शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

अखेर भूखंड पालिकेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:53 IST

महापालिकेने परिवहनच्या बस आगारासाठी दिलेल्या भूखंडावर कंत्राटदाराने कब्जा मिळवला होता. महापालिकेने न्यायालयीन लढाई जिंकली असून सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने भूखंडावर पालिकेचा नामफलक लावला आहे.

उल्हासनगर : महापालिकेने परिवहनच्या बस आगारासाठी दिलेल्या भूखंडावर कंत्राटदाराने कब्जा मिळवला होता. महापालिकेने न्यायालयीन लढाई जिंकली असून सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने भूखंडावर पालिकेचा नामफलक लावला आहे.उल्हासनगर महापालिकेत ११ वर्षापूर्वी शिवसेना-भाजपाची सत्ता आल्यानंतर कंत्राटदाराकडून परिवहन सेवा सुरू केली. ही सेवा सुरू करताना कंत्राटदाराने बस उभ्या करण्यासाठी व आगराकरिता भूखंडाची मागणी केली होती. महासभेत ठराव करून कॅम्प नं-५ येथील हिंदू स्मशानभूमीजवळील भूखंड कंत्राटदाराला तात्पुरता वापरण्यासाठी दिला. कंत्राटदाराने विनापरवाना भूखंड विकसित केला. तसेच येथूनच बस सुटत होत्या. सुरूवातीला परिवहन सेवेला उत्तम प्रतिसाद मिळाला. दरम्यान, तिकीट दरवाढीवरून पालिका व कंत्राटदारात वाद झाला.महापालिकेकडे वारंवार मागणी करूनही तिकीट दरवाढीला मंजुरी दिली नाही. या निषेधार्थ कंत्राटदाराने परिवहन सेवा टप्याटप्याने बंद केली. सेवा बंद केल्यानंतर भूखंड पालिकेला हस्तांतरीत करायला हवा होता. मात्र कंत्राटदाराने भूखंडावर दावा सांगून न्यायालयात गेला. पालिका निवडणुकीनंतर तत्कालिन आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या आदेशानुसार भूखंडावरील विनापरवाना बांधलेले बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. तसेच भूखंड ताब्यात घेण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला. अखेर पालिका जिंकली असून आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त शिंपी यांच्या पथकाने परिवहनच्या भूखंडावर बुधवारी दुपारी नामफलक लावला.