शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

रस्त्यावर पडलेले खड्डे व दुभाजकाविरोधात; ठामपा मुख्यालयासमोर काॅग्रेसचे आंदोलन

By अजित मांडके | Updated: July 31, 2023 14:40 IST

ठाणे शहर काॅग्रेसच्या वतीने ठामपा मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन केले.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : पावसाळ्यात ठाणे महानगर पालिका हद्दीतील जागोजागी पडलेले खड्डे व विविध रस्त्यांवर लावण्यात आलेले अनावश्यक दुभाजक याच्या विरोधात ठाणे शहर काॅग्रेसच्या वतीने ठामपा मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन केले.

पावसाळा सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच ठाण्यातील विविध महत्वाच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे व यामुळेच होत असलेली वाहतूक कोंडी यामुळे ठाण्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून या विरोधात काॅग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ठामपा मुख्यालयासमोर शहराध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण याच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करून आपला संताप व्यक्त केला.  या प्रसंगी प्रदेश सचिव व ठाणे प्रभारी संतोष किणे,काॅग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे,सेवादल अध्यक्ष शेखर पाटील,महिला अध्यक्षा वैशाली भोसले,प्रदेश सदस्य जे.बी.यादव,शकीला शेख,महेद्र म्हात्रे,निशिकांत कोळी,रमेश ईदिसे,प्रवक्ते राहुल पिंगळे,रविंद्र कोळी,मंजूर खत्री,स्वप्नील कोळी,शिरीष घरत,चंद्रकांत मोहीते,प्रकाश मांडवकर आदीसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना विक्रांत चव्हाण यांनी सागितले की,पावसाळ्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांसह ठाण्यातील रस्त्यावरील खड्ड्याबाबत पाहणी दौरा झाला होता. मोठ्या प्रमाणात फोटोसेशन करण्यात आले होते, जागोजागी खड्डेमुक्त ठाणे अशा प्रकारचे फलक लावण्यात आले होते. परंतु पहिल्याच पावसात रस्त्यांवरील खड्ड्याबाबत खरे चित्र समोर आले आहे.  ठाण्यातील प्रत्येक रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. जिथे जिथे वर्षानुवर्ष पावसाळ्यात पाणी तुंबत होते, तिथे आजही तिच अवस्था आहे. कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता कामे करण्यात आल्यामुळे हि परिस्थिती ओढवली आहे,मुख्यमंत्र्यांना चुकीची माहीती देण्यात येते मुख्यमंत्र्यानी स्वतःच्या वागळे इस्टेट परिसरातील रस्त्यांची पाहणी केली तरी त्याना खरी परिस्थिती लक्षात येईल. ठामपा प्रशासन म्हणते की सर्व चांगले आहे तर आयुक्तांनीच माझ्याबरोबर फिरावे मी त्यांना ठीकठीकानी नेऊन परिस्थिती दाखवेल रस्त्यांच्या कामात १६ टक्के कमिशन घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी याप्रसंगी केला मग दर्जा कसा मिळणार? असा सवालही विक्रांत चव्हाण यानी केला.अनावश्यक ठीकाणी लावण्यात आलेल्या दुभाजकामुळे वाहतूक कोंडी वाढत चालली आहे असेही चव्हाण यानी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेस