शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांच्या मृत्यूनंतर राजकीय संघटना आक्रमक, अधिष्ठातांसह अधीक्षकांना घेराव

By जितेंद्र कालेकर | Updated: August 13, 2023 20:05 IST

रुग्णालयात एकाच रात्रीत मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याची ही बाब उघडकीस आल्यावर रविवारी सकाळपासून महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींसह मनसे आणि भाजप नेतेमंडळींनी रुग्णालयात धाव घेतली.

ठाणे : कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील १८ रुग्णांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, मनसेचे अविनाश जाधव आणि भाजपच्या नेत्यांनी रुग्णालयात धाव घेत रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि अधीक्षक यांना चांगलेच धारेवर धरले. रुग्णालयाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झाले असून अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर आणि अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांच्यावर निलंबनाची कारवाई करून मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आव्हाड यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

रुग्णालयात एकाच रात्रीत मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याची ही बाब उघडकीस आल्यावर रविवारी सकाळपासून महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींसह मनसे आणि भाजप नेतेमंडळींनी रुग्णालयात धाव घेतली. यामध्ये आव्हाड यांच्यासह भाजपा आमदार निरंजन डावखरे, उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुहास देसाई, भाजप शहराध्यक्ष संजय वाघुले आदींचा समावेश हाेता. या सर्व प्रकारामुळे रुग्णालयात डाॅ. बाराेट यांच्या केबिनमध्ये गोंधळ उडाला होता. या मृत्यूंसाठी महापालिका प्रशासन जबाबदार आहे. रुग्णालयात येण्यासाठी मोठे दरवाजे आहेत, पण बाहेर येण्यासाठी दरवाजा नाही, असा आरोपही आव्हाड यांनी केला. येथे पॅथॉलॉजी लॅब नाही. संपूर्ण प्रकरणाची चाैकशी करून ती जाहीर करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत धरले धारेवरमाणसे मारायची सुपारी घेतली आहे का? रुग्णालय प्रशासनाने ठाणेकरांची माफी मागावी, असा हल्लाबोल मनसेच्या अविनाश जाधव यांनी केला. औषधांचा तुटवडा आहे. स्कॅनिंगही काही वेळा बंद असते. रुग्ण जास्त झाले, तर मग तसा फलक का नाही लावला? तसे पत्रच मुख्यमंत्र्यांना द्यायला हवे होते, असा पवित्रा केदार दिघे यांनी घेतला. २४ तास शवविच्छेदन सेवा सुरू राहावी, असा ठराव महासभेत झाला, त्याचे काय झाले? असा सवालही यावेळी भाजपच्या संजय वाघुले यांनी केला. नेत्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत धारेवर धरले.

खासगी रुग्णालयांबरोबर समन्वय साधावा : डावखरेरुग्णांचे मृत्यू चिंताजनक आहेत. शहरातील खासगी रुग्णालयांबरोबर समन्वय साधून रुग्णांवर उपचार करावेत, अशी सूचना आमदार निरंजन डावखरे यांनी महापालिका प्रशासनाला केली. मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची विचारपूस करून डावखरे यांच्यासह राजकीय नेत्यांनी त्यांना धीर दिला. या रुग्णालयाला किती डाॅक्टरांची आणि कर्मचाऱ्यांची गरज आहे, असा सवाल आव्हाड आणि डावखरे यांनी केला. काेराेना काळातील डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांना गरज पडल्यास पुन्हा घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

आयुक्तांवर जबाबदारी निश्चित करावी : घाडीगावकरशिवाजी महाराजांच्या नावाने असणाऱ्या कळवा रुग्णालयात महापालिका सर्वसामान्य नागरिकांना पुरेशा सोयी-सुविधा देत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कळवा रुग्णालयासाठी वारंवार दुरुस्ती आणि इतर सामग्रीसाठी पाच वर्षांत देयक काढले आहे, हे पाहता महापालिका आयुक्त यांच्यावर खरी जबाबदारी निश्चित केली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलJitendra Awhadजितेंद्र आव्हाड