शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

कल्याण पूर्वेत पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 01:59 IST

खडेगोळवलीत टंचाईच्या झळा : तीन दिवसांनी रात्री येतो टँकर, पाण्यासाठी उडते झुंबड

कल्याण : शहरातील काही भागांत पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. पूर्वेतील खडेगोळवली गॅस कंपनी परिसरातील रामा व दत्ता कॉलनीतील नागरिक पाणीटंचाईने हैराण झाले आहेत. महापालिकेकडून दर तीन दिवसांआड या भागाला टॅँकरने पाणीपुरवठा होत आहे. हा टॅँकरही रात्री पाठवला जात आहे. टॅँकर येताच या परिसरातील नागरिक पाण्यासाठी अक्षरश: तुटून पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रहिवाशांना टॅँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.रहिवासी रामप्रसाद पांडे म्हणाले की, आमच्या भागात १५० लोक राहतात. त्यांच्या कॉलनीला पाणी येत नाही. या कॉलनीतील नागरिकांनी महापालिकेकडे पाणी येत नसल्याची तक्रार केलेली आहे. महापालिकेचे अधिकारी केवळ बोळवण करत आहे. त्याची दखल घेतली जात नाही. महापालिका तीन दिवसांआड एक पाण्याचा टँकर पाठवते. तोही रात्रीच्या वेळेत येत असल्याने नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडते. केवळ पिण्यापुरते कसेबसे पाणी मिळते. रात्री पथदिव्यांच्या उजेडात महिला पाण्याच्या टँकरमधून पाणी मिळवण्यासाठी धडपड करतात. घरातील पुरुष व महिलांसह लहान मुलेही पाण्याचा टँकर आल्यावर एक हंडा पाण्यासाठी धाव घेतात. महापालिका टॅँकरने हे पाणी पुरवते. त्यासाठी शुल्क आकारले जात नाही. मात्र, एक टॅँकर पुरेसा नसून सकाळी आणि संध्याकाळी असे दोन टँकर रोज पाठवण्याची मागणी पांडे यांनी केली आहे.कल्याण पूर्वेतील अनेक भागांत पाण्याची वानवा आहे. आता उन्हाळा अधिक कडक होत असून पाणीटंचाईचा त्रास मे महिन्यात आणखी वाढणार आहे. याठिकाणी पाण्याचा दाब कमी असल्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. तर, महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित विभागाला पाण्याचा टँकर पाठवला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.आजचे पाण्याचे शटडाउन रद्दकल्याण-डोंबिवलीत २२ टक्के पाणीकपात लागू आहे. ही कपात मे महिन्यात वाढू शकते. लोकसभेची निवडणूक असल्याने या कपातीमधील वाढ तूर्तास तरी रोखून धरली आहे. निवडणुकीसाठी २९ एप्रिलला मतदान घेतले जाणार आहे. दरमहिन्याच्या चौथ्या शनिवारी कल्याण-डोंबिवलीचा पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. मात्र, शनिवारी कल्याण-डोंबिवलीचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे. चौथ्या शनिवारचा शटडाउन रद्द करण्यात आला आहे. निवडणुकीमुळे मतदारांना हा दिलासा मिळाला असला तरी मतदानानंतर असाच दिलासा मे महिन्यात मिळणार की नाही, असा सवाल नागरिक करत आहेत.साई श्रद्धा कॉलनीला दूषित पाणीपुरवठाकाटेमानिवलीतील साई श्रद्धा कॉलनीत राहणारे कैलास रोकडे यांनी सांगितले की, साई विहार कॉलनीच्या नळातून दूषित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याप्रकरणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे २४ नोव्हेंबर २०१८ रोजी तक्रार केलेली आहे. या तक्रारीची दखल घेतलेली नाही. या भागातील जलवाहिन्या गटारातून गेलेल्या असून त्या बदलल्याशिवाय हा दूषित पाण्याचा प्रश्न सुटणार नाही, असे रोकडे यांनी सांगितले. तसेच या भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. पाण्याचा दाब कमी असल्याने चाळीतील लोक विजेचा पंप लावतात. चाळीच्या शेजारच्या इमारतीमध्येही विजेचे पंप लावले जातात. चाळीतील विजेच्या पंपांपेक्षा इमारतीमधील विजेचे पंप अधिक क्षमतेचे असल्याने इमारतीद्वारे पाणी जास्त खेचले जाते. त्यामुळे चाळींना पंप लावूनही पाणी मिळत नाही.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई