शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अधिकारी १६ वर्षांनंतरही वेतनवाढीच्या प्रतीक्षेत, गुजरात भूकंपाचे मदतकार्य,२००१ चा प्रस्ताव प्रलंबित असतांना पुन्हा ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 06:50 IST

गुजरातमध्ये २००१ मध्ये झालेल्या भूकंपावेळी ठाणे पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाºयांची टीम तेथे मदतीसाठी गेली होती. त्यानंतर त्यांना एक वेतनवाढ देण्याचा ठराव त्यावेळेच्या महासभेने मंजूर केला होता.

- अजित मांडकेठाणे : गुजरातमध्ये २००१ मध्ये झालेल्या भूकंपावेळी ठाणे पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाºयांची टीम तेथे मदतीसाठी गेली होती. त्यानंतर त्यांना एक वेतनवाढ देण्याचा ठराव त्यावेळेच्या महासभेने मंजूर केला होता. १६ वर्षे उलटूनही त्याची अंमलबजावणी झाली नसतांना आता पुन्हा आपत्तीकाळात आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकारी, कर्मचाºयांसह पालिकेच्या इतर अधिकाºयांनी जे धाडस दाखविले, त्याचे कौतुक म्हणून तसाच ठराव मंजूर करण्यात आला. आधीच्या ठरावाची अंमलबजावणी झाली नसतांना आता हे पुन्हा गाजर कशासाठी ?असा सवाल त्यांनी केला आहे.महासभेत लोकप्रतिनिधींकडून अनेक ठराव केले जातात. परंतु, यातील किती ठरावांची शासन अथवा प्रशासनाकडून अंमलबजावणी होते. याचे उत्तर लोकप्रतिनिधींकडेही नाही. आयुक्तांच्या मुदतवाढीच्या ठरावासाठी लोकप्रतिनिधींची लगीनघाई सुरू आहे. परंतु, काही नोकरभरतीचे, शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले ठराव आणि इतरही ठराव यापूर्वी झाले आहेत. त्यांचे कागदी घोडे नाचविण्यापलिकडे काहीच झाले नाही. २००१ मध्ये गुजरातमध्ये भूकंप झाला होता. त्यावेळी ठाणे पालिकेची ६० ते ७० जणांची टीम गुजरातला रवाना झाली होती. या टीमने तेथे उत्तम काम केले. यात सफाई कामगार, डॉक्टर, परिचारिका, अग्निशमनचे जवान आदींसह इतर कर्मचारी सहभागी होते. त्यांनी अशा पद्धतीने आपले कसब दाखविल्याने त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून तत्कालीन महापौर तथा विद्यमान खासदार राजन विचारे यांनी एक वेतनवाढ देण्याचा ठराव मंजूर केला होता. परंतु, १६ वर्षानंतरही त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. ज्यावेळेस ही वेतनवाढ देण्याची वेळ आली त्यावेळस पालिका प्रशासनाने गोपनीय अहवाल मागविला होता. ज्यावेळेस हे कर्मचारी अधिकारी, गुजरातला गेले होते, त्यावेळेस प्रशासनाने तो का मागविला नाही, मग वेतनवाढ देण्याच्या वेळेसच कशासाठी हवा गोपनीय अहवाल असे प्रश्न मात्र आजही उपस्थित होत आहे. एकूणच या सर्व प्रकारामुळे या कर्मचाºयांना अद्यापही वेतनवाढ काही मिळालेलीच नाही.आपत्तीतील कामाचे तोंडभरून कौतुक१६ वर्षानंतर आता पुन्हा तशाच प्रकारचा ठराव नुकत्याच झालेल्या महासभेत करण्यात आला. पावसाळ्यात आलेल्या आपत्तीच्या काळात आपत्ती विभाग, घनकचरा, अग्निशमन दलातील जवान आणि इतर अधिकारी, कर्मचाºयांनी ज्या पद्धतीने ही परिस्थिती हाताळली. ती कौतुकास्पद असल्याचे सांगून त्यांना एक वेतनवाढ देण्याचा ठराव मंजूर केला आहे. त्यास आता शासन कधी मंजुरी देते, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका