शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांच्या मृत्यूनंतर राजकीय संघटना आक्रमक, अधिष्ठातांसह अधीक्षकांना घेराव

By जितेंद्र कालेकर | Updated: August 13, 2023 20:05 IST

रुग्णालयात एकाच रात्रीत मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याची ही बाब उघडकीस आल्यावर रविवारी सकाळपासून महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींसह मनसे आणि भाजप नेतेमंडळींनी रुग्णालयात धाव घेतली.

ठाणे : कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील १८ रुग्णांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, मनसेचे अविनाश जाधव आणि भाजपच्या नेत्यांनी रुग्णालयात धाव घेत रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि अधीक्षक यांना चांगलेच धारेवर धरले. रुग्णालयाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झाले असून अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर आणि अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांच्यावर निलंबनाची कारवाई करून मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आव्हाड यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

रुग्णालयात एकाच रात्रीत मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याची ही बाब उघडकीस आल्यावर रविवारी सकाळपासून महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींसह मनसे आणि भाजप नेतेमंडळींनी रुग्णालयात धाव घेतली. यामध्ये आव्हाड यांच्यासह भाजपा आमदार निरंजन डावखरे, उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुहास देसाई, भाजप शहराध्यक्ष संजय वाघुले आदींचा समावेश हाेता. या सर्व प्रकारामुळे रुग्णालयात डाॅ. बाराेट यांच्या केबिनमध्ये गोंधळ उडाला होता. या मृत्यूंसाठी महापालिका प्रशासन जबाबदार आहे. रुग्णालयात येण्यासाठी मोठे दरवाजे आहेत, पण बाहेर येण्यासाठी दरवाजा नाही, असा आरोपही आव्हाड यांनी केला. येथे पॅथॉलॉजी लॅब नाही. संपूर्ण प्रकरणाची चाैकशी करून ती जाहीर करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत धरले धारेवरमाणसे मारायची सुपारी घेतली आहे का? रुग्णालय प्रशासनाने ठाणेकरांची माफी मागावी, असा हल्लाबोल मनसेच्या अविनाश जाधव यांनी केला. औषधांचा तुटवडा आहे. स्कॅनिंगही काही वेळा बंद असते. रुग्ण जास्त झाले, तर मग तसा फलक का नाही लावला? तसे पत्रच मुख्यमंत्र्यांना द्यायला हवे होते, असा पवित्रा केदार दिघे यांनी घेतला. २४ तास शवविच्छेदन सेवा सुरू राहावी, असा ठराव महासभेत झाला, त्याचे काय झाले? असा सवालही यावेळी भाजपच्या संजय वाघुले यांनी केला. नेत्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत धारेवर धरले.

खासगी रुग्णालयांबरोबर समन्वय साधावा : डावखरेरुग्णांचे मृत्यू चिंताजनक आहेत. शहरातील खासगी रुग्णालयांबरोबर समन्वय साधून रुग्णांवर उपचार करावेत, अशी सूचना आमदार निरंजन डावखरे यांनी महापालिका प्रशासनाला केली. मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची विचारपूस करून डावखरे यांच्यासह राजकीय नेत्यांनी त्यांना धीर दिला. या रुग्णालयाला किती डाॅक्टरांची आणि कर्मचाऱ्यांची गरज आहे, असा सवाल आव्हाड आणि डावखरे यांनी केला. काेराेना काळातील डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांना गरज पडल्यास पुन्हा घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

आयुक्तांवर जबाबदारी निश्चित करावी : घाडीगावकरशिवाजी महाराजांच्या नावाने असणाऱ्या कळवा रुग्णालयात महापालिका सर्वसामान्य नागरिकांना पुरेशा सोयी-सुविधा देत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कळवा रुग्णालयासाठी वारंवार दुरुस्ती आणि इतर सामग्रीसाठी पाच वर्षांत देयक काढले आहे, हे पाहता महापालिका आयुक्त यांच्यावर खरी जबाबदारी निश्चित केली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलJitendra Awhadजितेंद्र आव्हाड