शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या मृत्यूनंतर तरी यंत्रणेत पारदर्शकता येईल

By admin | Updated: October 12, 2015 05:21 IST

बांधकाम व्यावसायिकांना एकाच प्रकल्पासाठी ७० ते ८० ठिकाणी परवानग्यांसाठी शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात.

ठाणे : बांधकाम व्यावसायिकांना एकाच प्रकल्पासाठी ७० ते ८० ठिकाणी परवानग्यांसाठी शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. बांधकाम व्यावसायिकांचे क्षेत्र आणि शासकीय यंत्रणा यांच्यात पारदर्शकता आली पाहिजे. आपल्या मृत्यूनंतर तरी यंत्रणेत काही सुधारणा होतील आणि पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत नेते आणि अधिकाऱ्यांबद्दलची प्रचंड उद्विग्नता कॉसमॉसचे मालक सूरज परमार यांनी आपल्या मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत व्यक्त केली आहे.कै. सूरज यांनी लिहिलेली सुमारे २५ पानांची नोट कासारवडवली पोलिसांना घटनास्थळावर मिळाली आहे. या चिठ्ठीत त्यांनी बांधकाम व्यावसायिकांना नेते, पालिका अधिकारी, तसेच शासकीय यंत्रणेतील अधिकारी कसे अडथळे आणून त्रास देतात, याबाबतचा उल्लेख आहे. बिल्डर म्हणजे एकप्रकारे ‘बळीचा बकरा’ असल्याचे सर्वच यंत्रणांकडून ठरविले गेले आहे. हा बिल्डरांबद्दलचा दृष्टिकोन शासकीय यंत्रणांनी बदलला पाहिजे. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे एक चांगले अधिकारी आहेत, पण इतरांचे काय? राजकीय नेते आणि पालिकेतील अधिकाऱ्यांच्या ‘डिमांड’ वाढल्या. त्या मला पूर्ण करायच्या नव्हत्या. त्यामुळेच आपण हा निर्णय घेतला, असेही या पत्रात म्हटले असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली. त्यांनी काही नेत्यांची नावेही लिहिली आहेत. ती खोडून यांचा कुटुंबीयांना त्रास होऊ शकतो, म्हणून ती डिलीट करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.पत्रातील उल्लेखाप्रमाणे त्यांना नेमकी कोणत्या अधिकाऱ्याकडून अडवणूक केली जात होती का? कोणत्या नेत्याने त्यांचे काम केल्यानंतर त्यांच्या डिमांड वाढल्या. ठाणे महापालिकेत त्यांचा कोणता प्रकल्प कशासाठी रखडला? त्यासाठी त्यांनी कोणाकडे चर्चा केली? त्यात काय अनियमितता आहे? याचबरोबर त्यांच्या लॅपटॉपमधील ई-मेल्स आणि मोबाइल कॉल्स, तसेच मेसेजेसमधील तपशिलाचीही चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त व्ही.बी. चंदनशिवे यांनी दिली. परमार प्रकरणामुळे गोल्डन गँग धास्तावली! ठाणे : येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि कॉसमॉस ग्रुपचे मालक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी प्रसंगी आपल्यावर कारवाई होऊ शकते, अशी चिन्हे दिसू लागल्यामुळे ठाणे महापालिकेतील सर्वपक्षीय ‘गोल्डन गँग’ आता धास्तावली आहे. विशेष म्हणजे या गँगमध्ये कोण आहेत, त्यांच्याकडून कोणत्या प्रकारची ‘सेटिंग’ची कामे केली जातात, हे उघड गुपित असले, तरी त्याबद्दल उघड आणि अधिकृतपणे कोणीही बोलायला तयार नाही. परमार यांनी आत्महत्येपूर्वी जी सुमारे २५ पानांची ‘नोट’ लिहून ठेवली आहे, त्यातही खाडाखोड असल्यामुळे ती नावे कोणती आहेत, ती नावे खोडण्यामागचे कारणही आपल्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना कोणी त्रास देऊ नये, असे असल्याचे त्यांनी यात म्हटले आहे. त्यांनी ज्या अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे, त्यामध्ये या कथित ‘गोल्डन गँग’मधील नेत्यांच्या नावांचा उल्लेख आहे, परंतु त्यातही खाडाखोड असल्यामुळे ‘त्या’ नावांवर शिक्कामोर्तब झालेले नाही. मग इतके चर्चेत असूनही चारचौघांमध्ये आपण त्यातले नसल्याचा आव आणत फिरणारी ही नेते मंडळी कोण आहेत, त्यांनी नेमक्या कोणाच्या आणि काय ‘सेटिंग’ केल्या, याची आता पालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे एखादा प्रस्ताव महासभेत चर्चेला आला, तर तो मंजूर करायचा की नाही, त्याचा पाठपुरावा करायचा की नाही की, त्यात खोडा आणायचा, याबाबतचे निर्णय याच गँगमधून पुढे येतात. अर्थात, टक्केवारी ठरली की, हाच विरोध किंवा अडथळा बासनात गुंडाळला जातो.परमार यांच्या ‘कॉसमॉस’ या प्रकल्पाची कामे कोणत्या ठिकाणी अडली होती, तिथे त्यांना पालिकेच्या कोणत्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जात होता, त्यांच्याकडे कोणी खंडणीची मागणी केली होती का, त्यांच्याकडे ‘सेटिंग’साठी कोणी चर्चा केली होती का? अशा सर्वच बाजूंनी कासारवडवली पोलिसांकडून चौकशी केली जात असल्यामुळे ठाण्यातील या कथित ‘गोल्डन गँग’मध्येही धास्तीचे वातावरण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)