शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

आधारवाडी पाठोपाठ दिव्यातील डम्पींगला आग, डम्पींग बंद न केल्यास कचरा पालिकेच्या दारात टाकण्याचा नागरीकांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 17:24 IST

आधारवाडी पाठोपाठ ठाणे महापालिकेच्या दिव्यातील डम्पींगला रात्री आग लागल्याची घटना घडली. वारंवार लागणाऱ्या आगींमुळे तसेच डम्पींगच्या दुर्गंधीला त्रासलेल्या नागरिकांनी पुन्हा एकदा आक्र मक पवित्रा घेतला असून डम्पींग बंद न केल्यास दिव्यामध्ये टाकण्यात येणार कचरा पुन्हा ठाणे महापालिकेत टाकण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

ठळक मुद्देवांरवार आंदोलन करुनही डम्पींग बंद नाहीश्वसनाच्या विकारात वाढ

ठाणे - कल्याणमधील आधारवाडी डम्पींगला आग लागल्याची घटना ताजी असतांनाच बुधवारी मध्यरात्री २ च्या सुमारास दिवा डम्पींगला आग लागल्याची घटना घडली. मध्यरात्री आग लागूनही अग्निशमन दल मात्र सकाळी ११ वाजता घटनास्थळी दाखल झाले. सुमारे दीड तास आग विझवण्याचे प्रयत्न केल्यानंतर पाणी संपल्यामुळे अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळावरून निघून गेल्या असा आरोप येथील नागरिकांडून केला जात आहे. डम्पींगच्या बाजूलाच ४ ते ५ हजारांची वस्ती असून त्यांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. सांयकाळी उशिरापर्यंत आग कमी झाली असली तरी धुरामुळे ती नागरीक हैराण झाले होते. दरम्यान वारंवार लागणाºया आगींमुळे तसेच डम्पींगच्या दुर्गंधीला त्रासलेल्या नागरिकांनी पुन्हा एकदा आक्र मक पवित्रा घेतला असून डम्पींग बंद करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. डम्पींग बंद न केल्यास दिव्यामध्ये टाकण्यात येणार कचरा पुन्हा ठाणे महापालिकेत टाकण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.                 ठाणे शहरातील संपूर्ण कचरा हा अनाधिकृतपणे दिवा या ठिकाणी टाकला जातो. त्यामुळे या ठिकाणी सतत आगीच्या घटना घडत असतात. अनाधिकृतपणे टाकण्यात येणाऱ्या या कचऱ्यामुळे या परिसरात नागरिक अक्षरश: संतापले असून यापूर्वी अनेकवेळा हे डम्पींग बंद करण्याची मागणी दिवा परिसरातील सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे. मात्र याची दाखल अद्याप महापालिकेने घेतलेली नाही. बुधवारी मध्यरात्री लागलेल्या आगीमुळे या परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा धुराचा त्रास सहन करावा लागला. डम्पींगच्या बाजूलाच ४ ते ५ हजार लोकांची वस्ती आहे. याशिवाय येथे तीन खाजगी शाळा सुद्धा आहे. या परिसरात सतत आग लागण्याची घटना घडत असल्याने या नागरिकांचे केवळ आरोग्यच नव्हे तर त्यांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. दरम्यान सकाळी ११ वाजता पाण्याच्या दोन टँकरबरोबर अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. दीड वाजेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यानंतर पाणीच संपल्याने अग्निशमन विभागाच्या जवानांना देखील पुन्हा परतावे लागले अशी माहिती दिव्यातील रहिवासी रोहिदास मुंडे यांनी दिली. या डम्पींगमुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास सुरु झाले आहे. यापूर्वी देखील दिवा डम्पंींग बंद करण्यासाठी महापालिकेसोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र महापालिकेने या सर्व पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखविली आहे. आता पुन्हा एकदा हे डम्पींग बंद करण्यासाठी महापालिकेला पत्र देण्यात येणार असून या पत्रानंतरही डम्पींग बंद न झाल्यास हाच कचरा ठाणे महापालिकेत टाकण्याचा इशारा मुंडे आणि स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

  • चौकट - ठाणे महापालिकेचे स्वत:चे हक्काचे डम्पींग नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून दिव्याला संपूर्ण ठाणे शहरात निर्माण होणारा कचरा टाकला जातो. हे डम्पींग बंद व्हावे यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा ठाणे महापालिकेच्या विरोधात आंदोलन देखील केले होते. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिव्याला जाहीर सभा घेऊन दिवा डम्पींगच्या बाबतीत बाबतीत सत्ताधारी आणि पालिका प्रशासनावर सडकून टीका केली होती. तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिव्यात जाहीर सभा घेऊन एका वर्षात दिवा डम्पींग बंद करण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा हवेतच विरली आहे. डम्पींगच्या संदर्भात महाराष्ट्र नविनर्माण सेनेच्या वतीने यापूर्वी अनोखे आंदोलन करण्यात आले होते. अनेकवर्ष डम्पींग बंद करा या ग्रामस्थाच्या मागणीला अनेक अदोलनानंतर मनसेच्या वतीने डम्पींगच्या जागेवरच पाच दिवस तंबू ठोकून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनंतर तीन महिन्यात दिवा डम्पींगला पर्यायी व्यवस्था केली जाईल असे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मनसेला लेखी स्वरुपात आश्वासन दिल्याने मनसेचे डम्पींग हटाव आंदोलनाची हवा निघाली होती. पालिका आयुक्तांनी दिलेल्या पत्रात ठाण्यातील निघणाºया कचºयावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प सूर करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या, ही प्रक्रि या पूर्ण करून ठेकेदार यांच्यासोबत करार ही करण्यात आला. डम्पींगवर आग लागल्यास आणि धुर निघाल्यास त्यावर बाजूच्या खाडीच्या पाण्याचे फवारे मारून आगीवर नियंत्रण आणि धुरावर नियंत्रण मिळवण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. मात्र हे आश्वासन देखील पूर्ण होऊ शकले नाही.

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाdumpingकचरा