शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

पारदर्शक विकास आराखडा बनवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न - आयुक्त अजय वैद्य

By नितीन पंडित | Updated: November 3, 2023 16:50 IST

२००३ मध्ये प्रकाशित झालेल्या विकास  आराखड्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने न झाल्याने २९३ आरक्षणांपैकी ३५ आरक्षण भूखंड विकसित केल्याने अवघे ११ टक्के काम झाले आहे.

भिवंडी: शहराचा विकास आराखडा बनवीत असताना तो पारदर्शक व बिनचूक बनवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे,हे करीत असताना उद्यान शाळा व इतर बाबींसाठी आरक्षण ठेवताना सर्व प्रभाग समितीमध्ये ते ठेवले असल्याने शहराच्या सर्वच भागात विकासाचा चेहरा दिसणार आहे अशी माहिती भिवंडी महानगरपालिका आयुक्त अजय वैद्य यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.या प्रसंगी सहाय्यक संचालक नगररचना विकास योजना विशेष घटक स्मिता कलगुट्टी,नगररचनाकार अनिल येलमाने,जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले उपस्थित होते.

२००३ मध्ये प्रकाशित झालेल्या विकास  आराखड्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने न झाल्याने २९३ आरक्षणांपैकी ३५ आरक्षण भूखंड विकसित केल्याने अवघे ११ टक्के काम झाले आहे. त्यामध्ये येणाऱ्या अडचणी, नागरिकांची गरज व भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पारदर्शक असा हा विकास आराखडा बनविण्यात आला आहे .या मध्ये काही हरकती असल्यास त्या १० नोव्हेंबर पर्यंत पालिका कार्यालयात सादर करावयाच्या आहेत. परंतु शहरात विकास आराखडा मधील बाधितांना त्यांच्या आरक्षण मध्ये बदल करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक होण्याचा प्रकार होऊ शकतो अशा तथाकथित समाजसेवक, दलालां पासून नागरिकांनी सावध राहिले पाहिजे.जर या बाबत काही तक्रारी आल्यास त्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करताना कोणाचाही मुलाहिजा बाळगला जाणार नाही असा इशारा आयुक्त अजय वैद्य यांनी दिला आहे.या विकास आराखड्याबाबत नागरिकांनी दाखल केलेल्या सूचना हरकती या शासनाने नियुक्त केलेल्या तज्ञ समिती समोर सुनावणी होवून त्यावर अंतिम निर्णय होणार आहे अशी माहिती आयुक्त अजय वैद्य यांनी शेवटी दिली.

द्रोण सर्व्हेक्षण,गाव नकाशे,या माध्यमातून डिजिटललायझेशन व त्यापासून मुळ जमीन वापर नकाशा तयार करून शहरातील वाहतुकीचे सर्व्हेक्षण करून शहरातील रस्त्यांची शहरा बाहेरील मुख्य रस्त्याला जोडणी या बाबी विचारात घेऊन विकास आराखडा बनविण्यात आला आहे.त्यासाठी शहरातील विविध घटकांकडून सूचना मागविण्यात आल्या असून पाणी पुरवठा,शिक्षण विभाग,पोलिस, व इतर शासकीय कार्यालय यांच्या जागेच्या गरजा विचारात घेतल्या गेल्याची माहिती सहाय्यक संचालक नगररचना विकास योजना विशेष घटक स्मिता कलगुट्टी यांनी विकास आराखड्याचे सादरीकरण करताना दिली.

टॅग्स :bhiwandiभिवंडी