शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

पारदर्शक विकास आराखडा बनवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न - आयुक्त अजय वैद्य

By नितीन पंडित | Updated: November 3, 2023 16:50 IST

२००३ मध्ये प्रकाशित झालेल्या विकास  आराखड्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने न झाल्याने २९३ आरक्षणांपैकी ३५ आरक्षण भूखंड विकसित केल्याने अवघे ११ टक्के काम झाले आहे.

भिवंडी: शहराचा विकास आराखडा बनवीत असताना तो पारदर्शक व बिनचूक बनवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे,हे करीत असताना उद्यान शाळा व इतर बाबींसाठी आरक्षण ठेवताना सर्व प्रभाग समितीमध्ये ते ठेवले असल्याने शहराच्या सर्वच भागात विकासाचा चेहरा दिसणार आहे अशी माहिती भिवंडी महानगरपालिका आयुक्त अजय वैद्य यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.या प्रसंगी सहाय्यक संचालक नगररचना विकास योजना विशेष घटक स्मिता कलगुट्टी,नगररचनाकार अनिल येलमाने,जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले उपस्थित होते.

२००३ मध्ये प्रकाशित झालेल्या विकास  आराखड्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने न झाल्याने २९३ आरक्षणांपैकी ३५ आरक्षण भूखंड विकसित केल्याने अवघे ११ टक्के काम झाले आहे. त्यामध्ये येणाऱ्या अडचणी, नागरिकांची गरज व भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पारदर्शक असा हा विकास आराखडा बनविण्यात आला आहे .या मध्ये काही हरकती असल्यास त्या १० नोव्हेंबर पर्यंत पालिका कार्यालयात सादर करावयाच्या आहेत. परंतु शहरात विकास आराखडा मधील बाधितांना त्यांच्या आरक्षण मध्ये बदल करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक होण्याचा प्रकार होऊ शकतो अशा तथाकथित समाजसेवक, दलालां पासून नागरिकांनी सावध राहिले पाहिजे.जर या बाबत काही तक्रारी आल्यास त्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करताना कोणाचाही मुलाहिजा बाळगला जाणार नाही असा इशारा आयुक्त अजय वैद्य यांनी दिला आहे.या विकास आराखड्याबाबत नागरिकांनी दाखल केलेल्या सूचना हरकती या शासनाने नियुक्त केलेल्या तज्ञ समिती समोर सुनावणी होवून त्यावर अंतिम निर्णय होणार आहे अशी माहिती आयुक्त अजय वैद्य यांनी शेवटी दिली.

द्रोण सर्व्हेक्षण,गाव नकाशे,या माध्यमातून डिजिटललायझेशन व त्यापासून मुळ जमीन वापर नकाशा तयार करून शहरातील वाहतुकीचे सर्व्हेक्षण करून शहरातील रस्त्यांची शहरा बाहेरील मुख्य रस्त्याला जोडणी या बाबी विचारात घेऊन विकास आराखडा बनविण्यात आला आहे.त्यासाठी शहरातील विविध घटकांकडून सूचना मागविण्यात आल्या असून पाणी पुरवठा,शिक्षण विभाग,पोलिस, व इतर शासकीय कार्यालय यांच्या जागेच्या गरजा विचारात घेतल्या गेल्याची माहिती सहाय्यक संचालक नगररचना विकास योजना विशेष घटक स्मिता कलगुट्टी यांनी विकास आराखड्याचे सादरीकरण करताना दिली.

टॅग्स :bhiwandiभिवंडी