शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

१५ वर्षांनंतर बंदरवाडीच्या रहिवाशांना घरे; चाव्या हातात आल्यावर अश्रू तरळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 22:50 IST

वीज, पाण्याअभावी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर काढले दिवस

भाईंदर : रेल्वेच्या जागेतील घरे तोडल्यानंतर १५ वर्षे नवघर गावामागील महापालिकेने टाकलेल्या कचºयाच्या ढिगाºयावर वीज, पाण्याअभावी असह्य जीवन जगणाºया ११३ कुटुंबांचे महापालिकेने इंद्रलोकमधील एका इमारतीत पुनर्वसन केले आहे. उकिरड्यावर जगत हक्काच्या घरांसाठी १५ वर्षे चाललेल्या संघर्षाचा अखेर सुखद असा शेवट झाला. घरांच्या चाव्या हातात मिळाल्यानंतर रहिवाशांना अश्रू अनावर झाले.

भाईंदर पूर्वेला बंदरवाडी येथे रेल्वेच्या जागेत ९० च्या दशकापासून सुमारे १३० कुटुंबे राहत होती. १९९५ पूर्र्वीच्या झोपडपट्टीवासीयांना अधिकृत ठरवले असतानाही रेल्वे प्रशासनाने मात्र हा नियम आम्हाला लागू होत नसल्याचे स्पष्ट करत महापालिकेच्या मदतीने मोठ्या पोलीस बंदोबस्तात येथील घरे तोडली होती. तोडलेल्या झोपड्यांपैकी १२८ जणांना महापालिकेने पात्र झोपडीधारक म्हणून फोटोपास दिले होते. तत्कालीन आयुक्त शिवमूर्ती नाईक यांनी बाधित झोपडपट्टीधारकांची नोंद करून घेत पर्यायी व्यवस्था होईपर्यंत नवघर स्मशानभूमीमागील सरकारी जागेत शहराचा कचरा टाकून केलेल्या भरावावर राहण्यास परवानगी दिली होती. तेव्हापासून बहुतांश झोपडीधारक कचºयाच्या ढिगाºयावरच झोपड्या बांधून राहत होते.

सीआरझेड व कांदळवन क्षेत्र असल्याने रहिवाशांना महापालिकेने पाण्याची जोडणी दिली नाही. वीजपुरवठाही मिळाला नव्हता. पावसाळ्यात तर परिस्थिती बिकट होत असे. अशा दुरवस्थेतही हक्काचे छप्पर मिळेल, या आशेने या कुटुंबीयांनी येथे एकदोन दिवस नाही, तर आयुष्याची १५ वर्षे काढली.हक्काचे घर मिळावे म्हणून महापालिकेच्या मुख्यालयापासून नगरसेवक, आमदार, जिल्हाधिकारी ते सरकार दरबारी लढा दिला.राजकारण बाजूला ठेवून दिला न्यायपुनर्वसनाचा हक्क असूनही या रहिवाशांना इतकी वर्षे यातना सोसत राहावे लागले, याचे दु:ख वाटत होते. महापौर असताना जेव्हा हे रहिवासी मोठ्या आशेने माझ्याकडे आले, त्यावेळी ठरवले की, यांना त्यांच्या लढ्यात पूर्ण साथ द्यायची. राजकारण बाजूला ठेवून माझा प्रभाग नसताना केवळ त्यांना चांगले घर मिळावे, हाच उद्देश होता. आयुक्तांसह कार्यकारी अभियंता व महापालिकेनेही त्यांना न्याय दिला.- गीता जैन, माजी महापौर

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर