शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर प्रशासनाच्या ठोस आश्वासनानंतर सेनेच्या उपजिल्हाप्रमुखाचे आंदोलन मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 19:34 IST

शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी मीरा-भार्इंदर महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासुन  एकाच पदावर ठाण मांडणा-या अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी १५ डिसेंबरपासुन पुकारलेले बेमुदत धरणे आंदोलन अखेर बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास प्रशासनाने दिलेल्या लेखी ठोस आश्वासनानंतर मागे घेतल्याचे जाहिर केले

भार्इंदर - शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी मीरा-भार्इंदर महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासुन  एकाच पदावर ठाण मांडणा-या अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी १५ डिसेंबरपासुन पुकारलेले बेमुदत धरणे आंदोलन अखेर बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास प्रशासनाने दिलेल्या लेखी ठोस आश्वासनानंतर मागे घेतल्याचे जाहिर केले. तत्पुर्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्याशी संपर्क साधून कार्यवाही करण्याबाबत कानउघडणी केल्याचे सुत्राकडुन सांगण्यात आले. 

पालिकेत गेल्या अनेक वर्षांपासुन एकाच पदाचा कारभार चालविणाऱ्या अधिकाऱ्यांना एकमेकांच्या पदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी सक्षम व आवश्यक पात्रताधारक पर्यायी अधिकारीच उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात प्रशासनापुढे तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने त्या अधिकाय््राांनी एकाधिकारशाही निर्माण करीत आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना काम देण्याचा पायंडा पाडला आहे. त्यासाठी सत्ताधाऱ्यांची देखील मर्जी राखली जात आहे. यामुळे विनासायास भ्रष्ट कारभार पार पाडला जात असल्याने पालिकेत टक्केवारीला ऊत आला आहे. कंत्राटदारांची बिले मंजुर करुन घेण्यासाठी लेखा परिक्षण विभागात टक्केवारीचा आलेख वाढू लागला आहे. बिलातील टक्का दिला तरच बिल मंजुर केले जाते. अन्यथा त्यात तांत्रिक अडचणींचा शेरा मारुन बिले लटकवली जातात. त्यामुळे विकासकामांचा निकृष्ट दर्जा वाढू लागला असुन बहुतांशी लाखोंच्या कामाचा आकडा कोट्यावधीत पोहोचु लागला आहे. पालिकेच्या निधीवर हात मारला जात असल्याने पालिकेची आर्थिक स्थिती बेताची होत चालली आहे. असाच भ्रष्ट कारभार सुरु राहिल्यास भविषष्यात पालिकेकडे कर्मचाय््राांना वेतन देण्यास निधीच उपलब्ध होणार नसल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा दावा करीत विरकर यांनी त्या अधिकाऱ्यांची इतर विभागांत त्वरीत बदली करावी, यासाठी १५ डिसेंबरपासुन पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले होते. त्याचा आढावा पालकमंत्र्यांकडून वेळोवेळी घेतला जाऊन १७ डिसेंबरला शहरप्रमुख धनेश पाटील यांच्या शिष्टमंडळाला त्यांनी ठाणे येथील महापौर निवासात पाचारण केले होते. यावर त्यांनी आयुक्तांच्या संपर्कात राहून कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतु, त्या अधिकाऱ्यांच्या बदलीत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने प्रशासनाची चांगलीच पंचाईत झाली. मात्र प्रशासनाकडुन आंदोलनाची गांभीर्याने दखलच घेतली जात नसल्याचा समज होऊन १९ डिसेंबरला आंदोलकांनी आयुक्तांची गाडीच अडवून त्यांना फुले देत गांधीगिरी व्यक्त केली. त्यावेळी आयुक्तांनी विरकर यांना कार्यवाहीचे आश्वासन दिले. मात्र त्याची ठोस प्रक्रीया होत नसल्याने अखेर आंदोलनाच्या ६ व्या दिवशी बुधवारी पालकमंत्र्यांनी आयुक्तांना संपर्क साधुन कडक शब्दांत त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे प्रशासकीय सुत्रे हलल्याने रात्री उशीरा उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी विरकर यांना ठोस कार्यवाहीचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतल्याचे जाहिर करण्यात आले. आंदोलनात विभागप्रमुख मिलन खरे, विलास सुर्यवंशी, उपविभागप्रमुख प्रशांत सावंत, विशाल मोरे, उपशहरप्रमुख पप्पू भिसे, केशर सिंग, शाखाप्रमुख नरेंद्र उपरकर, पदाधिकारी प्रवीण उतेकर आदींनी सहभाग घेतला होता. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेना