शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

तानसा, मोडकसागरनंतर भातसाही भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 04:55 IST

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७६.९७ टक्के पाऊस झाला आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७६.९७ टक्के पाऊस झाला आहे. याचदरम्यान, धरण क्षेत्रातही पाऊस चांगला झाल्याने पुरेसा पाणीसाठा झाला असून, तानसा, मोडकसागरनंतर भातसा वाहू लागले आहे. समाधानकारक पावसामुळे मुंबईकरांपाठोपाठ ठाणेकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.बुधवारीही पावसाचा लपंडाव सुरू होता. सकाळी ८ वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्यात सरासरी ३१.०४ मिमी पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक ६० मिमी पाऊस शहापुरात नोंदविला आहे. त्याचपाठोपाठ मुरबाड ३७, ठाणे ३५, कल्याण ३१, अंबरनाथ २४.३० आणि उल्हासनगर-भिवंडीत प्रत्येकी १५ मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत (१ जून ते १८ जुलैदरम्यान) एकूण ५३८.५१ मिमी, तर सरासरी ७६.९७ मिमी इतका नोंदवला आहे. ठाण्यात ८७.१२, कल्याण ८०.६६, मुरबाड ६३.४७, उल्हासनगर ८१.४४, अंबरनाथ ७६.३०, भिवंडीत ८६.४६, शहापुरात ६३.०५ मिमी पाऊस झाला.जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने पाणीसाठाही वाढला आहे. त्यामध्ये मोडकसागर आणि तानसा ही धरणे जुलै महिन्यातच भरली आहेत. यामध्ये मोडकसागर धरणाचे ५ आणि ६ क्र मांकांचे दरवाजे दोन दिवसांपूर्वीच उघडून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे, तर तानसा धरणाचे दरवाजे मंगळवारी उघडून विसर्ग सुरू झाला आहे. भातसामध्ये ७८ टक्के साठा झाल्यावर दरवाजे उघडण्यात येणार आहेत. सध्या ते धरण ७२.६२ टक्के इतके भरले आहे.>पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव काठोकाठमुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव काठोकाठ भरले आहेत. यापैकी चार तलाव भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबईचे पाण्याचे टेन्शन मिटले आहे. हा आनंद पालिका प्रशासनाने स्थायी समितीत बुधवारी पेढे वाटून व्यक्त केला. जुलैच्या पहिल्याच पंधरवड्यात तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा तलाव भरून वाहू लागले. तर अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा हे शासनाच्या अखत्यारितील तलावही भरले आहेत. तलावात आजच्या दिवशी सुमारे ११ लाख दशलक्ष लिटर जलसाठा आहे. मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावात १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर साठा आवश्यक आहे.

टॅग्स :Damधरण