सरनाईक - आमदार, शिवसेना)

कमीत कमी ४० टक्के कमीशन मिळावे अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. परंतु यावर योग्य तो तोडगा निघाला नाही तर मात्र नव्या वर्षात पुन्हा यापेक्षाही गंभीर आंदोलन उभारले जाईल.(मंगेश वाळुंज - अध्यक्ष - ठाणे जिल्हा केबल सेना) 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त