शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मुंबईनंतर ठाण्यातही करमाफीची लवकरच घोषणा, महापौरांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 17:08 IST

महापौर नरेश म्हस्के यांची माहिती

ठळक मुद्देकोरोना काळात महापलिकेचे आर्थिक परिस्थिती ढासळली असून करमाफीमुळे पालिकेच्या तिजोरीवर आणखीन ताण येणार आहे

ठाणे - मुंबई पाठोपाठठाणे महानगरपालिका हद्दीतील 500 चौरस फूट घरांच्या कर माफीचा निर्णय लवकरच होणार असून त्या पद्धतीच्या हालचालींना वेग आला आहे. ठाणे महापालिकेच्या मागील महासभेत कारमाफीचा प्रस्ताव मंजूर झाला असून सदर प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यात आला आहे, प्रशासकीय तपासण्यासाठी त्यावर काम सुरु असून लवकरच मुंबई प्रमाणे ठाण्यात कारमाफीचे घोषणा करण्यात येणार असल्याचे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी सांगितले. 

ठाणे महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेने ठाणेकरांना 500 चौरस फूट घरांना करमाफी देणार असे वचन दिले होते. त्यानुसार ठाणे महापलिकेची तयारी पूर्ण झाली आहे. आता त्या वचनाची पूर्तता करण्यात येणार असून, महानगरपालिकेचा ठराव नुसार पालिकेच्या नियमात बदल करून त्यावर मंत्री मंडळात निर्णय घेण्यात येईल व राज्यपाल यांच्याकडे पाठवले जाईल असे देखील म्हस्के यांनी यावेळी सांगितले. 

कोरोना काळात महापलिकेचे आर्थिक परिस्थिती ढासळली असून करमाफीमुळे पालिकेच्या तिजोरीवर आणखीन ताण येणार आहे. मालमत्ता कर हा महापलिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असून या आर्थिक वर्षात पालिकेच्या तिजोरीत या करापोटी कोटी रुपये जमा होतात.500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी दिली तर वर्षाकाठी पालिकेच्या तिजोरीत सुमारे १५० कोटी रुपये तूट येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान करमाफीमुळे कोविड काळात ठाणेकरांना नवीन वर्षात दिलासा मिळणार आहे. 

पालिकेच्या मागील निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिले होते, मात्र या निर्णयाला तब्बल 4 वर्ष उलटले असल्याने अनेकवेळा विरोधक आक्रमक होताना दिसून आले होते. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना लवकरच कारमाफीचे घोषणा करणार असून या निर्णयाचे सर्वांनी स्वागत करावे, विरोधकांनी उगचाच टीका करण्यास सुरुवात करू नये असे महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMumbaiमुंबईthaneठाणेMayorमहापौर