शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

३० वर्षांनंतर आजीबाई आपल्या गोतावळ्यात परतल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 09:45 IST

Thane News: तीस वर्षांपूर्वी मुलाचा डोळ्यासमोरच मृत्यू झाला होता. या घटनेने अंतर्बाह्य हादरून गेलेली एक महिला घरातून निघून गेली होती. तिचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते.

ठाणे - तीस वर्षांपूर्वी मुलाचा डोळ्यासमोरच मृत्यू झाला होता. या घटनेने अंतर्बाह्य हादरून गेलेली एक महिला घरातून निघून गेली होती. तिचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते. दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी उपचारासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात  तिला दाखल केले. मात्र तिच्या घराचा पत्ता नव्हता, कुटुंब कोठे राहते याचा मागमूस नव्हता. अखेर रुग्णालयाने पोलिसांच्या मदतीने त्या आजीबाईंच्या घराचा पत्ता शोधला आणि तिच्या कुटुंबाशी भेट घडवून आणली. ३० वर्षांनंतर आजी आपल्या गोतावळ्यात परतल्या. 

मानसिक स्वास्थ्य हरवले८० वर्षांच्या ताराबाई मोरे (नाव बदलले आहे) या ३० वर्षांपूर्वी घरातून निघून गेल्या. मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या ताराबाई दोन वर्षांपूर्वी नाशिक पोलिसांना आढळून आल्या होत्या. त्यांना उपचारासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले होते. 

ताराबाई या  कुठून आल्या,  याची कोणतीच माहिती मिळत नव्हती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना शोधायचे कसे हा प्रश्न रुग्णालयापुढे होता. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ताराबाई यांच्यावर उपचार आणि त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू होते, अशी माहिती रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक नितीन शिवदे यांनी दिली.  

‘पंचवटी’ एवढेच म्हणायच्या...ताराबाई यांच्या घरचा पत्ता विचारल्यास त्या पंचवटी एवढंच सांगायच्या. याबाबत रुग्णालयाने पंचवटी पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, फारसा उपयोग झाला नाही. दरम्यानच्या, काळात ताराबाईंवर समुपदेशन, औषधोपचार सुरू होते. त्यांच्याशी विचारपूस करताना अहिल्यानगर शहरातील एका परिसराचे नाव त्यांनी सांगितले असता, रुग्णालयाने पोलिसांशी संपर्क करून ताराबाई यांची माहिती दिली.  पोलिस आणि रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या कुटुंबाचा शोध घेतला. नुकतेच त्यांना कुटुंबाकडे सुपूर्द केले. यासाठी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहम्मद  फैजल मोहम्मद सादिक, डॉ. मधुरा गायकवाड, यांनी परिश्रम घेतले.

ताराबाई यांचा १३ वर्षांचा मुलगा झाडावर चढला होता. विजेच्या तारेचा झटका लागून त्याचा मृत्यू झाला होता. आपल्या मुलाचा डोळ्यासमोर झालेला मृत्यू बघून ताराबाई यांचे मानसिक संतुलन बिघडले. साधारण ३० वर्षांपूर्वी घरातून न सांगताच बाहेर पडल्या होत्या.  - नितीन शिवदे (समाजसेवा अधीक्षक, मनोरुग्णालय, ठाणे) 

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकthaneठाणे