शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 :आदित्य उपमुख्यमंत्री झाल्यास आनंद होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 05:57 IST

एकनाथ शिंदे यांची भावना : मंत्रीपदावर असलो, तरी मी सामान्य शिवसैनिकच लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : आदित्य ठाकरे गेली ...

एकनाथ शिंदे यांची भावना : मंत्रीपदावर असलो, तरी मी सामान्य शिवसैनिकचलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आदित्य ठाकरे गेली १० वर्षे विविध घटकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करीत आहेत. सत्तेच्या माध्यमातून सेवेची मोठी संधी त्यांना प्राप्त होते आहे. त्यांनी त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेत कुठले पद हवे म्हणून निवडणूक लढवत नसल्याचा खुलासा केला आहे. परंतु, एक शिवसैनिक म्हणून माझी अशी इच्छा आहे, की आदित्य यांनी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री व्हावे. तसे झाल्यास सर्वाधिक आनंद मलाच होईल, अशी भावना सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.राजकारणात एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा आहे का?शाखाप्रमुखापासून विरोधी पक्षनेते, कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत माझा प्रवास झाला. कार्यकर्त्यापासून इथवर झालेल्या प्रवासामागे शिवसेना ही चार अक्षरे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला भरभरून दिले. स्व. आनंद दिघे यांचा आशीर्वाद लाभला. त्यांच्या निधनानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला सांभाळले. खूप काम करून मी पदांना न्याय दिला. मंत्री असलो तरी मी कार्यकर्ता म्हणून काम करतो.ठाण्यात शिंदे यांच्याविरोधात राष्ट्रवादी सक्षम उमेदवार देत नाही. मुंब्रा-कळवा मतदारसंघात शिवसेना जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तगडा उमेदवार देत नाही, हा मैत्री जपण्याचा प्रकार आहे का?पक्ष, मैत्री आणि राजकारण या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राजकारणात मी कधी मैत्री आड येऊ दिली नाही आणि मैत्रीत राजकारण आणले नाही. कळवा-मुंब्रा येथील शिवसेनेच्या उमेदवार दीपाली सय्यद यांना केवळ अभिनेत्री म्हणून उमेदवारी दिलेली नाही. त्यांचे महिला सक्षमीकरणाचे काम पाहून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संधी दिली आहे.ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला बंडखोरी रोखण्यात अपयश आले आहे की, भाजपने काही मतदारसंघांत बंडखोरी केल्यामुळे परस्पर अविश्वासातून बंडखोरी झालीय?एखादा मतदारसंघ आपल्याला मिळावा, ही कार्यकर्त्यांची भावना असते. युतीमध्ये ती पूर्ण होत नाही. ज्यांनी निवडणुकीत बंड केले, त्यांची नाराजी पक्षावर नाही; तर स्थानिक उमेदवाराबद्दल असू शकते. त्याचा परिणाम अधिकृत उमेदवारांवर होणार नाही.भाजपने कल्याण पश्चिम मतदारसंघ सोडला, पण बंड करून विश्वासघात केला का?व्यापक हितासाठी युती करताना काही छोट्यामोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे. अनेक धोरणात्मक निर्णयांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात संवाद आहे. काही कार्यकर्त्यांना राजकारणात संयम नसतो. सर्वकाही त्यांना लवकर हवे असते. त्यातून अशा चुका होतात.ठाण्यात मनसे व राष्ट्रवादीच्या छुप्या मैत्रीचे काय परिणाम होतील?ठाणेकर कामाला पसंती देतात. त्यामुळेच गेली २५ वर्षे येथे सेनेची सत्ता आहे. मागील महापालिका निवडणुकीत साऱ्यांनी एकत्र येऊन शिवसेनेविरोधात प्रचार केला. तरीही, लोकांनी शिवसेनेला बहुमत दिले. त्यामुळे मनसे व राष्ट्रवादीबद्दल मला काही बोलायचे नाही.भाजपने गणेश नाईक यांना ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांना रोखण्याकरिता घेतले आहे का? भविष्यात शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष पाहायला मिळेल का?आता शिवसेना व भाजप युती आहे. त्यामुळे आमची लढाई कशी होईल? कुणापेक्षा आपण वरचढ व्हावे, कुणाला तरी हरवावे, या हेतूने मी काम करीत नाही. मी दिवसातील १८ ते २० तास काम करतो. माझ्यापेक्षा कुणी आणखी काम करून मोठे झाले, तर मला त्यात वावगे वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे गेल्यावेळी नवी मुंबईत त्यांचा पराभव झाला. राजकारणात सक्रिय राहण्याकरिता मुख्य प्रवाहात राहिले पाहिजे, असे वाटल्याने ते भाजपत दाखल झाले असतील. परंतु, त्यामुळे आमच्यात संघर्ष होण्याचा किंवा माझे अस्तित्व कमी करण्याकरिता भाजपने त्यांना प्रवेश देण्याचा प्रश्न येत नाही.