शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पारदर्शक विकास आराखडा बनवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न - आयुक्त अजय वैद्य

By नितीन पंडित | Updated: November 3, 2023 16:50 IST

२००३ मध्ये प्रकाशित झालेल्या विकास  आराखड्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने न झाल्याने २९३ आरक्षणांपैकी ३५ आरक्षण भूखंड विकसित केल्याने अवघे ११ टक्के काम झाले आहे.

भिवंडी: शहराचा विकास आराखडा बनवीत असताना तो पारदर्शक व बिनचूक बनवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे,हे करीत असताना उद्यान शाळा व इतर बाबींसाठी आरक्षण ठेवताना सर्व प्रभाग समितीमध्ये ते ठेवले असल्याने शहराच्या सर्वच भागात विकासाचा चेहरा दिसणार आहे अशी माहिती भिवंडी महानगरपालिका आयुक्त अजय वैद्य यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.या प्रसंगी सहाय्यक संचालक नगररचना विकास योजना विशेष घटक स्मिता कलगुट्टी,नगररचनाकार अनिल येलमाने,जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले उपस्थित होते.

२००३ मध्ये प्रकाशित झालेल्या विकास  आराखड्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने न झाल्याने २९३ आरक्षणांपैकी ३५ आरक्षण भूखंड विकसित केल्याने अवघे ११ टक्के काम झाले आहे. त्यामध्ये येणाऱ्या अडचणी, नागरिकांची गरज व भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पारदर्शक असा हा विकास आराखडा बनविण्यात आला आहे .या मध्ये काही हरकती असल्यास त्या १० नोव्हेंबर पर्यंत पालिका कार्यालयात सादर करावयाच्या आहेत. परंतु शहरात विकास आराखडा मधील बाधितांना त्यांच्या आरक्षण मध्ये बदल करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक होण्याचा प्रकार होऊ शकतो अशा तथाकथित समाजसेवक, दलालां पासून नागरिकांनी सावध राहिले पाहिजे.जर या बाबत काही तक्रारी आल्यास त्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करताना कोणाचाही मुलाहिजा बाळगला जाणार नाही असा इशारा आयुक्त अजय वैद्य यांनी दिला आहे.या विकास आराखड्याबाबत नागरिकांनी दाखल केलेल्या सूचना हरकती या शासनाने नियुक्त केलेल्या तज्ञ समिती समोर सुनावणी होवून त्यावर अंतिम निर्णय होणार आहे अशी माहिती आयुक्त अजय वैद्य यांनी शेवटी दिली.

द्रोण सर्व्हेक्षण,गाव नकाशे,या माध्यमातून डिजिटललायझेशन व त्यापासून मुळ जमीन वापर नकाशा तयार करून शहरातील वाहतुकीचे सर्व्हेक्षण करून शहरातील रस्त्यांची शहरा बाहेरील मुख्य रस्त्याला जोडणी या बाबी विचारात घेऊन विकास आराखडा बनविण्यात आला आहे.त्यासाठी शहरातील विविध घटकांकडून सूचना मागविण्यात आल्या असून पाणी पुरवठा,शिक्षण विभाग,पोलिस, व इतर शासकीय कार्यालय यांच्या जागेच्या गरजा विचारात घेतल्या गेल्याची माहिती सहाय्यक संचालक नगररचना विकास योजना विशेष घटक स्मिता कलगुट्टी यांनी विकास आराखड्याचे सादरीकरण करताना दिली.

टॅग्स :bhiwandiभिवंडी