शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

प्लास्टिकबंदी एक महिन्यानंतर; सर्वसामान्यांनाच बसला भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 3:14 AM

नव्या नवलाईपुरताच उगारला कारवाईचा बडगा

राज्यभरात प्लास्टिकबंदीस महिना होत आहे. या महिनाभरात पालिकेने कारवाई करून अडीच लाखांचा दंड आणि ७.५ टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत; परंतु या प्लास्टिकबंदीचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्यांनाच बसला असून ज्या पिशव्या पूर्वी विनामूल्य मिळत होत्या, त्याच पिशव्यांसाठी आता पाचपासून ते २० रुपये मोजावे लागत आहे. सामान्यांबरोबरच मिठाई दुकानदारांनाही याचा अधिक फटका बसला असून अनेक दुकानांमधून रसमलाई, बासुंदी अशासारखे पदार्थ गायब झाले आहेत. शिवाय उत्पन्नांवर थेट ४० ते ५० टक्यांपर्यंत परिणाम झाल्याचा दावा या दुकानदारांनी केला आहे.बंदीला महिना उलटून गेल्यानंतरही कोणत्या प्रकारच्या पिशव्या वापराव्यात, कोणत्या वापरू नयेत याबाबत संभ्रम तर आहेच, शिवाय जनजागृती करण्यात पालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे त्यांनीच मान्य केले आहे. महापालिका क्षेत्रामध्ये विशेष पथकाने प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली. त्यानुसार २३ जून ते आतापर्यंत पालिकेने ३ हजार ६६० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. तर विविध आस्थापनांकडून आतापर्यंत दोन लाख २० हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.राज्य सरकारच्या वतीने प्लास्टिकवर बंदी आणल्यानंतर २३ जूनपर्यंत सर्व आस्थापने आणि गृहसंकुलांना आपल्याजवळ असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या व प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानंतर मागील महिन्याभरात पालिकेच्या माध्यमातून विविध पथके तयार करून आता पर्यंत २.५० लाखांचा दंड वसूल केला आहे. तर तब्बल ७.५ टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तर थर्माकोल हे वेस्ट सेंटरवर नेउन त्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे; परंतु जनजागृतीमध्ये आम्ही कमी पडल्याची कबुली मात्र पालिका प्रशासनाने दिली आहे.कुठलाही पर्याय उपलब्ध न करताच प्लास्टिकबंदी केल्याने त्याचा फटका हा नागरिकांना सहन करावा लागला आहे. किराणामालाच्या दुकानात जा नाही तर मॉलमध्ये किंवा भाजी विकत घ्यायला जा सर्वच ठिकाणी कापडी पिशव्यांसाठी दोन रुपयांपासून ते अगदी दहा रुपये मोजावे लागत आहेत. मॉलमध्ये तर कापडी पिशवीसाठी १६ ते २० रुपये आकारत आहेत. त्यामुळे हा नाहक भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत आहे. त्यातही मॉलमध्ये डाळी, तांदूळ, साखर हे ज्या पिशव्यांतून दिले जात आहे, त्या पिशव्या खालून केव्हा फाटतील याचा नेम नसल्याने त्याची सतत भीती ग्राहकांच्या मनात आहे. काही ठिकाणी कापडी पिशव्या विनामूल्य दिल्या जात असल्या तरी त्याची किंमत वस्तूमधून दुकानदार घेत आहे. स्वाभाविक त्या वस्तूंचे भाव वाढले आहेत. अगदी भाजीपासून वेफर म्हणा किंवा मिठाई या सर्वांचेच भाव चढे झाले आहेत. त्यामुळे हा आणखी एक फटका ग्राहकांना बसला आहे. या बंदीमुळे ग्राहकाची मात्र दोन्हीकडून कोंडी झाली आहे.शहरातील काही मिठाई दुकानांतून मलाईचे पदार्थ तर गायबच झाले आहेत. रसमलाई, बासुंदी आदींसह इतर पदार्थही बहुतेक मिठार्इंच्या दुकानातून दिसेनासे झाले आहेत. काही ठिकाणी वेफर किंवा इतर वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. शिवाय दुकानात येणाºया ग्राहकांचा ओढा असला तरीही वस्तू घेण्याचे प्रमाण मात्र कमी झाले आहे. त्यामुळे या व्यवसायवर ४० ते ५० टक्के परिणाम झाला आहे. शिवाय हातगाड्यांवर भाजीविक्री करणाºया भाजी विक्रेत्यांच्या व्यवसायावरही चांगलाच परिणाम झाला असून व्यवसाय हा अर्ध्यापेक्षाही खाली आला आहे.प्लास्टिकबंदीचे स्वागतच आहे; परंतु आमच्या व्यवसायावर बराच परिणाम झाला आहे. ग्राहक दुकानात येत असले तरी पूर्वी जेवढ्या वस्तू नेत होते, आता ते कमी नेतात. व्यवसायावर ४० ते ६० टक्के परिणाम झाला असून नोकरदारांचे पगार कसे द्यायचे याचाही आता विचार करावा लागत आहे. कागदी पिशव्या तयार करण्यासाठी येणारा खर्च हा प्लॅस्टिक पिशवीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे इतर पदार्थांच्या किमती वाढविण्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही.- ब्रिजेश गोस्वामी, शतरंज मिठाईचे मालक.जनजागृती करण्यात प्रशासन म्हणून आम्ही कमी पडलो हे मान्य करतो. परंतु आता विविध माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. तसेच कोणत्या प्रकारचे प्लास्टिक वापरायचे, कोणते वापरु नये याबाबत जो काही संभ्रम आहे तो दूर करण्याचाही प्रयत्न केला जाईल. तसेच प्लास्टिक पिशव्यांऐवजी कागदी पिशव्यांचा पर्याय दिला जाणार आहे.- मनीषा प्रधान, मुख्य प्रदूषण नियंत्रण अधिकारीप्लास्टिकबंदी झाली; परंतु सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागली आहे. साधी वस्तू घ्यायची झाली तरी कागदी पिशवीसाठी जास्तीचे पैसे जवळ ठेवावे लागतात.- रत्नमाला भोईर, गहिणी.प्लास्टिकबंदीचे स्वागतच आहे; परंतु पर्याय देणेही गरजेचे आहे. पर्याय नसल्याने अनेक ठिकाणी ग्राहकांची लूट सुरू झाली आहे. पर्याय मिळाल्यास किमान याला आळा तरी बसेल.- हर्षलता कांबळे, नोकरदार.आता वस्तू आणायच्या झाल्यास हातात पिशवी घेऊन जाणे भाग पडते. प्लास्टिक पिशव्यांचा पुन्हा पुन्हा वापर करणे शक्य होत होते; परंतु कापडी आणि कागदी पिशव्यांचा वापर अशा पद्धतीने शक्य नाही. या पिशव्या हव्या असल्यास त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतात.- यशवंत यादव, नोकरदार.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीthaneठाणे