शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

पुलाअभावी जीव धोक्यात घालून आदिवासींची नदीतून ये-जा; समस्यांचा पाढा म्हणजेच पालघरमधील मोखाड्यातील मुकुंदपाडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 13:25 IST

निवडणुका आल्या की इकडे पुढारी मते मागायला येतात. एरव्ही इकडे कुणी ढुंकूनही बघत नाहीत, असे इथल्या स्थानिक आदिवासी लोकांचे म्हणणे आहे. 

रवींद्र साळवे -मोखाडा : देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून १०० किमी अंतरावर मोखाडा  तालुक्यापासून ३५ ते ४० किमी अंतरावर दरी-डोंगरात बेरिस्ते ग्रामपंचायतीच्या हद्दीत आदिवासी लोकवस्तीचा वसलेला मुकुंदपाडा  हा आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. पावसाळ्यात मुकुंदपाडावासीयांचा संपर्क तुटतो. यामुळे एखादा माणूस आजारी पडल्यास किंवा शाळकरी मुलांना, चाकरमान्यांना दुथडी भरून वाहणाऱ्या वाल नदीतून अक्षरश: जीवाची बाजी लावून ये-जा  करावी  लागते.निवडणुका आल्या की इकडे पुढारी मते मागायला येतात. एरव्ही इकडे कुणी ढुंकूनही बघत नाहीत, असे इथल्या स्थानिक आदिवासी लोकांचे म्हणणे आहे. मुकुंदपाडा  हा समस्यांचा पाडा असून, राज्यापासून तुटलेला आहे. आमच्याकडे रस्त्याची सोय नाही. रुग्ण असल्यास डोली करून आठ किमीचा डोंगर पार करून दवाखाना गाठावा लागतो. अत्यवस्थ रुग्ण अनेकदा रस्त्यातच दगावतात. पावसाळ्यात आमची समस्या अधिकच बिकट बनते. तालुक्याशी संपर्क तुटून जातो. रेशन आणायला आम्हाला जीवाची बाजी लावून नदी पार करावी लागते, असे येथील स्थानिक आदिवासी गणपत पांडू भोये यांनी सांगितले.

येथे वीज सोडली तर कोणत्याच सुविधा नाहीत. पाणी, रस्ता, आरोग्य अशा कोणत्याच सुविधा नसलेल्या या गावातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर लाकडाची डोली करून तिला न्यावे लागते. वेळेत उपचार न मिळल्याने रुग्ण रस्त्यातच दगावतो. मागील आठ-दहा वर्षांत सहा रुग्ण उपचाराविना दगावले असल्याचे इथले लोक सांगतात. पावसाळ्यात तर या पाड्यांचा तालुक्याशी संपर्कच राहत नाही. अनेक सरकारी योजना येथे कागदावरच आहेत. त्यांची अंमलबजावणी झालेली नाही.   

स्वस्त धान्यासाठी ८ किमी पायपीट या १२८ आदिवासी लोकवस्तीच्या मुकुंदपाड्यावर सोयीसुविधांचा अभाव आहे. शाळाही गेल्या पाच-सहा वर्षांपासून बंद आहेत. पाण्याची सोय नाही. त्यामुळे बारमाही नदीवरून खड्डा खोदून पाणी आणावे लागते. एवढेच काय, रेशन दुकानातील धान्य आणण्यासाठी आठ किलोमीटरचा भला मोठा डोंगर पार करून त्यांना चिकाडीचा पाडा गाठावा लागतो. बरे, एकाच फेरीत रेशन मिळेल याची शाश्वती नसते. यामुळे एका महिन्याचे धान्य आणण्यासाठी चार-पाच वेळा फेऱ्या माराव्या लागतात. पावसाळ्यात नदीच्या पलीकडे ये-जा करावी लागत असल्याने जीवघेणी कसरत करावी लागते.

टॅग्स :palgharपालघर