शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
3
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
4
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
5
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
6
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
7
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
8
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
9
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
10
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
11
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
12
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
13
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
14
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
15
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
16
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
17
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
18
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
19
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
20
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान

पुन्हा राजकारण्यांनी भिवंडीकरांच्या तोंडाला पुसली पाने

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 7:42 PM

शहराबाहेर असलेल्या भिवंडीरोड रेल्वेस्थानकातून मुंबई लोकल सुरू करण्यात राजकारण्यांना यश आले नाही.निदान शहरातील नागरिकांजवळ आलेली मेट्रो आता राजकारण्यांनी शहराबाहेरून वळविल्याने शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे

भिवंडी : शहराबाहेर असलेल्या भिवंडीरोड रेल्वेस्थानकातून मुंबई लोकल सुरू करण्यात राजकारण्यांना यश आले नाही.निदान शहरातील नागरिकांजवळ आलेली मेट्रो आता राजकारण्यांनी शहराबाहेरून वळविल्याने शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही वर्षापासून मेट्रो रेल्वे भिवंडीत येणार असे सांगत राजकारण्यांनी भिवंडीकरांच्या तोंडाला पाने पुसल्याचे उघड झाले असुन विकासकांसाठी ही रेल्वे शहराबाहेर वळविल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

राज्यात काँग्रेसची सत्ता असताना मंत्री भाऊसाहेब वर्तक व खासदार भाऊसाहेब धामणकर यांनी ठाणे ते डहाणू रेल्वे भिवंडी शहरातून नेण्याचा प्रयत्न सुरू केला होता.परंतू केंद्र सरकारकडून या प्रस्तावाला गती मिळाली नाही.त्यानंतर शहरातील कापड उद्योगाला गती मिळावी या करीता दिवा-वसईरोड दरम्यान भिवंडी रोड रेल्वेस्थानक सुरू करून या रेल्वेमार्गावर प्रवासी वहातूकीपेक्षा मालगाडी वहातूकीस जास्त प्राधान्य देण्यात आले.देशांमधील प्रत्येक राज्यातून आलेला व्यक्ती शहरात कापड व्यावसायीक अथवा कामगार म्हणून काम करीत आहे.गेल्या काही वर्षापासून येथील ग्रामिण भागात झालेल्या गोदामांत देखील मोठ्या संख्येने रोजगार निर्माण झाला आहे.असे असताना त्यांच्या प्रवासी सेवेसाठी राज्यकर्ते नेहमी उदासीन असल्याचे दिसुन आले.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ ही रेल्वे कापुरबावडी-अंजूरफाटा ते गोपाळनगर नंतर पुढे कल्याण येथे जाणार होती.आता ही रेल्वे अंजूरफाटा येथुन ओसवालवाडी ताडालीमार्गे गणेशनगर-टेमघर अशी मुळ शहराबाहेरून पुढे कल्याण येथे जाणार असल्याने शहरातील लोकांना त्याचा फारसा काही उपयोग न होता त्यांच्या भिवंडीकरांच्या नशीबी सध्या असलेला त्रास कायम रहाणार आहे.पुर्वी भिवंडीरोड रेल्वेसाठी अंजूरफाटा गाठावा लागायचा आता मेट्रोसाठी तेथे जावे लागणार आहे.त्या ऐवजी अनेकांना सध्या सुरू असलेल्या खाजगी व सार्वजनिक प्रवासी सेवा उपयुक्त ठरणार आहे.म्हणजेच भिवंडीकरांना ही मेट्रो उपयुक्त न ठरता पुन्हा वहातूक कोंडीतून जावे लागणार आहे.गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक राजकारण्यांनी धामणकरनाका,गोपाळनगर पर्यंत मेट्रो येऊन नागरिकांची वहातूक कोंडीपासून सुटका झाल्याच्या वावड्या उठविल्या होत्या त्याला मेट्रोच्या नवीन जाहिर झालेल्या मार्गाने पुर्णविराम मिळाला असुन राजकारण्यांचा खरा चेहरा नागरिकांसमोर आला आहे. 

टॅग्स :Metroमेट्रो